शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

दीपक आत्रामांना पोलिसांनी रोखले, मंचावर एंट्री मिळाल्यावर भाषण ठोकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2023 13:00 IST

एकाच पक्षाच्या कार्यकर्त्यांना नोकऱ्या दिल्या: दीपक आत्राम; धर्मरावबाबा म्हणाले, माझा एक माणूस दाखवा आमदारकी सोडतो

गडचिरोली / आलापल्ली : अहेरी तालुक्यातील आलापल्लीत लॉयड मेटल्स कंपनीच्या हेल्मेट वाटपाच्या जाहीर कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धर्मरावबाबा आत्राम व अलीकडेच तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश केलेले माजी आमदार दीपक आत्राम यांच्यात १ जून रोजी जोरदार आरोप-प्रत्यारोप झाले. कंपनी एकाच पक्षाच्या कार्यकर्त्यांना नोकऱ्या कशा काय देते? असा रोकडा सवाल दीपक आत्राम यांनी विचारला, त्यावर माझा एक माणूस दाखवा, आमदारकी सोडतो, असे खणखणीत उत्तर धर्मरावबाबा आत्राम यांनी दिले.

एटापल्ली तालुक्यातील सुरजागड लोहपहाडीवरील खनिज वाहतुकीने स्थानिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. धूळ, प्रदूषणासह वाहनांचा गोंगाट, पिकांची धूळधाण तसेच खराब रस्ते व बेदरकार वाहनांमुळे किड्या- मुंगीप्रमाणे सामान्यांचे चाललेले जीव यामुळे प्रचंड रोष आहे. अपघातग्रस्तांना मदत नाही, नुकसानग्रस्त शेतकरी भरपाईपासून वंचित आहेत, रस्ते दुरुस्तीसाठी ठोस पावले उचलली जात नसताना लॉयड मेटल्स कंपनीने १ जूनला आलापल्लीत हेल्मेट वाटप कार्यक्रम आयोजित केला. यासाठी क्रिकेटपटू जितेश शर्मा, अभिनेत्री नक्षत्रा मेढेकरला निमंत्रित केले. आमदार धर्मरावबाबा यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम सुरू असतानाच माजी आमदार दीपक आत्राम यांनी एंट्री केली. समर्थकांसह ते मंचाकडे जाण्यास निघाले.

यावेळी उपअधीक्षक डॉ. सुदर्शन राठोड यांनी त्यांना रोखले. निमंत्रित नसताना मंचावर कसे काय जात आहात? असा सवाल डॉ. राठोड यांनी केला. त्यावर दीपक आत्राम यांनी मंचावर बसलेल्यांपैकी किती लोकांना निमंत्रण आहे? असा सवाल केला. यावेळी कंपनीचे अधिकारी एस. खांडवावाला, अतुल खाडीलकर यांनी दीपक आत्राम यांना मंचावर येऊ द्या, असा निरोप धाडला. दीपक आत्राम यांना मंचावर पहिल्या रांगेत खुर्ची मिळाली, त्यांनी आमदार धर्मरावबाबा यांना मागण्यांचे निवेदन दिले. त्यानंतर त्यांना आयोजकांनी भाषणाची संधी दिली.

भाषण संपल्यावर ते निघून गेले. त्यानंतर अध्यक्षीय समारोपाच्या भाषणात आमदार धर्मरावबाबांनी दीपक आत्राम यांच्या आरोपांचे खंडण करून प्रत्युत्तर दिले. भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी अपघातग्रस्त शिक्षक वासुदेव कुळमेथे यांच्या पत्नीला स्वत:च्या संस्थेत नोकरी देण्याचे आश्वासन दिले. त्यांनी मागणी केली म्हणून नाही तर तो माझा नियम आहे, असेही त्यांनी सांगितले. त्यानंतर काही लोकांना बोलायला व्यासपीठ मिळत नाही, त्यामुळे आता ते इथे बोलत होते, असे म्हणत दीपक आत्रामांवर टीकास्त्र सोडले.

दीपक आत्राम यांचा आरोप

२० मे रोजी लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकमुळे बळी पडलेले शिक्षक वासुदेव कुळमेथे यांच्या कुटुंबाला कंपनीने २५ लाख भरपाई देऊन एका व्यक्तीला नोकरी द्यावी, अपघातानंतर वाहतूक पोलिस अंमलदार संतोष मंथनवार यांनी मृतदेह रुग्णालयात पाठवून पंचनामा न करता रस्त्यावर सांडलेल्या रक्तावर पाणी टाकून पुरावे नष्ट केले. त्यामुळे मंथनवार यांना बडतर्फ करावे. दि. ३० मे रोजी कंपनीने ८९ सुरक्षारक्षक व पर्यवेक्षक नेमले. मात्र, त्यात एका विशिष्ट राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, ग्रामपंचायत सदस्य आहेत. त्याऐवजी गोरगरीब लोकांची नियुक्ती करावी, अशी मागणी माजी आमदार दीपक आत्राम यांनी केली.

धर्मरावबाबा बाबांचा प्रत्यारोप

अपघातातील मृत शिक्षकाच्या पत्नीला माझ्या संस्थेत नोकरी देणार आहे. मला तुम्ही दहा वर्षे घरी बसविले, आता मला पुन्हा संधी दिली. आज साडेतीन हजार लोक कंपनीत कामाला आहेत. मी माझ्या जवळच्यांना नोकरी दिल्याचा आरोप होत असेल तर ते खेदजनक आहे. मला तसली राजकीय दुकानदारी जमत नाही. माझ्या भागातील शिकलेल्या, गरजू व गरीब लोकांना संधी मिळाली पाहिजे, हा एकमेव माझा उद्देश असल्याचा खुलासा आ. धर्मरावबाबा यांनी केला.

टॅग्स :PoliticsराजकारणGadchiroliगडचिरोलीMLAआमदार