शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

Coronavirus : कोरोनाला दैवी प्रकोप समजून ग्रामस्थांचे देवीला साकडे, गाऱ्हाण्यासाठी भाविकांची गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2021 19:56 IST

Coronavirus in Maharashtra : सदर गावात गेल्या आठवडाभरापासून तापाची साथ पसरलेली आहे. गावातील बहुतांश लोकांना ताप आला असल्याने हा दैवी प्रकोप तर नाही ना, या कल्पनेने गावकऱ्यांनी देवीला साकडे घालण्याचे ठरवले.

गडचिरोली - कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला असताना आणि गावात तापाची साथ सुरू असताना गावकऱ्यांनी देवीला साकडे घालत आरोग्य विभागाच्या तपासणीला नकार दिला. गावकऱ्यांच्या या अनोख्या (अंध)श्रद्धेपुढे आरोग्य विभागाचे पथकही हतबल झाले आहे. हा प्रकार चामोर्शी तालुक्यातील जैरामपूर या गावात घडला. (Request to the Goddess in Jairampur to avoid the crisis of Corona, crowd of devotees; Villagers refuse health department inspection)सदर गावात गेल्या आठवडाभरापासून तापाची साथ पसरलेली आहे. गावातील बहुतांश लोकांना ताप आला असल्याने हा दैवी प्रकोप तर नाही ना, या कल्पनेने गावकऱ्यांनी देवीला साकडे घालण्याचे ठरवले. या परिसरातील गावखेड्यात संकटकाळात माउलीला (देवी) पाणी घालण्याची प्रथा आहे.त्यानुसार गावातील महिलांनी नदीवरून कळशीत पाणी भरून वाजतगाजत नेऊन माउलीला अर्पण केले. दोन किंवा पाच दिवस माउलीला पाणी अर्पण केले म्हणजे ताप हा जातो अशी लोकांची समजूत आहे. गावात काही सुशिक्षित नागरिक असले तरी पूर्वीपासून चालत असलेली प्रथा असल्याने कुणीही गावकऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न करीत नाही. जैरामपूरसह गोंडपिपरी परिसरातही हा प्रकार चालत असल्याची माहिती आहे.सध्या कोरोनाचे रुग्ण अनेक गावात पसरले आहेत. तरीही हा ताप कोरोनाचा नाही अशी गावकऱ्यांची समजूत आहे. हा प्रकार अंधश्रद्धेला खतपाणी घालणारा असल्याचे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे विलास निंबोरकर यांनी सांगितले.

आरोग्य विभागाची चमू गावातजैरामपूर गावात तापाची साथ पसरल्यानंतर २७ एप्रिलला आरोग्य कर्मचाऱ्यांनी (आशा) गावात सर्वेक्षण केले. दि. २९ ला ५० लोकांची कोरोना तपासणी केली, त्यात २० जण पॉझिटिव्ह आले. त्यांना शाळेत ठेवून उपचार करण्याची तयार असताना गावकरी ऐकत नव्हते. त्यामुळे त्यांच्या घरातच (गृह विलगीकरणात) ठेवण्यात आले. ३ मे रोजी ४० लोकांची लसीकरण केले. गुरुवारी (दि. ६) गावात पुन्हा कोरोना तपासणीसाठी कॅम्प लावला, पण कोणीही तपासणीसाठी आले नाही. ग्रामस्तरीय समिती, कोनसरी प्रा. आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांनी वारंवार उद्बोधन करूनही गावकऱ्यांनी प्रतिसाद दिला नसल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भूषण लायबर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसGadchiroliगडचिरोली