शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
3
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
4
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
5
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
6
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
7
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
8
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
9
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
10
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
11
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
12
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
13
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
14
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
15
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
16
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
17
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
18
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
19
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
20
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...

मासेमारांवर संकट

By admin | Updated: August 27, 2014 23:28 IST

यावर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे अत्यल्प पर्जन्यमान व कडक उन्हामुळे जिल्ह्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे. याचा विपरित परिणाम मासेमारी व्यवसायावर होत आहे. जिल्ह्यातील अनेक ठिकाणच्या तलाव,

मत्स्य संस्था धोक्यात : स्त्रोतातील जलसाठा अत्यंत कमीदिलीप दहेलकर - गडचिरोलीयावर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे अत्यल्प पर्जन्यमान व कडक उन्हामुळे जिल्ह्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे. याचा विपरित परिणाम मासेमारी व्यवसायावर होत आहे. जिल्ह्यातील अनेक ठिकाणच्या तलाव, बोडी, नदी, नाल्यांमध्ये जलसाठा अत्यंत कमी असल्याने मासेमारीचे प्रमाण कमी झाले आहे. यामुळे जिल्ह्यातील ९६ मत्स्य संस्था संकटात सापडल्या आहेत. परिणामी जिल्ह्यातील मासेमारांवर उपासमारीची वेळ आली आहे.गडचिरोली जिल्ह्यात एकूण ९४६ तलाव आहेत. यापैैकी १६ तलाव पाटबंधारे विभागाचे आहेत. एकूण ९४६ तलावांपैकी केवळ १० तलाव बारमाही वाहणारे आहेत. तर उर्वरित ९३६ तलाव हे पावसाच्या पाण्यावर हंगामी वाहणारे आहेत. जिल्ह्यातील मत्स्य सहकारी संस्थांच्यावतीने दरवर्षी जून ते आॅगस्ट या कालावधीत तलावात मत्स्य बीज टाकले जाते. मोठ्या तलावात साधारणत: मार्च महिन्यात मासेमारी केली जाते. तर लहान तलावात दिवाळीपासून फेब्रुवारी महिन्यापर्यंत जिल्ह्यातील मासेमार मासेमारी करीत असतात. गडचिरोली जिल्ह्यात नदी, नाले, तलाव यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे मासेमारीच्या व्यवसायातून मत्स्य संस्था मोठ्या प्रमाणात नफा कमवितात. यातून मासेमार बांधवांना पुरेसा रोजगार मिळतो. मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे गेल्या दोन वर्षापासून जिल्ह्यातील मासेमारी व्यवसाय धोक्यात आला आहे. गतवर्षी २०१२-१३ मध्ये चारदा अतिवृष्टी होऊन पूरपरिस्थिती निर्माण झाली. यामुळे मत्स्य संस्थांनी टाकलेले तलावातील मत्स्य बीज पुराच्या पाण्याने वाहून गेले. यामुळे मासेमारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गतवर्षी सारखीच परिस्थिती यंदाही निर्माण झाली आहे.गतवर्षी ओल्या दुष्काळाने मासेमारांवर संकट ओढावले. तर यावर्षी कोरड्या दुष्काळामुळे जिल्ह्यातील नदी, नाले, तलावात अत्यल्प जलसाठा शिल्लक आहे. यामुळे मत्स्य संस्थांनी टाकलेले मत्स्य बीज तसेच जुनी मासोळी पाण्याअभावी उन्हाच्या दाहकतेमुळे नष्ट झाली. त्यामुळे यंदा मासोळीचे प्रमाण फारच कमी आहे. शासनाच्या थोड्याफार आर्थिक लाभावर यंदा मत्स्य संस्थांना मत्स्य बीज खरेदी करावे लागले. त्यातल्या त्यात बीज कंपन्यांकडून संस्थेची फसवणूक होत असल्याने अर्धेअधिक बीज सुरूवातीलाच नष्ट होतात. तसेच उरलेल्या बीजांची पुरेशी वाढ होत नाही. त्यातही बीजच्या वाढीसाठी अपेक्षेप्रमाणे पाणीसाठा उपलब्ध नसतो. त्यामुळे मुदतीपूर्वी मासेमारी करून नाईलाजाने बाजारात विक्री करावी लागते. यामुळे जिल्ह्यातील ९६ मत्स्य संस्था तोट्यात असल्याचे उघडकीस आले आहे. जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत व अन्य बँका जिल्ह्यातील मत्स्य संस्थांना व्यवसायासाठी कर्ज देण्यासाठी फारसे उत्सुक नाहीत. यामुळे जिल्ह्यातील मत्स्य संस्था आणि मासेमार बांधव संकटात सापडले आहे.