शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दुष्काळामुळे स्थिती गंभीर: शरद पवारांनी राज्य सरकारकडे केल्या ७ महत्त्वाच्या मागण्या!
2
पुणे पोर्शे कार अपघात: फडणवीसांनी विरोधकांना सुनावले, “प्रत्येक गोष्टीत राजकारण योग्य नाही”
3
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."
4
चालताना नेमकं काय लक्षात ठेवायचं... वेळ, पावलं की अंतर?; वजन लवकर होईल कमी
5
लैला खान हत्या प्रकरणात सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा, १३ वर्षांनी अभिनेत्रीला मिळाला न्याय
6
विधान परिषदेच्या निवडणुकीची नवी तारीख जाहीर; शिक्षक, पदवीधर मतदारसंघांसाठी या दिवशी मतदान
7
"सांगली जिल्हाप्रमुखाचं विधान उबाठाला मार्ग दाखवणारं, जर..."; संजय शिरसाटांचा निशाणा
8
१ वर ३ फ्री शेअर देतेय ही एनर्जी कंपनी, रेकॉर्ड डेट दरम्यान शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या
9
"ब्राह्मण-बनिया समाजातही गरीब लोक, त्यांना आरक्षण मिळू नये का?" मोदींचा काँग्रेसवर घणाघात
10
“याचिकेची वेळ चुकली, आता निवडणुका झाल्यावर सुनावणी”; सुप्रीम कोर्टाचा दिलासा देण्यास नकार
11
Inflation Calculator: २० आणि २५ वर्षांनंतर किती असेल १ कोटी रुपयांचं मूल्य? गणित समूजन करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग
12
कडक उन्हातून घरी आल्यावर किती वेळानंतर पाणी प्यावं?; जाणून घ्या हेल्थ एक्सपर्टचा सल्ला
13
Narendra Modi : "काँग्रेसच्या काळात पाकिस्तान डोक्यावर नाचायचा, आज त्याची काय अवस्था..."; मोदी कडाडले
14
IPL 2024: दिनेश कार्तिक पाठोपाठ टीम इंडियाच्या आणखी एका स्टार खेळाडूचे निवृत्तीचे संकेत
15
Rituals: मंदिरात घंटा का बांधतात? नवस फेडण्यासाठीही घंटेचा वापर का केला जातो ते जाणून घ्या!
16
प्रिटी वुमन! प्रिती झिंटानेही Cannes मध्ये लावली हजेरी, व्हाईट आऊटफिटमध्ये दिसली परी!
17
कोण कोणाला वाचवतेय! बाळाला पोर्शे कारची चावी कोणी दिली? बिल्डर बाप अन् आजोबा दोघेही म्हणतायत 'मी-मी'
18
"जिथं स्फोट झाला तिथे बॉयलर नव्हताच..."; डोंबिवलीतील स्फोटामागचं खरं कारण काय?
19
अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर
20
“लोकसभा निवडणूक ग्रामपंचायतसारखी केली, PM मोदींनी लक्ष्मणरेषा ओलांडली”: प्रकाश आंबेडकर

धानोरा-रांगी मार्ग धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 12:43 AM

धानोरा तालुक्यात १३ व १४ ऑगस्ट रोजी अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीमुळे सोडे ते मोहलीपर्यंतचा मार्ग अतिशय खराब झाला आहे. पावसाळ्याच्या सुरूवातीला या मार्गाचे खोदकाम करून मुरूम व गिट्टी टाकण्यात आली होती. अतिवृष्टीमुळे सदर मुरूम व गिट्टी वाहून गेली.

ठळक मुद्देअर्धा मार्ग गेला खरडून : डागडुजी करण्याकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : धानोरा-रांगी या १८ किमीच्या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. सदर मार्गाची दुरूस्ती झाली नसल्याने या ठिकाणी अपघाताची शक्यता वाढली आहे. काही ठिकाणी अर्धा मार्ग पूर्णपणे वाहून गेला आहे. याठिकाणावरून ट्रकसारखे जड वाहन नेताना कसरत करावी लागत आहे. अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.धानोरा तालुक्यात १३ व १४ ऑगस्ट रोजी अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीमुळे सोडे ते मोहलीपर्यंतचा मार्ग अतिशय खराब झाला आहे. पावसाळ्याच्या सुरूवातीला या मार्गाचे खोदकाम करून मुरूम व गिट्टी टाकण्यात आली होती. अतिवृष्टीमुळे सदर मुरूम व गिट्टी वाहून गेली. काही ठिकाणी मार्ग खरडून गेल्याने मोठे खड्डे पडले आहेत. वाहन या खड्ड्यामध्ये गेल्यास उलटण्याची शक्यता अधिक राहते. या मार्गावरून जड वाहनांची वाहतूक करणे अतिशय धोकादायक आहे. पर्याय नसल्याने वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे.धानोरा तालुक्यातील धानोरा-रांगी हा मुख्य मार्ग आहे. या मार्गावरून धानोरा-ब्रम्हपुरी बस चालते. दरदिवशी शेकडो कर्मचारी या मार्गाने ये-जा करतात. रात्रीच्या सुमारास खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता आहे. सदर मार्गाची किमान डागडुजी करावी, अशी मागणी अनेकवेळा या परिसरातील नागरिकांनी बांधकाम विभागाकडे केली आहे. मात्र बांधकाम विभाग सुस्त आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक