शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

बाळंत महिलेच्या पोटात कापसाचा बोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 00:57 IST

अवघ्या ६ महिन्यांपूर्वी लोकार्पण झालेल्या येथील इंदिरा गांधी चौकातील जिल्हा महिला व बाल रुग्णालयात बाळंत झालेल्या महिलेच्या पोटात तब्बल १७ दिवस कापसाचा बोळा राहिल्याचा प्रकार उघडकीस आला.

ठळक मुद्देआरोग्य कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा : महिला व बाल रुग्णालयातील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : अवघ्या ६ महिन्यांपूर्वी लोकार्पण झालेल्या येथील इंदिरा गांधी चौकातील जिल्हा महिला व बाल रुग्णालयात बाळंत झालेल्या महिलेच्या पोटात तब्बल १७ दिवस कापसाचा बोळा राहिल्याचा प्रकार उघडकीस आला. रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे असह्य वेदना सहन करीत त्या महिलेने कसेतरी दिवस काढले. अखेर मंगळवारी (दि.३०) तिला पुन्हा रुग्णालयात भरती केल्यानंतर त्या महिलेवर पुन्हा उपचार सुरू करण्यात आले.प्राप्त माहितीनुसार, कन्हेरी टोली येथील माहेर असलेल्या कांती शिवकुमार शर्मा ही पहिल्या बाळंतपणासाठी राजस्थानमधील आपल्या सासरवरून माहेरी आली होती. गेल्या १० आॅक्टोबर रोजी तिला प्रसवकळा सुरू झाल्यानंतर रुग्णवाहिकेने जिल्हा महिला व बाल रुग्णालयात आणण्यात आले. पण सायंकाळपर्यंत तिच्या वेदनांकडे तेथील कर्मचाऱ्यांकडून लक्ष दिले जात नव्हते, असा आरोप पीडित महिलेसह गडचिरोली आदिवासी नारी संघटनेच्या सदस्यांनी पत्रकारांशी बोलताना केला. यासंदर्भात त्यांनी पत्रकार परिषद घेऊन रुग्णालयातील कारभाराची माहिती दिली.पीडित महिला कांती हिने आपली आपबिती सांगितली. दि.१० ला दिवसभर होत असलेल्या वेदना पाहून आई लालनी नैताम हिने तेथील महिला वैद्यकीय कर्मचाऱ्यांना लक्ष देण्याची वारंवार विनंती केली पण त्यांनी आईसोबत असभ्य व्यवहार केल्याचे कांती हिने सांगितले. अखेर सायंकाळी ६ वाजता आशा वर्करने प्रसुतीगृहात नेले. त्यानंतर ७.५० ला प्रसुती झाली. मात्र त्यानंतर टाके न घालताच तेथील परिचारिका दुसºया प्रसुतीच्या कामात लागली. त्यादरम्यान बराच रक्तस्त्राव झाला.दोन दिवसानंतर रुग्णालयात सुटी झाल्यानंतर कांती आपल्या आईकडे गेली असता तिच्या कोथ्यामध्ये सतत वेदना होत होत्या. पण बाळंतपणामुळे वेदना होत असेल असे समजून तिने त्या सहन केल्या. मात्र त्यानंतर लघवी होणेही बंद झाले. त्यामुळे कांतीने खाणे-पिणेही सोडले. त्यादरम्यान दि.२७ ला तिला कापसाचा तुकडा शरीराबाहेर येत असल्याचे जाणवले. त्यामुळे कन्हेरीच्या नर्सला बोलविले असता बाळंतपणादरम्यान टाके लावताना कांतीच्या ओटीपोटात कापसाचा बोळा राहिल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्या नर्सने बँडेजने गुंडाळलेला तो कापसाचा बोळा बाहेर काढला.तब्बल १७ दिवस कापसाचा पोटात राहिल्याने कांतीला प्रकृती चांगलीच बिघडली. तिला बसणेही अवघड झाले आहे. अशा स्थितीतही तिच्या नातेवाईकांसह आदिवासी नारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तिला पत्रकारांपुढे आपबिती सांगितल्यानंतर पुन्हा महिला व बाल रुग्णालयात दाखल केले. तिच्यावर लगेच डॉ.जयंत पर्वते यांनी उपचार सुरू केले. सोनोग्राफी करून पोटात अजून एखादा तुकडा राहिला का, याचीही शहानिशा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.चौकशी समिती नियुक्तआरोग्य कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे झालेला हा प्रकार गंभीरच असून हे कसे झाले, त्यासाठी कोण आणि कसे जबाबदार आहे हे तपासण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सकांच्या नेतृत्वात चौकशी समिती नियुक्त करण्यात आली असून त्यानुसार संबंधितावर कारवाई केली जाईल, असे महिला व बाल रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.डी.के.सोयाम यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.संबंधितांवर कारवाई कराबाळंतपणादरम्यान महिलेच्या शरीरात कापसाचा बोळा किंवा कोणतीही बाह्यवस्तू राहणे हा संबंधित आरोग्य कर्मचाऱ्याचा हलगर्जीपणाच आहे. जीवाशी खेळणारा हा प्रकार भविष्यात कोणाशीही घडू नये यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी पीडित कांती शर्मा हिच्यासह तिची आई लालनी नैताम तसेच गडचिरोली आदिवासी नारी संघटनेच्या सुलोचना मडावी, भारती मडावी, डॉ.देवीदास मडावी, लक्ष्मी कन्नाके, जयश्री येरमे, रेखा तोडासे, नेहा गेडाम, कविता मेश्राम, रोहिणी मसराम, ममता कडपते आदींनी पत्रपरिषदेतून केली.कर्मचाऱ्यांवर दुप्पट ताण१०० खाटांच्या या रुग्णालयात मंजूर असलेली तज्ज्ञ डॉक्टर व कर्मचाºयांची पदे भरलेली असली तरी त्यांच्यावर कामाचा दुप्पट ताण आहे. १०० ची क्षमता असताना दररोज २०० पेक्षा जास्त रुग्ण भरती असतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांकडून आपली ड्युटी करताना हेळसांडपणा होत आहे. या रुग्णालयात येणाऱ्या महिला व बाल रुग्णांची संख्या पाहता रुग्णालयाचा विस्तार करून २०० खाटांचे रुग्णालय करण्याची आणि त्या प्रमाणात वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्याची गरज असल्याचे बोलले जाते.

टॅग्स :Healthआरोग्य