शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

वन्यप्राण्यांनो परत फिरा रे... बंधाऱ्यांसह तलावांमध्ये भागवा तहान !

By गेापाल लाजुरकर | Updated: April 27, 2023 18:19 IST

वन्यजीवांसाठी जल व मृद संधारणमधून तीन वर्षात ८४ ठिकाणी झाले बांधकाम

गडचिरोली : उन्हाळ्यात जंगलातील प्राण्याांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागू नये. जंगलातच प्राण्यांना  पिण्यासाठी पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी गडचिरोली वनवृत्तात एकूण ८४ कामे २०२० ते २०२३ या तीन वर्षांच्या कालावधीत एकूण ८४ विविध कामे करण्यात आली. त्यामुळे प्राण्यांसाठी जंगलातच पाणी उपलब्ध झाले.

गडचिरोली जिल्ह्यात ७६ टक्के जंगल आहे. या जंगलात वाघ, बिबट, अस्वल, रानडुकर, तडस, आदी हिंस्त्र प्राण्यांसह अन्य तृणभक्षी प्राणी आहेत. दरवर्षी जानेवारी महिन्यानंतर जलस्त्रोत झपाट्याने आटतात. त्यामुळे फेब्रुवारी व मार्च महिन्यापासूनच वन्यप्राणी गावाकडे धाव घेतात. विशेष म्हणजे, बहुतांश गावांना  लागूनच जंगल असल्याने  वनातील प्राणी सहज मानवी वस्तीकडे येतात. ही स्थिती टाळण्यासाठी वन विभागाने वनतळे, कृत्रिम पाणवठे, तसेच बंधारे निर्माण करून वन्यप्राण्यांची तहान भागविण्यासाठी प्रयत्न  केला आहे.  गेल्या तीन वर्षात सातत्याने हे प्रयत्न सुरू आहेत.

नेचर सफारी परिसरात १५ सौरपंप

गडचिरोली वनविभागातील गुरवळा निसर्ग सफारीच्या जंगल परिसरात वाघ, बिबट, अस्वलसह अन्य वन्यप्राणी  आहेत. येथे वावरणाऱ्या प्राण्यांना उन्हाळभर पाणी उपलब्ध व्हावे यासाठी याच परिसरात १५ सौरपंप उभारण्यात आले आहेत. ह्या सौरपंपाच्या माध्यमातून बोअरवेलचे पाणी उपसले जाते. सदर पाणी लगतच्या वन तलावात टाकले जाते. विशेष म्हणजे, अशी सोय केवळ गडचिरोली वन विभागातच केली आहे.

वन्यप्राणी गावाकडे का येतात?

उन्हाळ्यात जलस्त्रोत आटतात. त्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या शोधात वन्यप्राणी जंगलातून भरकटतातत. याचवेळी ते गावपरिसरात आल्यानंतर गावठी कुत्री त्यांच्यावर हल्ला चढवितात. त्यामुळे पुन्हा वन्यप्राणी गावाकडे धाव  घेतात. यात हरीणवर्गीय प्राणी अधिक असतात. विशेष म्हणजे, याचवेळी वन्यप्राण्यांची शिकारसुद्धा होण्याचा धोका असतो.

टॅग्स :forest departmentवनविभागwildlifeवन्यजीवWaterपाणी