शहरं
Join us  
Trending Stories
1
मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजी दिसायचे तसे मोदींना ठाकरे, पवार दिसतात; राऊतांची टीका
2
Amit Shah : "केजरीवालांची जेलमध्ये हत्या होऊ शकते"; AAP च्या आरोपांवर काय म्हणाले अमित शाह?
3
"भारत महासत्ता बनतोय, आम्ही भीक मागतोय", पाकिस्तानच्या संसदेत भारताचे गोडवे
4
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
5
Amit Shah : "हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल
6
खासदार बनण्याचे स्वप्न; हरलो तर आमदार आहेच; उदयनराजे लोकसभेत बसणार की राज्यसभेतच राहणार?
7
Ravindra Waikar तिढा सुटला, उमेदवार ठरला! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रविंद्र वायकरच महायुतीचे उमेदवार
8
“भाजपा नेत्यांना मराठ्यांचा द्वेष, म्हणूनच PM मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतात”: मनोज जरांगे
9
‘कॉलर उडवताना सकाळ आहे की संध्याकाळ हे पाहावं लागतं’, शरद पवारांची उदयनराजेंवर बोचरी टीका 
10
Video - बापमाणूस! घटस्फोटानंतर वडिलांनी वाजत-गाजत लेकीला आणलं आपल्या घरी
11
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
12
नवीन गुजरातचा आत्मा महाराष्ट्रात भटकतोय; संजय राऊतांचा भाजपावर पलटवार
13
१३९ दिवस शनी वक्री: ५ राशींना लॉटरी, वरदान काळ; गुंतवणुकीतून लाभ, पदोन्नती, पगारवाढ शक्य!
14
SRK ने लेकाला जोरात पकडलं अन्...! IPL दरम्यान शाहरुख-अबरामचं क्युट भांडण कॅमेऱ्यात कैद
15
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
16
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
17
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
18
'माझिया प्रियाला प्रीत कळेना' विषयी अभिजीतचा मोठा खुलासा; म्हणाला, 'तुम्ही संधी दिली पण...'
19
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
20
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."

३४ हजार शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2020 5:00 AM

लाखो रुपये खर्च करून शेतकरी विविध पिकांची लागवड करतात. मात्र कधीकधी नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे मोठे नुकसान होते. कधीकधी लागवडीचा खर्च सुद्धा भरून निघत नाही. अशावेळी शेतकरी आर्थिक अडचणीत सापडते. ही वेळ शेतकऱ्यावर येऊ नये, यासाठी चार वर्षांपूर्वी केंद्र शासनाने प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत खरीप हंगामादरम्यान पिकांचा विमा काढला जाते.

ठळक मुद्दे१३ कोटी रुपयांची रक्कम खात्यात जमा : धान उत्पादक शेतकऱ्यांना मदत मात्र कापूस व सोयाबीन वगळले

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : नैसर्गिक आपत्तीने पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना मदत देता यावी, यासाठी शासनामार्फत प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविली जाते. मागील वर्षी धान उत्पादक ३४ हजार ६४७ शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला. सुमारे १३ कोटी ७१ लाख रुपयांची मदत शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे.लाखो रुपये खर्च करून शेतकरी विविध पिकांची लागवड करतात. मात्र कधीकधी नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे मोठे नुकसान होते. कधीकधी लागवडीचा खर्च सुद्धा भरून निघत नाही. अशावेळी शेतकरी आर्थिक अडचणीत सापडते. ही वेळ शेतकऱ्यावर येऊ नये, यासाठी चार वर्षांपूर्वी केंद्र शासनाने प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत खरीप हंगामादरम्यान पिकांचा विमा काढला जाते. विम्यासाठी नाममात्र रक्कम शेतकºयांना भरावी लागते. पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पीक विमा काढणे सक्तीचे केले आहे. त्याचबरोबर पीक कर्ज न घेणाऱ्या शेतकऱ्यांनाही स्वतंत्र अर्ज करून विमा काढता येते.बँकांना पीक विम्याबाबत जागृती केल्याने दरवर्षी पीक विमा काढण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. २०१९ मध्ये १ हजार ६२ हेक्टर कापूस पिकाचा विमा काढला होता. २८ हजार ३२४ हेक्टर धानपिकाचा तर १०९ हेक्टर सोयाबीन पिकाचा विमा काढला होता. यासाठी शेतकऱ्यांनी शासनाकडे पीक विमा कंपन्यांकडे ५ कोटी ५५ लाख रुपयांची रक्कम पीक विमा कंपन्यांकडे जमा केली होती.मागील वर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. खालभागातील जमीन तसेच नदी, नाल्यांजवळ असलेल्या जमिनीत पुराचे पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. कृषी विभाग, महसूल कर्मचारी यांनी पंचनामा करून अहवाल सादर केला होता. त्यानंतर विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना मदत जाहीर केली. ३४ हजार ६४७ शेतकऱ्यांना १३ कोटी ७१ लाख रुपयांची मदत वितरित करण्यात आली आहे.मागील वर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने कापूस व सोयाबिन पिकाचे सुद्धा मोठे नुकसान झाले. काही शेतकऱ्यांचा तर उत्पादन खर्चही भरून निघाला नाही. २५ टक्केही उत्पादन झाले नाही. मात्र एकाही कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकºयांना विमा कंपनीने लाभ दिला नाही. त्यामुळे शेतकºयांमध्ये नाराजी पसरली आहे. मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन सुद्धा लाभ मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा विमा कंपन्यांवरील विश्वास उडत चालला आहे. त्यामुळेच शेतकरी स्वत:हून विमा काढण्यासाठी तयार होत नाही. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांला मदत मिळेल, यासाठी शासनाने हस्तक्षेप करण्याची गरज आहे.लाभ मिळत नसल्याचा अनुभवएकरी जवळपास ४०० ते ५०० रुपये भरून विमा काढावा लागते. यासाठी कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण करावी लागते. तरीही काही शेतकरी स्वत:हून विमा काढतात. मात्र प्रत्यक्ष नुकसान झाल्यास विमा कंपन्या विविध अटी, शर्ती घालून लाभ देत नसल्याचा आजपर्यंतचा अनुभव आहे. फार कमी शेतकºयांना अत्यंत तुटपुुंजा लाभ दिल्या जाते. त्यामुळे शेतकरी स्वत:हून विमा काढत नाही.

टॅग्स :Farmerशेतकरी