शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
3
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
4
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
5
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
6
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
7
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
8
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
9
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
10
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
11
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
12
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
13
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
14
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
15
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
16
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
18
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
19
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
20
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड

झिंगानूर व देचलीपेठात तीव्र पाणी टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 23:47 IST

अहेरी तालुक्यातील देचलीपेठा व सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर येथे पाणी टंचाईची सावट निर्माण झाले आहे. महिलांना दूरवरून पाणी आणावे लागत असल्याने महिला वर्ग त्रस्त झाला आहे.

ठळक मुद्देदूर अंतरावरून आणावे लागता पाणी : प्राथमिक आरोग्य केंद्रातील रूग्ण व आरोग्य कर्मचाऱ्यांना झळ

लोकमत न्यूज नेटवर्कजिमलगट्टा/झिंगानूर : अहेरी तालुक्यातील देचलीपेठा व सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर येथे पाणी टंचाईची सावट निर्माण झाले आहे. महिलांना दूरवरून पाणी आणावे लागत असल्याने महिला वर्ग त्रस्त झाला आहे.देचलीपेठा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एक विहीर व हातपंप आहे. मात्र विहीर आटली असून हातपंपातून गढूळ पाणी निघत आहे. सदर पाणी आरोग्यास घातक असल्याने रूग्ण व नातेवाईक या नळाचे पाणी पिण्यासाठी वापरू शकत नाही. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरातच निवासस्थाने आहेत. कर्मचाऱ्यांनाही तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत गावापासून दूर अंतरावर आहे. त्यामुळे पाणी आणण्यास अडचण निर्माण होते. दरवर्षीच उन्हाळा सुरू झाल्यानंतर या ठिकाणी दरवर्षीच पाणी टंचाई निर्माण होते. पाणी टंचाईची समस्या सोडविण्यासाठी आणखी एक बोअर खोदण्यात यावा, अशी मागणी अनेकवेळा वरिष्ठांकडे केली आहे. मात्र याकडे वरिष्ठांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे पाणी टंचाईची समस्या कायम आहे.झिंगानूरचा परिसर पाणी टंचाईसाठी संपूर्ण जिल्ह्यात प्रसिध्द आहे. झिंगानूर गावात डिसेंबर महिन्यापासूनच पाणी टंचाईला सुरूवात होते. पावसाळ्याचे जेमतेम चार ते पाच महिने सोडले तर पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. पाण्याची टाकी बांधण्यासाठी चार वर्षांपासून सर्वे होत आहे. परंतु पाण्याच्या टाकीचे बांधकाम सुरू झाले नाही. झिंगानूर चेक नंबर १, झिंगानूर चेक २, झिंगानूर माल या तीन गावात पाणी टंचाईची समस्या गंभीर झाली आहे. विकासाच्या बाबतीत सदर भाग मागासला आहे. त्यामुळे नागरिकांना दारिद्र्याचे जीवन जगावे लागत आहे. त्याचबरोबर आता पाणी टंचाईचीही झळ बसत आहे.मत मागण्यासाठी गावात आलेल्या लोकप्रतिनिधीने अनेकवेळा पाण्याची टाकी उभारण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र प्रत्यक्षात निवडणुकीत विजयी झाल्यानंतर या भागाकडे लोकप्रतिनिधी फिरकत नाही. पाणी टंचाईच्या समस्येवर अनेकांनी निवडणुका जिंकल्या आहेत. मात्र झिंगानूरातील पाणी टंचाई मिटली नाही.नदी असूनही दुष्काळाचे सावटझिंगानूर गावापासून आठ किमी अंतरावर इंद्रावती नदी आहे. या नदीवर उपसा जल सिंचन योजना बांधल्यास या परिसरात सिंचनाची सुविधा होऊ शकते. ही बाब जिल्हा परिषद सदस्य, आमदार यांच्या अनेकवेळा लक्षात आणून दिली आहे. मात्र जलसिंचन योजना बांधली नाही. या भागात धानाचे पीक घेतले जाते. धानासाठी सुपीक जमीन व पोषक वातावरण असल्याने धानाचे पीक चांगले येते. मात्र पावसाळा संपल्यानंतर पाण्याचा दुष्काळ पडून पीक करपते. परिणामी धानाच्या उत्पादनासाठी झालेला खर्च सुध्दा निघत नाही.उपसा जलसिंचन योजना झाल्यास काही शेतकरी आपल्या शेतात दुबार पीकही घेऊ शकतात. मात्र सिंचन उपलब्ध नसल्याने इच्छा असूनही ते उत्पादन घेऊ शकत नाही. लोकप्रतिनिधींनी या भागात उपसा जलसिंचन योजना मंजूर करावी, अशी मागणी आहे.