लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कोरोनाच्या संचारबंदीदरम्यान जिल्हा परिषदेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मुख्यालय सोडून इतरत्र भटकू नये असा आदेश प्रशासनाने जारी केला. याशिवाय कोण केव्हापासून गायब आहे याची माहिती घेतली जात आहे. मुख्यालयी अनुपस्थित आढळलेल्या आणि विनापरवानगी मुख्यालय सोडून जाणाऱ्यांची यादी बनविली जात असून त्यांची वेतन कपात केली जाणार आहे.जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अनेक अधिकारी-कर्मचारी मुख्यालयी राहातच नाही. आता संचारबंदीमुळे त्यांचे अप-डाऊन बंद झाले आहे. मात्र ५ टक्केच कर्मचाऱ्यांनी कार्यालयात उपस्थित राहावे या आदेशाचा फायदा घेत अनेक जण चक्क नागपूर, चंद्रपूरला गेले. दरम्यान इकडून-तिकडे जाण्याच्या नादात कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यालयी राहण्याचा आदेश न पाळल्यास कारवाई करण्याचे संकेत दिल्यानंतर अनेकांनी आडमार्गाने जिल्ह्यात प्रवेश केला. पण तत्पूर्वीच जि.प. प्रशासनाने मुख्यालयी अनुपस्थित लोकांची माहिती मिळवणे सुरू केले होते. विशेष म्हणजे काही कर्मचारी तर अजूनही मुख्यालयी पोहोचू शकलेले नाही.प्राप्त माहितीनुसार आतापर्यंत विविध पंचायत समित्यांमधील १६२ अधिकारी-कर्मचारी अप-डाऊन करत असल्याची तर ३५ जण मुख्यालयी अनुपस्थित असल्याची नोंद जि.प.ने घेतले. तसेच जिल्हा परिषदेच्या विविध विभागांत काम करणारे २७ जण अप-डाऊन करत असल्याचे आणि ११ जण मुख्यालयी अनुपस्थित असल्याचे आढळले.या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांची आधी वेतन कपात केली जाईल. त्यानंतर त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली जाईल. त्या नोटीसचे उत्तर समाधानकारक न मिळाल्यास त्यांच्यावर पुढील कारवाई केली जाणार असल्याचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी फरेंद्र कुतीरकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
‘त्या’ कर्मचाऱ्यांची वेतनकपात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2020 05:00 IST
कोरोनाच्या संचारबंदीदरम्यान जिल्हा परिषदेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मुख्यालय सोडून इतरत्र भटकू नये असा आदेश प्रशासनाने जारी केला. याशिवाय कोण केव्हापासून गायब आहे याची माहिती घेतली जात आहे. मुख्यालयी अनुपस्थित आढळलेल्या आणि विनापरवानगी मुख्यालय सोडून जाणाऱ्यांची यादी बनविली जात असून त्यांची वेतन कपात केली जाणार आहे.
‘त्या’ कर्मचाऱ्यांची वेतनकपात
ठळक मुद्देमुख्यालयी अनुपस्थित । कारणे दाखवा नोटीसला द्यावे लागणार उत्तर