शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
2
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
3
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
4
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
5
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
6
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
7
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
8
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
9
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
10
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
11
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
12
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
13
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
14
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
15
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
16
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
17
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
18
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
19
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
20
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”

मदतीसाठी नुकसानग्रस्त संभ्रमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 06:00 IST

गडचिरोली जिल्ह्यात यावर्षी सरासरी पावसाच्या सुमारे १३२ टक्के पाऊस पडला आहे. पाच ते सहा वेळा पूर आल्याने अनेकांचे पीक वाहून गेले आहे. इतरही पिकांच्या उत्पादनात कमालीची घट होणार आहे. अशा परिस्थितीत शासन गडचिरोली जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करेल, अशी अपेक्षा होती. मात्र अजूनपर्यंत ओला दुष्काळ जाहीर केला नाही.

ठळक मुद्देपंचनामे संथगतीने सुरू : १५ दिवस उलटले तरी पंचनाम्यासाठी पोहोचलेच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिके व घरांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र अजूनपर्यंत काही तलाठी प्रत्यक्ष नुकसान झालेल्या ठिकाणी पोहोचले नसल्याने पंचनामे होऊ शकले नाही. त्यामुळे आपल्याला मदत मिळणार की नाही, असा संभ्रम नुकसानग्रस्तांमध्ये निर्माण झाला आहे.जवळपास दीड महिना पावसाने गडचिरोली जिल्ह्याला झोडपून काढले. अनेक वेळा पूर आला. काही शेतकऱ्यांनी दोन वेळा धानाची रोवणी केली. दोन्ही वेळचे धान वाहून गेले. त्यामुळे सदर शेतकऱ्याचा उत्पादन खर्चही भरून निघणार नसल्याने तो कर्जबाजारी होणार आहे. तसेच काही शेतकऱ्यांचे जमीन खरडून गेली. तर काही धानाच्या बांध्यांमध्ये गाळ साचले आहे. पुढील वर्षी या ठिकाणी पिकांची लागवड करायची असेल तर गाळ उपसावा लागणार आहे. यासाठी शेतकऱ्याला अतिरिक्त खर्च करावा लागणार आहे. पावसामुळे यावर्षी हजारो हेक्टरवरील धानपीक वाहून गेले आहे. सातत्याने पाऊस पडत असल्याने सोयाबिन, कापूस, तूर या पिकांचेही उत्पादन कमी होणार आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. पाऊस संपताच पंचनामे करण्याचे निर्देश शासनाने दिले असले तरी अजूनपर्यंत तलाठी प्रत्यक्ष बांधावर पोहोचले नाही. त्यामुळे शेतकरी चिंतेत असल्याचे दिसून येत आहे.ओला दुष्काळही जाहीर केला नाहीगडचिरोली जिल्ह्यात यावर्षी सरासरी पावसाच्या सुमारे १३२ टक्के पाऊस पडला आहे. पाच ते सहा वेळा पूर आल्याने अनेकांचे पीक वाहून गेले आहे. इतरही पिकांच्या उत्पादनात कमालीची घट होणार आहे. अशा परिस्थितीत शासन गडचिरोली जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करेल, अशी अपेक्षा होती. मात्र अजूनपर्यंत ओला दुष्काळ जाहीर केला नाही. त्यामुळे शासनाकडून जी मदत मिळायला हवी, ती मिळण्याची आशा कमी झाली आहे. ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा.

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी