शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

रेल्वेमार्ग उभारणी वेळेत होण्यासाठी समन्वय राखा

By admin | Updated: August 6, 2016 00:59 IST

वडसा ते गडचिरोली रेल्वे मार्गाचे काम वेळेत पूर्ण व्हावे यासाठी विविध विभागांनी समन्वय राखून

 वडसा-गडचिरोली : जिल्हाधिकाऱ्यांचे सर्व विभागप्रमुखांना निर्देश गडचिरोली : वडसा ते गडचिरोली रेल्वे मार्गाचे काम वेळेत पूर्ण व्हावे यासाठी विविध विभागांनी समन्वय राखून परस्परांच्या संपर्कात राहण्याची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी शुक्रवारी येथे केले. जिल्हाधिकारी यांच्या कक्षात यासंदर्भात एक बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस रेल्वेचे कार्यपालन अभियंता प्रदीप गोस्वामी, देसाईगंजचे उपवनसंरक्षक होशींग, गडचिरोलीच्या उपवनसंरक्षक श्रीलक्ष्मी अनबत्तुला, सहाय्यक जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगांवकर, उपजिल्हाधिकारी शैलेंद्र मेश्राम, निवासी उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोनावणे आदी उपस्थित होते. वडसा-गडचिरोली रेल्वेमार्गाचे काम येत्या ३ वर्षात पूर्ण करण्याची योजना आहे. यात सर्वेक्षण झालेले असून प्रकल्प आता निविदास्तरावर आहे. या प्रकल्पात केंद्र-राज्य शासनाचा ५०-५० टक्के वाटा राहणार आहे. सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर आता प्रस्तावित मार्गासाठी लागणारी जमीन शासकीय, वन विभाग आणि खाजगी व्यक्ती अशा तीन गटात आहे. सदर मार्गासाठी लागणारी वनजमीन कोणती आहे हे वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी जाणून घ्यावे व त्याबाबतच अहवाल आठ दिवसात सादर करावा अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. या मागार्साठी लागणारी शासकीय जमीन वडसा तसेच गडचिरोली उपविभागांतर्गत आहे. या दोन्ही विभांगामध्ये समन्वय असावा असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले की, खाजगी जमीनीची किती आवश्यकता आहे याची माहिती घेण्यात यावी व त्या जागेचे भूसंपादन कशा पध्दतीने होणार आहे याबाबतची स्पष्टता पुढील बैठकीपूर्वी करुन घ्यावी. या रेल्वे मार्गाचे काम गतिमान पध्दतीने व्हावे यासाठी यापुढील काळामध्ये नियमित बैठकांची गरज आहे. त्यामुळे याचा नियमित बैठकीत पाठपुरावा घेण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.