शहरं
Join us  
Trending Stories
1
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
3
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
4
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
5
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
6
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
7
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
8
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
9
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
10
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
11
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
12
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
13
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
14
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
15
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
16
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
17
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
18
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

वसतिगृहातील सांडपाण्याने लांझेडातील विहिरी दूषित

By admin | Updated: September 10, 2016 01:14 IST

आदिवासी विकास विभागाच्या मार्फतीने चालविल्या जाणाऱ्या शहरातील लांझेडा वार्डातील मुलींच्या वसतिगृहातील सांडपाणी, शौचालयाचे पाणी नजीकच्या तलावात सोडले जात आहे.

नागरिक त्रस्त : आदिवासी विकास विभागाचे होत आहे दुर्लक्ष गडचिरोली : आदिवासी विकास विभागाच्या मार्फतीने चालविल्या जाणाऱ्या शहरातील लांझेडा वार्डातील मुलींच्या वसतिगृहातील सांडपाणी, शौचालयाचे पाणी नजीकच्या तलावात सोडले जात आहे. या तलावाचे पाणी दूषित होण्याबरोबरच वसतिगृहाच्या परिसरातील विहिरींचेही पाणी दूषित झाले असून दुर्गंधीयुक्त वास येत आहे. या संपूर्ण गंभीर प्रकाराकडे आदिवासी विकास विभागाच्या प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष आहे.मुलीच्या वसतिगृहात जवळपास २०० ते ३०० विद्यार्थिनी आहेत. सदर वसतिगृहाला लागून शहराची एकही नाली नाही. त्यामुळे सदर सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी मोठा शोषखड्डा तयार करणे आवश्यक होते. कंत्राटदाराने मात्र लहानसा शोषखड्डा तयार करून शोषखड्डाचे बिल उचलले व वसतिगृहाचे सांडपाणी नजीकच्या तलावात सोडण्याची व्यवस्था केली. दरदिवशी हजारो लिटर सांडपाणी जवळपासच्या तलावात सोडले जात असल्याने या तलावाच्या पाण्यालाच दुर्गंधीयुक्त वास येत आहे. त्यामुळे सदर पाणी जनावरे सुध्दा पीत नाही. या सांडपाण्यामुळे तलावाच्या खालची शेती सुध्दा धोक्यात आली आहे. धानपीकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव होत चालला आहे.याच तलावाचे पाणी लांझेडा वार्डातील विहिरींना उतरते. त्यामुळे विहिरींच्या पाण्यालाही दुर्गंधीयुक्त वास येण्यास सुरूवात झाली आहे. पाण्यावर फेस जमा होत चालला आहे. बोअरवेलमधूनही असाच दुर्गंधीयुक्त पाणी येत चालला आहे. परिणामी मागील दोन महिन्यांपासून या वार्डातील नागरिकांना बोअरवेल व विहिरींचे पाणी वापरणे सुध्दा अशक्य झाले आहे. या पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. (नगर प्रतिनिधी)