शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
2
"हिंदी भाषा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बोलली गेलीच पाहिजे, केंद्राने..."; अबू आझमींकडून हिंदीची वकिली
3
पहलगामच्या हल्ल्यात ३ नव्हे ४ दहशतवादी होते सामील; चौथा काय करत होता? ऐकून येईल चीड!
4
आठ महिन्यांत चौघांची हत्या; २० वर्षांच्या गँगस्टरचा एन्काऊंटरमध्ये खात्मा, VIDEO आला समोर
5
"कुठे आहेत नाना पाटेकर, प्रशांत दामले? कुठायत मराठी क्रिकेटपटू?"; हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सवाल
6
खासदार प्रिया सरोज आणि क्रिकेटर रिंकू सिंह यांच्या लग्नाची तारीख टळली; समोर आलं मोठं कारण...
7
धारावीतील २४९ पैकी १६१ बांधकामे पात्र, पहिली यादी जाहीर; अपात्र लोकांना ५ जुलैपर्यंत संधी
8
इराणने कमी क्षमतेच्या मिसाईल डागल्या अन् अमेरिकेने त्या पडू दिल्या...; कतारवरील हल्ल्यामागचे गुपित कुणाला कळले...
9
सोहेलसोबत पळून जाऊन केलेलं लग्न, मग २४ वर्षांनी का झाला घटस्फोट? सीमा सजदेहने सांगितलं खरं कारण
10
कसली भारी दिसत्येय 'सैराट'मधील परश्याचा मित्र 'लंगड्या'ची गर्लफ्रेंड, सौंदर्यात नायिकांनाही देते टक्कर!
11
ठाणे: आणखी २ इमारतींवर हातोडा, मुंब्रा-शीळच्या बेकायदा इमारतींमधील रहिवासी रस्त्यावर
12
मध्य पूर्वेतील तणाव, हिंडगनबर्गचे आरोप अन् धारावी प्रकल्प; गौतम अदानी स्पष्टच बोलले
13
युद्धविरामाबाबतचा संभ्रम संपला, अखेर इस्राइल-इराणमधील संघर्ष आटोपला, पण अखेरचा हल्ला करत इराण म्हणाला...  
14
इराण-इस्रायल युद्धबंदीमुळे बाजार 'रॉकेट'; पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
15
कोण आहे अलीफा अहमद?; पती डॉक्टर तर स्वत: TCS मध्ये करत होती नोकरी; आता बनल्या आमदार
16
Iran Israel War : इराण-इस्त्रायलमध्ये १२ दिवसांचं युद्ध, लष्करी तळ, शहरं उद्ध्वस्त; कुणाचं किती नुकसान?
17
UPI युजर्ससाठी मोठी बातमी! ट्रान्झॅक्शन फेल झालं तर लगेच मिळणार रिफंड; 'या' तारखेपासून लागू होणार नियम
18
पंतचा पराक्रम, एकाच कसोटीत दोन शतकं ठोकताना केले १० विक्रम, अशी आहे संपूर्ण यादी
19
पावसाने पाठ फिरवल्याने विदर्भासह मराठवाड्यात अत्यंत भीषण अवस्था !
20
भंगाराखाली दडलंय काय?; ट्रक रोखला, तपासणी केली तेव्हा आढळला १ कोटींचा 'गुलाबी खजिना'

कोरोनामुळे ग्रामस्थांनी कारले विक्री केली बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 05:00 IST

परिसरातील शेतकरी मोहटोला किन्हाळा येथे ठोक स्वरूपात कारले विक्रीसाठी आणतात. व्यापाऱ्यांनी या गावामध्ये स्वत:चे वजनकाटे लावले आहेत. कारले खरेदी-विक्रीसाठी शेतकरी व व्यापाऱ्यांची मोठी गर्दी उसळते. खरेदी-विक्री करताना शारीरिक अंतर पाळले जात नाही.

ठळक मुद्देकोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी खबरदारी; गावात झाली होती व्यापाऱ्यांची गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्कमोहटोला/किन्हाळा : कारले खरेदी करण्यासाठी मोहटोला, किन्हाळा या गावांमध्ये व्यापाऱ्यांची मोठी गर्दी उसळत असल्याने कोरोनाचा प्रसार होण्याचा धोका लक्षात घेऊन ग्रामस्थांनी कारले विक्रीचे वजनकाटे बंद पाडले आहेत. त्यामुळे कारले उत्पादक शेतकऱ्यांची मोठी पंचाईत झाली आहे.मोहटोला, किन्हाळा, विहीरगाव, चिखली तूकुम, रिठ, डोंगरगाव (हलबी), फरी, झरी, उसेगाव, पिंपळगाव हलबी, पोटगाव या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात कारल्यांचे उत्पादन घेतले जाते. येथील कारले नागपूर, भंडारा, भिलाई, रायपूर व अन्य शहरांमध्ये पाठविले जातात. परिसरातील शेतकरी मोहटोला किन्हाळा येथे ठोक स्वरूपात कारले विक्रीसाठी आणतात. व्यापाऱ्यांनी या गावामध्ये स्वत:चे वजनकाटे लावले आहेत. कारले खरेदी-विक्रीसाठी शेतकरी व व्यापाऱ्यांची मोठी गर्दी उसळते. खरेदी-विक्री करताना शारीरिक अंतर पाळले जात नाही.नागपूर व इतर कोरोना प्रभावित शहरांमध्ये जाऊन वाहने परत येतात. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता लक्षात घेऊन ग्रामस्थांनी मोहटोला किन्हाळा येथे कारले व इतर भाजीपाल्याची खरेदी-विक्री करू न देण्याचा निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यामुळे कारले उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.प्रामुख्याने उन्हाळ्यात कारल्याचे उत्पादन घेतले जाते. आत्तापर्यंत विकलेल्या कारल्यांमधून शेतकऱ्यांचा लागवडीचा खर्च निघाला. कारल्यांचे उत्पादन पावसाळ्यापर्यंत चालते. यानंतरच्या विक्रीतून नफा मिळणार होता. मात्र खरेदी-विक्रीवर बंदी आणल्याने नफ्यापासून शेतकºयांना वंचित राहावे लागणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही.विक्रीचा प्रश्न गंभीरया परिसरातील शेतकरी दर दिवशी शेकडो क्विंटल कारल्यांचे उत्पादन करतात. एवढ्या मोठ्या प्रमाणातील कारले केवळ गडचिरोली जिल्ह्यात विकणे कठिण आहे. त्यामुळे कारले विक्रीचा प्रश्न गंभीर झाला आहे. शारीरिक अंतर ठेवून कारल्यांची विक्री केली जाईल. तसेच कोरोना संदर्भातील नियम पाळले जातील. मात्र कारले विक्री करू द्यावी, अशी मागणी या परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.निर्यात थांबल्याने भाजीपाला स्वस्तगडचिरोली जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील उत्पादित भाजीपाला व पालेभाज्याची निर्यात कोरोनाच्या संचारबंदीमुळे जिल्ह्याबाहेर तसेच मोठ्या शहरात गेल्या महिनाभरापासून होत नसल्याचे दिसून येते. परिणामी उत्पादक शेतकºयांना भाजीपाला जिल्ह्यातच विकावा लागत आहे. परिणामी शेतकºयांना योग्य भाव मिळत नसल्याचे दिसते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या