शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

मासेमारांवर संकट

By admin | Updated: August 27, 2014 23:28 IST

यावर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे अत्यल्प पर्जन्यमान व कडक उन्हामुळे जिल्ह्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे. याचा विपरित परिणाम मासेमारी व्यवसायावर होत आहे. जिल्ह्यातील अनेक ठिकाणच्या तलाव,

मत्स्य संस्था धोक्यात : स्त्रोतातील जलसाठा अत्यंत कमीदिलीप दहेलकर - गडचिरोलीयावर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे अत्यल्प पर्जन्यमान व कडक उन्हामुळे जिल्ह्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे. याचा विपरित परिणाम मासेमारी व्यवसायावर होत आहे. जिल्ह्यातील अनेक ठिकाणच्या तलाव, बोडी, नदी, नाल्यांमध्ये जलसाठा अत्यंत कमी असल्याने मासेमारीचे प्रमाण कमी झाले आहे. यामुळे जिल्ह्यातील ९६ मत्स्य संस्था संकटात सापडल्या आहेत. परिणामी जिल्ह्यातील मासेमारांवर उपासमारीची वेळ आली आहे.गडचिरोली जिल्ह्यात एकूण ९४६ तलाव आहेत. यापैैकी १६ तलाव पाटबंधारे विभागाचे आहेत. एकूण ९४६ तलावांपैकी केवळ १० तलाव बारमाही वाहणारे आहेत. तर उर्वरित ९३६ तलाव हे पावसाच्या पाण्यावर हंगामी वाहणारे आहेत. जिल्ह्यातील मत्स्य सहकारी संस्थांच्यावतीने दरवर्षी जून ते आॅगस्ट या कालावधीत तलावात मत्स्य बीज टाकले जाते. मोठ्या तलावात साधारणत: मार्च महिन्यात मासेमारी केली जाते. तर लहान तलावात दिवाळीपासून फेब्रुवारी महिन्यापर्यंत जिल्ह्यातील मासेमार मासेमारी करीत असतात. गडचिरोली जिल्ह्यात नदी, नाले, तलाव यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे मासेमारीच्या व्यवसायातून मत्स्य संस्था मोठ्या प्रमाणात नफा कमवितात. यातून मासेमार बांधवांना पुरेसा रोजगार मिळतो. मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे गेल्या दोन वर्षापासून जिल्ह्यातील मासेमारी व्यवसाय धोक्यात आला आहे. गतवर्षी २०१२-१३ मध्ये चारदा अतिवृष्टी होऊन पूरपरिस्थिती निर्माण झाली. यामुळे मत्स्य संस्थांनी टाकलेले तलावातील मत्स्य बीज पुराच्या पाण्याने वाहून गेले. यामुळे मासेमारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गतवर्षी सारखीच परिस्थिती यंदाही निर्माण झाली आहे.गतवर्षी ओल्या दुष्काळाने मासेमारांवर संकट ओढावले. तर यावर्षी कोरड्या दुष्काळामुळे जिल्ह्यातील नदी, नाले, तलावात अत्यल्प जलसाठा शिल्लक आहे. यामुळे मत्स्य संस्थांनी टाकलेले मत्स्य बीज तसेच जुनी मासोळी पाण्याअभावी उन्हाच्या दाहकतेमुळे नष्ट झाली. त्यामुळे यंदा मासोळीचे प्रमाण फारच कमी आहे. शासनाच्या थोड्याफार आर्थिक लाभावर यंदा मत्स्य संस्थांना मत्स्य बीज खरेदी करावे लागले. त्यातल्या त्यात बीज कंपन्यांकडून संस्थेची फसवणूक होत असल्याने अर्धेअधिक बीज सुरूवातीलाच नष्ट होतात. तसेच उरलेल्या बीजांची पुरेशी वाढ होत नाही. त्यातही बीजच्या वाढीसाठी अपेक्षेप्रमाणे पाणीसाठा उपलब्ध नसतो. त्यामुळे मुदतीपूर्वी मासेमारी करून नाईलाजाने बाजारात विक्री करावी लागते. यामुळे जिल्ह्यातील ९६ मत्स्य संस्था तोट्यात असल्याचे उघडकीस आले आहे. जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत व अन्य बँका जिल्ह्यातील मत्स्य संस्थांना व्यवसायासाठी कर्ज देण्यासाठी फारसे उत्सुक नाहीत. यामुळे जिल्ह्यातील मत्स्य संस्था आणि मासेमार बांधव संकटात सापडले आहे.