शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
5
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
6
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
7
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
8
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
9
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
10
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
11
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
12
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
13
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
14
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
15
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
16
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
17
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
18
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
19
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
20
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!

५० हेक्टर क्षेत्रात भाजीपाल्याची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 05:01 IST

वैरागड परिसरातील शेतकरी फार पूर्वीपासून धानपिकासोबतच भाजीपाल्याची शेती करीत आहेत. या भागातील शेतामध्ये विहीर खोदून तेथे मोटारपंपची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र भाजीपाला शेती करणाऱ्यांची संख्या १५ वर्षांपूर्वी अत्यल्प होती. त्यानंतरच्या काळात कृषी विभागाच्या विविध योजना, सिंचनाबाबत जनजागृती, अनुदान योजना कार्यान्वित झाल्यानंतर वैरागड भागातील भाजीपाला क्षेत्र वाढले.

ठळक मुद्देदोन्ही हंगामात उत्पादन : वैरागडातील भाजीपाला पोहोचतो चार तालुक्यांच्या बाजारात

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : निव्वळ धानशेतीच्या भरवशावर कुटुंबाची आर्थिक प्रगती होत नाही. हे लक्षात आल्यावर गेल्या पाच-सहा वर्षांपासून वैरागड परिसरात भाजीपाला पिकांच्या लागवडीचे क्षेत्र वाढले आहे. यंदाच्या रबी हंगामात वैरागड पंचक्रोशीतील गावांमध्ये ५० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रात भाजीपाला व पालेभाज्यांची शेती फुलली आहे.वैरागड परिसरातील शेतकरी फार पूर्वीपासून धानपिकासोबतच भाजीपाल्याची शेती करीत आहेत. या भागातील शेतामध्ये विहीर खोदून तेथे मोटारपंपची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र भाजीपाला शेती करणाऱ्यांची संख्या १५ वर्षांपूर्वी अत्यल्प होती. त्यानंतरच्या काळात कृषी विभागाच्या विविध योजना, सिंचनाबाबत जनजागृती, अनुदान योजना कार्यान्वित झाल्यानंतर वैरागड भागातील भाजीपाला क्षेत्र वाढले. या भागातील शेतकऱ्यांनी नरेगा अंतर्गत तसेच धडक सिंचन विहीर व इतर योजनेतून सिंचन विहिरीचे खोदकाम केले. या विहिरीवर मोटारपंप बसवून येथे बारमाही भाजीपाल्याची शेती केली जात आहे.या भागातील भाजीपाला कुरखेडा, आरमोरी, धानोरा या तालुका मुख्यालयासह गडचिरोली जिल्हा मुख्यालयाच्या बाजारपेठेत विक्रीसाठी आणला जातो. कोरोनाच्या संचारबंदीत प्रशासनाने अत्यावश्यक बाब म्हणून भाजीपाला वाहतुकीला परवानगी दिल्याने वैरागडची प्रसिद्ध असलेली पालक व चवळीची भाजी सद्य:स्थितीत गडचिरोलीच्या बाजारात मोठ्या प्रमाणात दररोज येत आहे. वैरागड, मोहझरी, सुकाळा, कोसरी या चारही गावात प्रत्येकी २५ ते ३० भाजीपाला उत्पादक शेतकरी दोन्ही हंगामात भाजीपाल्याचे उत्पादन घेत आहेत. सिंचन सुविधा असल्याने या भागातील भाजीपाला हिरवकंच दिसून येत आहे.फूल शेती तोट्यातआरमोेरी तालुक्यात वैरागड भागासह बºयाच गावांमध्ये झेंडू व शेवंती फुलाची शेती केली जाते. मात्र कोरोनाच्या संचारबंदीमुळे लग्न समारंभ रद्द झाले. शिवाय देवालये व मंदिर कुलूपबंद असल्याने फुलांची मागणी फार कमी झाली आहे. लग्न समारंभ नसल्याने गजºयाचा वापर नाही. उत्पादन होऊनही शेवंती व झेंडूच्या फुलांना ग्राहक मिळत नसल्याने ही शेती नुकसानीची ठरत आहे.

टॅग्स :agricultureशेती