शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

वन्यप्राण्यांनो परत फिरा रे... बंधाऱ्यांसह तलावांमध्ये भागवा तहान !

By गेापाल लाजुरकर | Updated: April 27, 2023 18:19 IST

वन्यजीवांसाठी जल व मृद संधारणमधून तीन वर्षात ८४ ठिकाणी झाले बांधकाम

गडचिरोली : उन्हाळ्यात जंगलातील प्राण्याांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागू नये. जंगलातच प्राण्यांना  पिण्यासाठी पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी गडचिरोली वनवृत्तात एकूण ८४ कामे २०२० ते २०२३ या तीन वर्षांच्या कालावधीत एकूण ८४ विविध कामे करण्यात आली. त्यामुळे प्राण्यांसाठी जंगलातच पाणी उपलब्ध झाले.

गडचिरोली जिल्ह्यात ७६ टक्के जंगल आहे. या जंगलात वाघ, बिबट, अस्वल, रानडुकर, तडस, आदी हिंस्त्र प्राण्यांसह अन्य तृणभक्षी प्राणी आहेत. दरवर्षी जानेवारी महिन्यानंतर जलस्त्रोत झपाट्याने आटतात. त्यामुळे फेब्रुवारी व मार्च महिन्यापासूनच वन्यप्राणी गावाकडे धाव घेतात. विशेष म्हणजे, बहुतांश गावांना  लागूनच जंगल असल्याने  वनातील प्राणी सहज मानवी वस्तीकडे येतात. ही स्थिती टाळण्यासाठी वन विभागाने वनतळे, कृत्रिम पाणवठे, तसेच बंधारे निर्माण करून वन्यप्राण्यांची तहान भागविण्यासाठी प्रयत्न  केला आहे.  गेल्या तीन वर्षात सातत्याने हे प्रयत्न सुरू आहेत.

नेचर सफारी परिसरात १५ सौरपंप

गडचिरोली वनविभागातील गुरवळा निसर्ग सफारीच्या जंगल परिसरात वाघ, बिबट, अस्वलसह अन्य वन्यप्राणी  आहेत. येथे वावरणाऱ्या प्राण्यांना उन्हाळभर पाणी उपलब्ध व्हावे यासाठी याच परिसरात १५ सौरपंप उभारण्यात आले आहेत. ह्या सौरपंपाच्या माध्यमातून बोअरवेलचे पाणी उपसले जाते. सदर पाणी लगतच्या वन तलावात टाकले जाते. विशेष म्हणजे, अशी सोय केवळ गडचिरोली वन विभागातच केली आहे.

वन्यप्राणी गावाकडे का येतात?

उन्हाळ्यात जलस्त्रोत आटतात. त्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या शोधात वन्यप्राणी जंगलातून भरकटतातत. याचवेळी ते गावपरिसरात आल्यानंतर गावठी कुत्री त्यांच्यावर हल्ला चढवितात. त्यामुळे पुन्हा वन्यप्राणी गावाकडे धाव  घेतात. यात हरीणवर्गीय प्राणी अधिक असतात. विशेष म्हणजे, याचवेळी वन्यप्राण्यांची शिकारसुद्धा होण्याचा धोका असतो.

टॅग्स :forest departmentवनविभागwildlifeवन्यजीवWaterपाणी