शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
4
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
5
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
6
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
7
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
8
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
9
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
10
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
11
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
12
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
13
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
14
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
15
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
16
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
17
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
18
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
19
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
20
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 

कोरोना टाकतोय कात, तरीही लोक बिनधास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 18:10 IST

गडचिरोली जिल्ह्यात आता सामाजिक संसर्गातून कोरोनाबाधित होणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा स्थितीतही समाजात वावरताना मास्कचा वापर आणि शारीरिक अंतराच्या नियमांबाबत लोक गंभीर नसल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देमास्कचा अल्प वापर ५० टक्केपेक्षा जास्त लोकांचे नाक-तोंड उघडेचकोरोनाच्या प्रसाराला आमंत्रण

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जवळपास ४ ते ५ महिने कोरोनारुग्णांचा आकडा नियंत्रणात असणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात आता सामाजिक संसर्गातून कोरोनाबाधित होणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा स्थितीतही समाजात वावरताना मास्कचा वापर आणि शारीरिक अंतराच्या नियमांबाबत लोक गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. याबाबत आता प्रशासनाने कडक भूमिका घेऊन कारवाई न केल्यास लोकांमधील बिनधास्तपणा वाढून कोरोनाचा सामाजिक संसर्ग आणखी वाढण्याची दाट शक्यता आहे.

लॉकडाऊन शिथिल करताना प्रशासनाने अनेक नियमांचे पालन करण्याच्या अटी घातल्या आहेत. त्यात दुकानदारांनी स्वत: मास्कचा करण्यासोबतच ग्राहकांसाठी सॅनिटायझर ठेवण्याची सूचना आहे. याशिवाय दुकानांमध्ये येणाºया ग्राहकांनी मास्क लावूनच जायचे आहे. मास्क नसणाºया ग्राहकांना दुकानात प्रवेशच न देणे अपेक्षित आहे. पण कोणीही मास्क नाही म्हणून आलेल्या ग्राहकाला परत पाठवत नाही ही वस्तुस्थिती आहे.विशेष म्हणजे जिल्ह्यात १८ मे रोजी पहिला पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर पुढील दोन ते अडीच महिने बहुतांश रुग्ण हे बाहेरून आलेले आणि क्वॉरंटाईन सेंटरमध्ये असणारेच लोक होते. मात्र महिनाभरापासून सामाजिक संसर्गाचे प्रमाण हळूहळू वाढत आहे. गेल्या १५ दिवसात ते प्रमाण सर्वाधिक वाढले आहे. कात टाकलेल्या सापाप्रमाणे कोरोना व्हायरस आता चपळ होऊन कोणाच्याही हाती न लागता सर्वांना बाधा करण्यासाठी सज्ज झाला आहे.

जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण गडचिरोली दीपक सिंगला यांनी जमावबंदी आणि टाळेबंदीसंदर्भात १ ते ३० सप्टेंबर या कालावधीसाठी अतिरिक्त नियमावली लागू केली आहे. त्यात सार्वजनिक ठिकाणी थुंकताना आढळल्यास किंवा नाका-तोंडावर विनामास्क किंवा रुमाल लावून न आढळल्यास २०० रुपये दंड आकारण्यात येणार आहे. हा दंड वसूल करण्याचा अधिकार संबंधित तहसीलदार, पोलीस निरीक्षक किंवा मुख्याधिकारी, नगर परिषद व नगर पंचायत यांना आहे.

विशेष म्हणजे या आदेशाचे पालन न करणारी व्यक्ती, संस्था किंवा समूह हे साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ तसेच भारतीय दंड संहिता १८६० नुसार शिक्षेस पात्र समजून नियमानुसार कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिले आहे. मात्र नियम मोडणाºयांविरूद्ध कारवाई होत नसल्याने ५० टक्के लोक या नियमांचे पालनच करत नसल्याचे दिसून येते. त्यांचा हा बिनधास्तपणा इतरांचे आरोग्य धोक्यात आणत आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या