शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

वेळापत्रकाबाबतचा विरोध उफाळला; आश्रमशाळा कर्मचाऱ्यांमध्ये रोष !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2024 15:59 IST

अन्याय होत असल्याचा आरोप : विद्यार्थी, शिक्षकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम?

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभागाच्या राज्यातील शासकीय व अनुदानित आश्रमशाळा मागील शैक्षणिक सत्र २०२३-२४ पासून नव्या शालेय वेळापत्रकाप्रमाणे दोन सत्रात भरत आहेत. सकाळी ९ ते सायंकाळी ६ ही वेळ असलेल्या या वेळापत्रकाला राज्यातील आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांनी विरोध केला आहे. त्यामुळे नवीन शैक्षणिक सत्र सुरू होताच आश्रमशाळा शिक्षक व कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे शस्त्र उपसले आहे.

मागील वर्षापासून राज्यभरातील शासकीय व अनुदानित आश्रमशाळांसाठी लागू करण्यात आलेल्या वेळापत्रकामुळे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य नाराज आहेत तसेच विद्यार्थीसुद्धा त्रस्त आहेत, असा दावा आश्रमशाळा कर्मचाऱ्यांचा आहे.

नव्या वेळापत्रकाचे दुष्परिणाम विद्यार्थी व कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर झाल्याचे दिसून येत आहे. नवीन वेळापत्रक अत्यंत गैरसोयीचे असून, आदिवासी विद्यार्थ्यांवर अन्याय करणारे आहे तसेच शालेय शिक्षण विभागाने दिलेल्या निर्देशांच्या विपरीत आहे. त्यामुळे नवीन वेळापत्रक बदलण्याची जोरदार मागणी होत आहे.

असे आहे आश्रमशाळेचे सध्याचे वेळापत्रकनव्या वेळापत्रकाप्रमाणे विद्यार्थ्यांना पहाटे ५:३० वाजता उठावे लागते, तर रात्री ९:३० वाजता झोपेची वेळ असते. सोमवार ते शुक्रवारला पहिले शालेय सत्र सकाळी ८:४५ वाजता सुरू होऊन दुपारी १२:३० वाजता संपते. जेवणानंतर दुसऱ्या सत्राला दुपारी १:३० वाजता सुरुवात होते व दुपारी ४ वाजता तासिका संपल्यानंतरही हे सत्र सायंकाळी ६ वाजेपर्यंत असते. सकाळचे जेवण दुपारी १२:३० वाजता, तर रात्रीचे जेवण सायंकाळी ६:३० वाजता असते. सकाळी व सायंकाळी दोन वेळेस नास्ता असतो. शनिवारी शालेय सत्रास सकाळी ७:४५ वाजता सुरुवात होऊन ११ः ५०ला सुट्टी होते. शनिवारी दुपारी ३ ते ४:३० पर्यंत प्रेरणादायी उद्बोधन असते.

आज करणार राज्यव्यापी धरणे आंदोलन• सिद्धूप्रणित आदिवासी विकास आश्रमशाळा शिक्षक व कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेने संघटनेचे अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांच्या नेतृत्वाखाली सोमवार, ८ जुलै रोजी मुंबईतील आझाद मैदानावर राज्यव्यापी धरणे आंदोलन केले जाणार आहे. जिल्ह्याच्या आश्रमशाळेतील कर्मचारी मुंबईला धडकणार आहेत.• आश्रमशाळांची वेळ पूर्ववत सकाळी ११ ते सायंकाळी ५ अशी करणे या प्रमुख मागणीसह अनेक मागण्यांसाठी हे धरणे आंदोलन होत आहे, अशी माहिती राज्याध्यक्ष डॉ. डी. एल. कराड, राज्य सरचिटणीस प्रा. बी. टी. भामरे, नागपूर विभागीय अध्यक्ष रामदास खवशी व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

सर्व शाळांचे वेळ एकच हवीशालेय शिक्षण विभागाने शाळांची वेळ सकाळी १०.३० ते ५ अशी केली आहे. सर्व शाळांना हाच नियम लागू होणे आवश्यक आहे. मात्र आदिवासी विकास विभागाने अफलातून हा निर्णय घेतला आहे. परिणामी नवे वेळापत्रक सर्वांसाठी अडचणीचे ठरत आहे.

टॅग्स :SchoolशाळाGadchiroliगडचिरोली