शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
2
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
3
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
4
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
5
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
6
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
7
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
8
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
9
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
10
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
11
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
12
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
13
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
14
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
15
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
16
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
17
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
18
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
19
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
20
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
Daily Top 2Weekly Top 5

वेळापत्रकाबाबतचा विरोध उफाळला; आश्रमशाळा कर्मचाऱ्यांमध्ये रोष !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2024 15:59 IST

अन्याय होत असल्याचा आरोप : विद्यार्थी, शिक्षकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम?

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभागाच्या राज्यातील शासकीय व अनुदानित आश्रमशाळा मागील शैक्षणिक सत्र २०२३-२४ पासून नव्या शालेय वेळापत्रकाप्रमाणे दोन सत्रात भरत आहेत. सकाळी ९ ते सायंकाळी ६ ही वेळ असलेल्या या वेळापत्रकाला राज्यातील आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांनी विरोध केला आहे. त्यामुळे नवीन शैक्षणिक सत्र सुरू होताच आश्रमशाळा शिक्षक व कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे शस्त्र उपसले आहे.

मागील वर्षापासून राज्यभरातील शासकीय व अनुदानित आश्रमशाळांसाठी लागू करण्यात आलेल्या वेळापत्रकामुळे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य नाराज आहेत तसेच विद्यार्थीसुद्धा त्रस्त आहेत, असा दावा आश्रमशाळा कर्मचाऱ्यांचा आहे.

नव्या वेळापत्रकाचे दुष्परिणाम विद्यार्थी व कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर झाल्याचे दिसून येत आहे. नवीन वेळापत्रक अत्यंत गैरसोयीचे असून, आदिवासी विद्यार्थ्यांवर अन्याय करणारे आहे तसेच शालेय शिक्षण विभागाने दिलेल्या निर्देशांच्या विपरीत आहे. त्यामुळे नवीन वेळापत्रक बदलण्याची जोरदार मागणी होत आहे.

असे आहे आश्रमशाळेचे सध्याचे वेळापत्रकनव्या वेळापत्रकाप्रमाणे विद्यार्थ्यांना पहाटे ५:३० वाजता उठावे लागते, तर रात्री ९:३० वाजता झोपेची वेळ असते. सोमवार ते शुक्रवारला पहिले शालेय सत्र सकाळी ८:४५ वाजता सुरू होऊन दुपारी १२:३० वाजता संपते. जेवणानंतर दुसऱ्या सत्राला दुपारी १:३० वाजता सुरुवात होते व दुपारी ४ वाजता तासिका संपल्यानंतरही हे सत्र सायंकाळी ६ वाजेपर्यंत असते. सकाळचे जेवण दुपारी १२:३० वाजता, तर रात्रीचे जेवण सायंकाळी ६:३० वाजता असते. सकाळी व सायंकाळी दोन वेळेस नास्ता असतो. शनिवारी शालेय सत्रास सकाळी ७:४५ वाजता सुरुवात होऊन ११ः ५०ला सुट्टी होते. शनिवारी दुपारी ३ ते ४:३० पर्यंत प्रेरणादायी उद्बोधन असते.

आज करणार राज्यव्यापी धरणे आंदोलन• सिद्धूप्रणित आदिवासी विकास आश्रमशाळा शिक्षक व कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेने संघटनेचे अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांच्या नेतृत्वाखाली सोमवार, ८ जुलै रोजी मुंबईतील आझाद मैदानावर राज्यव्यापी धरणे आंदोलन केले जाणार आहे. जिल्ह्याच्या आश्रमशाळेतील कर्मचारी मुंबईला धडकणार आहेत.• आश्रमशाळांची वेळ पूर्ववत सकाळी ११ ते सायंकाळी ५ अशी करणे या प्रमुख मागणीसह अनेक मागण्यांसाठी हे धरणे आंदोलन होत आहे, अशी माहिती राज्याध्यक्ष डॉ. डी. एल. कराड, राज्य सरचिटणीस प्रा. बी. टी. भामरे, नागपूर विभागीय अध्यक्ष रामदास खवशी व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

सर्व शाळांचे वेळ एकच हवीशालेय शिक्षण विभागाने शाळांची वेळ सकाळी १०.३० ते ५ अशी केली आहे. सर्व शाळांना हाच नियम लागू होणे आवश्यक आहे. मात्र आदिवासी विकास विभागाने अफलातून हा निर्णय घेतला आहे. परिणामी नवे वेळापत्रक सर्वांसाठी अडचणीचे ठरत आहे.

टॅग्स :SchoolशाळाGadchiroliगडचिरोली