शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

५० हेक्टर क्षेत्रात भाजीपाल्याची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 05:01 IST

वैरागड परिसरातील शेतकरी फार पूर्वीपासून धानपिकासोबतच भाजीपाल्याची शेती करीत आहेत. या भागातील शेतामध्ये विहीर खोदून तेथे मोटारपंपची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र भाजीपाला शेती करणाऱ्यांची संख्या १५ वर्षांपूर्वी अत्यल्प होती. त्यानंतरच्या काळात कृषी विभागाच्या विविध योजना, सिंचनाबाबत जनजागृती, अनुदान योजना कार्यान्वित झाल्यानंतर वैरागड भागातील भाजीपाला क्षेत्र वाढले.

ठळक मुद्देदोन्ही हंगामात उत्पादन : वैरागडातील भाजीपाला पोहोचतो चार तालुक्यांच्या बाजारात

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : निव्वळ धानशेतीच्या भरवशावर कुटुंबाची आर्थिक प्रगती होत नाही. हे लक्षात आल्यावर गेल्या पाच-सहा वर्षांपासून वैरागड परिसरात भाजीपाला पिकांच्या लागवडीचे क्षेत्र वाढले आहे. यंदाच्या रबी हंगामात वैरागड पंचक्रोशीतील गावांमध्ये ५० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रात भाजीपाला व पालेभाज्यांची शेती फुलली आहे.वैरागड परिसरातील शेतकरी फार पूर्वीपासून धानपिकासोबतच भाजीपाल्याची शेती करीत आहेत. या भागातील शेतामध्ये विहीर खोदून तेथे मोटारपंपची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र भाजीपाला शेती करणाऱ्यांची संख्या १५ वर्षांपूर्वी अत्यल्प होती. त्यानंतरच्या काळात कृषी विभागाच्या विविध योजना, सिंचनाबाबत जनजागृती, अनुदान योजना कार्यान्वित झाल्यानंतर वैरागड भागातील भाजीपाला क्षेत्र वाढले. या भागातील शेतकऱ्यांनी नरेगा अंतर्गत तसेच धडक सिंचन विहीर व इतर योजनेतून सिंचन विहिरीचे खोदकाम केले. या विहिरीवर मोटारपंप बसवून येथे बारमाही भाजीपाल्याची शेती केली जात आहे.या भागातील भाजीपाला कुरखेडा, आरमोरी, धानोरा या तालुका मुख्यालयासह गडचिरोली जिल्हा मुख्यालयाच्या बाजारपेठेत विक्रीसाठी आणला जातो. कोरोनाच्या संचारबंदीत प्रशासनाने अत्यावश्यक बाब म्हणून भाजीपाला वाहतुकीला परवानगी दिल्याने वैरागडची प्रसिद्ध असलेली पालक व चवळीची भाजी सद्य:स्थितीत गडचिरोलीच्या बाजारात मोठ्या प्रमाणात दररोज येत आहे. वैरागड, मोहझरी, सुकाळा, कोसरी या चारही गावात प्रत्येकी २५ ते ३० भाजीपाला उत्पादक शेतकरी दोन्ही हंगामात भाजीपाल्याचे उत्पादन घेत आहेत. सिंचन सुविधा असल्याने या भागातील भाजीपाला हिरवकंच दिसून येत आहे.फूल शेती तोट्यातआरमोेरी तालुक्यात वैरागड भागासह बºयाच गावांमध्ये झेंडू व शेवंती फुलाची शेती केली जाते. मात्र कोरोनाच्या संचारबंदीमुळे लग्न समारंभ रद्द झाले. शिवाय देवालये व मंदिर कुलूपबंद असल्याने फुलांची मागणी फार कमी झाली आहे. लग्न समारंभ नसल्याने गजºयाचा वापर नाही. उत्पादन होऊनही शेवंती व झेंडूच्या फुलांना ग्राहक मिळत नसल्याने ही शेती नुकसानीची ठरत आहे.

टॅग्स :agricultureशेती