शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
8
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
9
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
10
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
11
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
12
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
13
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
14
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
15
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
16
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
17
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

पुलाचे बांधकाम पूर्ण झाले मात्र जोडरस्त्याचा पत्ता नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 06:00 IST

महाराष्ट्र व तेलंगणा राज्यांच्या मधून प्राणहिता नदी वाहते. अहेरी, सिरोंचा परिसरातील नागरिकांची संस्कृती तेलंगणातील नागरिकांशी मिळतीजुळती आहे. तसेच अनेकांचे नातेवाईक तेलंगणात असल्याने नेहमीच ये-जा सुरू राहते. पूल नसल्याने प्राणहिता नदीच्या पात्रातून डोंग्याने प्रवास करावा लागत होता. हा प्रवास अतिशय धोकादायक होता.

ठळक मुद्देसमस्या कायम : वांगेपल्ली पुलाचे काम पूर्णत्वास

विवेक बेझलवार ।लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : महाराष्ट्र व तेलंगणा राज्यांना जोडणाऱ्या पुलाचे काम वांगेपल्ली जवळ सुरू आहे. पुलाचे बांधकाम जवळपास पूर्ण होत आले आहे. मात्र अजूनपर्यंत वांगेपल्ली ते पुलापर्यंत पोचमार्गाचे काम मंजूर करण्यात आले नाही.महाराष्ट्र व तेलंगणा राज्यांच्या मधून प्राणहिता नदी वाहते. अहेरी, सिरोंचा परिसरातील नागरिकांची संस्कृती तेलंगणातील नागरिकांशी मिळतीजुळती आहे. तसेच अनेकांचे नातेवाईक तेलंगणात असल्याने नेहमीच ये-जा सुरू राहते. पूल नसल्याने प्राणहिता नदीच्या पात्रातून डोंग्याने प्रवास करावा लागत होता. हा प्रवास अतिशय धोकादायक होता. ही बाब तेलंगणा सरकारच्या लक्षात आल्यानंतर तेलंगणा सरकारने वांगेपल्ली गावाजवळ प्राणहिता नदीवर पूल बांधण्यास सुरूवात केली. यासाठी सुमारे ९० कोटी रुपये तेलंगणा सरकारने मंजूर केले. ३० नोव्हेंबर २०१४ रोजी कामाचे भूमिपूजन करून कामाला सुरूवात झाली. कामाची गती कायम ठेवत तेलंगणा सरकारने पुलाचे काम केले. आता या पुलाचे जवळपास ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे. तेलंगणा सरकारने आपल्या राज्यातून पुलाला जोडणारा मार्ग बांधला आहे. मात्र महाराष्ट्र शासनाने वांगेपल्ली ते पुलापर्यंतचा केवळ दीड किमी अंतराचा मार्ग पाच वर्षांचा कालावधीत उलटूनही बांधला नाही. विशेष म्हणजे, अजूनपर्यंत या मार्गाला मंजुरी सुध्दा मिळाली नाही. स्थानिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना पोच रस्त्याबाबत विचारले असता, शासनाकडे दोनदा प्रस्ताव पाठविला आहे. मात्र शासनाने अजूनपर्यंत मंजुरी दिली नाही. त्यामुळे रस्त्याचे काम रखडले आहे, अशी माहिती दिली.या पुलाचा लाभ दोन्ही राज्यातील नागरिकांना होणार आहे. तेलंगणा सरकारने पुढाकार घेऊन सुमारे ९० कोटी रुपयांचा पूल बांधून दिला. पाच वर्षात पुलाचे काम पूर्ण झाले. मात्र दीड किमीचा रस्ता महाराष्ट्र शासन बांधू शकले नाही. यावरून महाराष्ट्र व तेलंगणा शासन व प्रशासनातील फरक सहज लक्षात येते.रस्त्याअभावी वाहतूक रखडणारपुलाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर या पुलावरून खासगी व सार्वजनिक वाहतुकीला सुरूवात होईल. तेलंगणा सरकारने आपल्या राज्यात मार्ग बांधला आहे. मात्र महाराष्ट्र शासनाने मार्ग बांधला नसल्याने वाहतूक व्यवस्था सुरू होणार नाही. त्यामुळे कोट्यवधी रुपयांच्या पुलाचा उपयोग नागरिकांना करता येणार नाही. विद्यमान लोकप्रतिनिधींनी शासनदरबारी रस्त्याचा मुद्दा लावून धरून रस्त्याचे बांधकाम करावे, अशी मागणी आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा