शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

जिल्ह्यात संततधार पाऊस कायमच

By admin | Updated: September 1, 2014 23:34 IST

रविवारपासून सुरू झालेल्या पावसाने अद्यापही उसंत घेतली नाही. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्याच्या सर्व भागात संततधार पाऊस बरसला. गेल्या दोन दिवसांपासून चामोर्शी, कुरखेडा व भामरागड तसेच

गडचिरोली : रविवारपासून सुरू झालेल्या पावसाने अद्यापही उसंत घेतली नाही. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्याच्या सर्व भागात संततधार पाऊस बरसला. गेल्या दोन दिवसांपासून चामोर्शी, कुरखेडा व भामरागड तसेच सिरोंचा या तालुक्यात पावसाचे प्रमाण अधिक आहे. संततधार पावसामुळे धान व इतर पिकांना पुरेसा पाणी पुरवठा झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून दमदार पाऊस बरसत असला तरी जिल्ह्यात कुठेही पूर परिस्थिती निर्माण झाली नाही. पावसामुळे नदी, नाले या जलस्त्रोतातील पाण्याची पातळी वाढली आहे. पावसामुळे शेतकऱ्यांनी खत टाकण्याच्या कामाला वेग घेतला आहे. सध्या गडचिरोली तालुक्यासह सर्वत्रच शेतकरी लगबगीने धान पिकाला खत टाकत असल्याचे दिसून येते. जिल्हा प्रशासनाने सोमवारी ५२६.३० मिमी पावसाची नोंद घेतली आहे. प्रशासनाने घेतलेल्या नोंदीनुसार सोमवारी गडचिरोली तालुक्यात ३५ मिमी, धानोरा तालुक्यात ४० मिमी, चामोर्शी तालुक्यात सर्वाधिक १७७ मिमी पाऊस झाला आहे. मुलचेरा तालुक्यात ३.४ मिमी, देसाईगंज २२.५ मिमी, आरमोरी २९.२ मिमी, कुरखेडा ६२.८ मिमी, कोरची ३६ मिमी, अहेरी ११ मिमी, एटापल्लीत ७.६ मिमी, भामरागड ५०.९ मिमी व सिरोंचा तालुक्यात ५०.९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. प्रशासनाने जिल्ह्यात सरासरी एकूण ४३.८५ मिमी पावसाची नोंद घेतली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)