शहरं
Join us  
Trending Stories
1
डोंबिवलीत मनसेला धक्का, शहराध्यक्षाने अचानक अर्ज घेतला मागे; भाजपा उमेदवार बिनविरोध विजयी
2
Thane Municipal Corporation Election 2026 : ठाण्यात एकनाथ शिंदेंचा मोठा धमाका! शिवसेनेचा तिसरा नगरसेवक बिनविरोध विजयी
3
'तुम्ही दहशत पसरवली, तर भारत गप्प बसणार नाही', जयशंकर यांचा पाकिस्तानवर निशाणा
4
इराणमध्ये सत्ता उलथवून टाकण्याचा प्रयत्न, १०० बंदुका जप्त; खामेनींच्या सैन्याने सादर केले पुरावे
5
दशकभराच्या प्रवासाचा अखेर! टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार; चाहत्यांना मोठा धक्का
6
तब्बल २० वर्षांनी राज ठाकरे शिवसेना भवनात जाणार; मनसे स्थापनेनंतर पहिल्यांदाच 'असं' घडणार
7
Gold Silver Price Today: २०२६ मध्येही सोन्या-चांदीची चमक कायम; चांदी ५६५६ रुपयांनी महागली, सोन्यातही जोरदार तेजी
8
'पाकिस्तानला उखडून टाका, आम्ही भारताबरोबर'; 'पाक'मधून कोणत्या नेत्याने लिहिले परराष्ट्र मंत्री जयशंकर यांना ओपन लेटर?
9
Health Tips: तरुणांमध्ये कॅन्सर वाढण्याची ५ धक्कादायक कारणे; डॉक्टरांनी सांगितले तातडीचे उपाय
10
"ज्यांच्यामुळे श्वास गुदमरत होता, ते आता च्यवनप्राश देताहेत का?" आशिष शेलारांचा राज ठाकरेंना सवाल
11
भाजपा नगरसेवकाच्या मुलाची गुंडगिरी; पोलिसाला मारली कानाखाली, संतप्त जमावाने दिला चोप
12
पक्षासाठी उतरलो रस्त्यावरी, तरीही बसविले घरी, आयातानाच दिली उमेदवारी
13
जय श्रीराम! अयोध्येत महासागर, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी ४ लाख भाविकांनी घेतले रामलला दर्शन
14
वंचित, एमआयएमने काँग्रेसची वाट केली 'बिकट'! महापालिका निवडणुकीत आमदाराचा लागणार 'कस'
15
व्होडाफोन-आयडियाला मोठा झटका! नोव्हेंबरमध्ये १० लाखांहून अधिक ग्राहकांनी सोडली साथ...
16
काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठे खिंडार; अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्ष सोडला, शिवसेना शिंदे गटात प्रवेश
17
कॉमेडी क्वीन श्रेया बुगडेचा कधीही न पाहिलेला बोल्ड लूक, दिसतेय इतकी हॉट की फोटोंवरुन नजरच हटणार नाही
18
“आता मोदींचा फोन आला तरी माघार नाही, अपक्ष लढणारच”; तिकीट नाकारताच भाजपा नेत्याचा एल्गार
19
Virat Kohli जगातील सर्वात हँडसम क्रिकेटर, त्याचा लूक...; युवा Vaishnavi Sharma किंगवर फिदा
20
समुद्राची गाज आणि पक्ष्यांचा किलबिलाट! नवीन वर्षात भारताच्या 'या' ५ हिडन समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या
Daily Top 2Weekly Top 5

स्मशानभूमीत पार्थिवांच्या वेदना कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 00:00 IST

कठाणी नदी घाटावर नगर परिषदेने अंत्यविधीसाठी दोन प्रशस्त इमारती बांधल्या आहेत. इमारतींचे बांधकाम होऊन जवळपास दीड वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. तब्बल एक वर्षानंतर बोअर खोदली.

ठळक मुद्देआता वीजेची प्रतीक्षा : ५० हजार रुपयांच्या मंजुरीसाठी दीड वर्षाचा कालावधी
<p>लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कठाणी नदी घाटावर नगर परिषदेने अंत्यविधीसाठी दोन प्रशस्त इमारती बांधल्या आहेत. इमारतींचे बांधकाम होऊन जवळपास दीड वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. तब्बल एक वर्षानंतर बोअर खोदली. आता वीज नसल्याने बोअर मधून पाणी काढणे शक्य नाही. त्यामुळे स्मशानभूमी असूनही पावसात उघड्यावर दहनसंस्कार करावा लागत आहे. अजून किती दिवस हे सहन करायचे? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.गडचिरोली शहरातील बहुतांश अंत्यविधी कठाणी नदीच्या पात्रात पार पाडले जातात. अंत्यविधीनंतर जमा झालेली राख नदीच्या पाण्यात ढकलली जाते. त्याचबरोबर वापरली जाणारी पूजेची व इतर सामग्री नदीच्या पाण्यातच सोडली जाते. यामुळे नदीचे पाणी प्रदूषित होते. पावसाळ्यात नदीत पाणी राहत असल्याने अंत्यविधी नदीकाठावरच आटोपावे लागत होते. त्यातही दिवसभर पाऊस असल्यास मृतदेहाला अग्नी देण्यास अडचण येत होती.या सर्व अडचणी लक्षात घेऊन नगर परिषदेने स्थानिक विकास निधीतून अंत्यविधी पार पाडण्यासाठी इमारत बांधण्याचा निर्णय घेतला. यावर लाखो रूपये खर्च झाले. इमारतींचे बांधकाम दीड वर्षापूर्वीच पूर्ण झाले. मात्र या ठिकाणी बोअरवेल व वीज व्यवस्था नसल्याचे कारण पुढे करून लोकार्पण थांबविण्यात आले. तब्बल एक वर्षांनतर म्हणजेच एप्रिल महिन्याच्या सुरूवातीला या ठिकाणी बोअरवेल खोदण्यात आली. बोअरवेलमध्ये पाणीपंपही टाकला आहे. बोअरवेल मधील पाणी बाहेर काढण्यासाठी वीज आवश्यक आहे. मात्र अजूनपर्यत वीज जोडणी करणे नगर परिषदेला शक्य झाले नाही.मागील एक महिन्यापासून सतत पाऊस पडत आहे. पावसामुळे पार्थिवावर अग्निसंस्कार करण्यात अडचणी निर्माण होत आहे. अगदी पाण्याजवळ पार्र्थिवावर अंतिम संस्कार करावे लागत आहेत. लाखो रूपयांची इमारत मात्र केवळ वीज नसल्यामुळे निरूपयोगी ठरत आहे.वीज जोडणी करण्यासाठी जास्तीत जास्त ५० ते ६० हजार रूपयांचा खर्च येणार आहे. एवढा निधी नगर परिषदेच्या सामान्य फंडातून खर्च करणे सहज शक्य असताना त्यासाठी दीड वर्षांचा कालावधी लागत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. बोअरवेल खोदण्यासाठी एक वर्ष लागले आता वीज पुरवठा करण्यासाठी किती दिवस लागेल, असा प्रश्न केला जात आहे.राखेच्या विल्हेवाटीसाठी पाणी आवश्यकचिता रचण्यासाठी लोखंडी कठडे तयार करण्यात आले आहेत. लोखंडी जाळ्यांवर लाकडे व पार्थीव ठेवले जाते. जळाल्यानंतर राख जमा होण्यासाठी खाली खड्डा तयार करण्यात आला आहे. या खड्डयाला छिद्र ठेवण्यात आले आहे. या छिद्रातून पुढे पाटाद्वारे राख नदीत जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तयार केलेल्या नालीद्धारे राख नदीत जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज भासते त्यामुळे स्मशानभूूमीसाठी बोअरवेल व वीज आवश्यक आहे. त्यामुळे जोपर्यंत वीज व पाण्याची व्यवस्था होणार नाही, तोपर्यंत या ठिकाणी अंत्यविधी करणे अशक्य होणार आहे.इमारतीच्या बांधकामाचे अंदाजपत्रक तयार करतानाच त्यात बोअरवेल व विजेच्या सुविधेचा समावेश असणे आवश्यक होते. मात्र यापूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी केवळ इमारत बांधली. इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर आपण पुढाकार घेऊन स्मशानभूमीत बोअरवेल खोदली आहे. वीज जोडणीचे काम बाकी आहे. १५ आॅगस्टच्या पूर्वी या ठिकाणी वीज पुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी नगर परिषद प्रयत्नरत आहे. नागरिकांना वन विभागाच्या डेपोतून लाकडे न्यावी लागतात. स्मशानभूमी परिसरात एक इमारत आहे. या इमारतीत लाकूड ठेवण्याची व्यवस्थाही केली जाईल. लाकडे खरेदी विक्रीचे काम एखाद्या खासगी यंत्रणेकडे सोपविले जाईल.- योगीता पिपरे, अध्यक्षनगर परिषद गडचिरोली