शहरं
Join us  
Trending Stories
1
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
2
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
3
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
4
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
5
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
6
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
7
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
8
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
9
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
10
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
11
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
12
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
13
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट
14
Shrikant Shinde On Rahul Gandhi: 'राहुल गांधींना देशभक्तीपेक्षा राजकारणात रस' श्रीकांत शिंदेंचा टोला
15
"मला आतापर्यंत भेटलेला सर्वात मेहनती भारतीय"; दिव्यांग रिक्षा चालकाला पाहून व्लॉगर भावुक
16
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
17
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
18
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
19
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
20
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी

मदतीसाठी नुकसानग्रस्त संभ्रमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 06:00 IST

गडचिरोली जिल्ह्यात यावर्षी सरासरी पावसाच्या सुमारे १३२ टक्के पाऊस पडला आहे. पाच ते सहा वेळा पूर आल्याने अनेकांचे पीक वाहून गेले आहे. इतरही पिकांच्या उत्पादनात कमालीची घट होणार आहे. अशा परिस्थितीत शासन गडचिरोली जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करेल, अशी अपेक्षा होती. मात्र अजूनपर्यंत ओला दुष्काळ जाहीर केला नाही.

ठळक मुद्देपंचनामे संथगतीने सुरू : १५ दिवस उलटले तरी पंचनाम्यासाठी पोहोचलेच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिके व घरांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र अजूनपर्यंत काही तलाठी प्रत्यक्ष नुकसान झालेल्या ठिकाणी पोहोचले नसल्याने पंचनामे होऊ शकले नाही. त्यामुळे आपल्याला मदत मिळणार की नाही, असा संभ्रम नुकसानग्रस्तांमध्ये निर्माण झाला आहे.जवळपास दीड महिना पावसाने गडचिरोली जिल्ह्याला झोडपून काढले. अनेक वेळा पूर आला. काही शेतकऱ्यांनी दोन वेळा धानाची रोवणी केली. दोन्ही वेळचे धान वाहून गेले. त्यामुळे सदर शेतकऱ्याचा उत्पादन खर्चही भरून निघणार नसल्याने तो कर्जबाजारी होणार आहे. तसेच काही शेतकऱ्यांचे जमीन खरडून गेली. तर काही धानाच्या बांध्यांमध्ये गाळ साचले आहे. पुढील वर्षी या ठिकाणी पिकांची लागवड करायची असेल तर गाळ उपसावा लागणार आहे. यासाठी शेतकऱ्याला अतिरिक्त खर्च करावा लागणार आहे. पावसामुळे यावर्षी हजारो हेक्टरवरील धानपीक वाहून गेले आहे. सातत्याने पाऊस पडत असल्याने सोयाबिन, कापूस, तूर या पिकांचेही उत्पादन कमी होणार आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. पाऊस संपताच पंचनामे करण्याचे निर्देश शासनाने दिले असले तरी अजूनपर्यंत तलाठी प्रत्यक्ष बांधावर पोहोचले नाही. त्यामुळे शेतकरी चिंतेत असल्याचे दिसून येत आहे.ओला दुष्काळही जाहीर केला नाहीगडचिरोली जिल्ह्यात यावर्षी सरासरी पावसाच्या सुमारे १३२ टक्के पाऊस पडला आहे. पाच ते सहा वेळा पूर आल्याने अनेकांचे पीक वाहून गेले आहे. इतरही पिकांच्या उत्पादनात कमालीची घट होणार आहे. अशा परिस्थितीत शासन गडचिरोली जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करेल, अशी अपेक्षा होती. मात्र अजूनपर्यंत ओला दुष्काळ जाहीर केला नाही. त्यामुळे शासनाकडून जी मदत मिळायला हवी, ती मिळण्याची आशा कमी झाली आहे. ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा.

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी