शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
14
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
15
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
16
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
17
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
18
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
19
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
20
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार

स्वातंत्र्य लढ्यासाठी आदिवासी नेत्यांचे योगदान फार मोठे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2019 11:45 AM

आदिवासी संस्कृती व अस्मिता जोपासणे आपले आद्यकर्तव्य असल्याचे प्रतिपादन माजी राज्यमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी केले.

ठळक मुद्देआदिवासी संस्कृती जोपासणे आपले आद्यकर्तव्य

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : भारतीय स्वातंत्र्यासाठी क्रांतिकारक आदिवासी नेत्यांचा फार मोठे योगदान असून आदिवासी संस्कृती व अस्मिता जोपासणे आपले आद्यकर्तव्य असल्याचे प्रतिपादन माजी राज्यमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी केले.ते मूलचेरा तालुक्यातील बोलेपल्ली येथे 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनी बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जि.प.अध्यक्ष तथा विद्यमान बांधकाम सभापती भाग्यश्रीताई आत्राम होत्या तर व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून युवा नेते ऋतुराज हलगेकर, जि.प.सदस्य ऋषी पोरतेट, बबलू भैय्या हकीम, शाहीन हकीम, ग्रा.पं.सदस्य कैलास कोरेत, मस्तारी माधो झोरे, शिवाजी नरोटे, सुरेश मटामी, उपसरपंच शंकर आत्राम आदी मान्यवर उपस्थित होते.उदघाटनीय स्थानावरून पुढे बोलतांना माजी राज्यमंत्री धर्मराव बाबा आत्राम म्हणाले की, स्वातंत्र्यपूर्व काळात क्रांतिकारक आदिवासी नेत्यांनी गुलामीला झुगारून देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढले आणि समाजासाठी आपले सर्वस्वी अर्पण केले आदिवासी थोर नेत्यांची प्रेरणा घेऊन त्या दिशेने वाटचाल करणे अत्यावश्यक असल्याचे सांगून, आदीवासी हे देशाचे मूळनिवासी असले तरी आज समाजाची वाताहात व दशा होत आहे यासाठी आपणच कारणीभूत असून समाजाला खरी दिशा देण्यासाठी खंबीर नेतृत्वाची गरज असून आता आदिवासी जनतेनी जागृत व संघटित राहणे ही काळाची गरज बनल्याचे आवर्जून सांगितले.तसेच शासन आदिवासी व दलित समाजाच्या विकासासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम व मोठी निधी उपलब्ध करून देत असले तरी मागील दहा वर्षांपासून सक्षम, अनुभवी व कणखर नेतृत्व अभावी आदिवासी बहुल भाग असूनही आपण विकासापासून कोसो दूर गेलो आणि सोबतच आदिवासी संस्कृती, रीतिरिवाज,परंपराही लोप पावत असून आता समाजाने जागृती दाखवून आदिवासी समाजाची अस्मिता जपण्यासाठी निर्भीडपणे पुढे यावे असे आवाहनही यावेळी माजी राज्यमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी केले.धर्मराव बाबा अस्सल आदिवासी पेहरावात!माजी राज्यमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी अस्सल आदिवासी पेहराव केला होता. फिकट पिवळ्या रंगाचा ड्रेस, डार्क पिवळ्या रंगाचा दुप्पटा आणि डोक्यावरील पिवळ्या कलरची टोपी असा पेहराव करून त्यांनी आपले पूर्ण भाषण गोंडी, माडियात देऊन जागतिक आदिवासी दिनाचे सार्थक केले.तसेच बांबूंनी विणलेले मोर व अन्य पक्ष्यांचा पिसारा असणारे, डोक्यावर शिंग असणारे आदिवासी संस्कृती जपणारे विविध लुकचे टोप्या थोड्यावेळ साठी धारण करून उपस्थित सर्वांना बांबूंनी विणलेल्या टोपयांचे महत्त्वच एकप्रकारे अधोरेखित केले.

टॅग्स :Trible Development Schemeआदिवासी विकास योजना