शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

वन्यप्राण्यांनो परत फिरा रे... बंधाऱ्यांसह तलावांमध्ये भागवा तहान !

By गेापाल लाजुरकर | Updated: April 27, 2023 18:19 IST

वन्यजीवांसाठी जल व मृद संधारणमधून तीन वर्षात ८४ ठिकाणी झाले बांधकाम

गडचिरोली : उन्हाळ्यात जंगलातील प्राण्याांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागू नये. जंगलातच प्राण्यांना  पिण्यासाठी पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी गडचिरोली वनवृत्तात एकूण ८४ कामे २०२० ते २०२३ या तीन वर्षांच्या कालावधीत एकूण ८४ विविध कामे करण्यात आली. त्यामुळे प्राण्यांसाठी जंगलातच पाणी उपलब्ध झाले.

गडचिरोली जिल्ह्यात ७६ टक्के जंगल आहे. या जंगलात वाघ, बिबट, अस्वल, रानडुकर, तडस, आदी हिंस्त्र प्राण्यांसह अन्य तृणभक्षी प्राणी आहेत. दरवर्षी जानेवारी महिन्यानंतर जलस्त्रोत झपाट्याने आटतात. त्यामुळे फेब्रुवारी व मार्च महिन्यापासूनच वन्यप्राणी गावाकडे धाव घेतात. विशेष म्हणजे, बहुतांश गावांना  लागूनच जंगल असल्याने  वनातील प्राणी सहज मानवी वस्तीकडे येतात. ही स्थिती टाळण्यासाठी वन विभागाने वनतळे, कृत्रिम पाणवठे, तसेच बंधारे निर्माण करून वन्यप्राण्यांची तहान भागविण्यासाठी प्रयत्न  केला आहे.  गेल्या तीन वर्षात सातत्याने हे प्रयत्न सुरू आहेत.

नेचर सफारी परिसरात १५ सौरपंप

गडचिरोली वनविभागातील गुरवळा निसर्ग सफारीच्या जंगल परिसरात वाघ, बिबट, अस्वलसह अन्य वन्यप्राणी  आहेत. येथे वावरणाऱ्या प्राण्यांना उन्हाळभर पाणी उपलब्ध व्हावे यासाठी याच परिसरात १५ सौरपंप उभारण्यात आले आहेत. ह्या सौरपंपाच्या माध्यमातून बोअरवेलचे पाणी उपसले जाते. सदर पाणी लगतच्या वन तलावात टाकले जाते. विशेष म्हणजे, अशी सोय केवळ गडचिरोली वन विभागातच केली आहे.

वन्यप्राणी गावाकडे का येतात?

उन्हाळ्यात जलस्त्रोत आटतात. त्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या शोधात वन्यप्राणी जंगलातून भरकटतातत. याचवेळी ते गावपरिसरात आल्यानंतर गावठी कुत्री त्यांच्यावर हल्ला चढवितात. त्यामुळे पुन्हा वन्यप्राणी गावाकडे धाव  घेतात. यात हरीणवर्गीय प्राणी अधिक असतात. विशेष म्हणजे, याचवेळी वन्यप्राण्यांची शिकारसुद्धा होण्याचा धोका असतो.

टॅग्स :forest departmentवनविभागwildlifeवन्यजीवWaterपाणी