शहरं
Join us  
Trending Stories
1
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
2
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
3
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
4
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
5
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
6
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
7
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
8
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
9
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
10
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
11
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
12
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
13
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
14
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
15
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
16
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
17
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
18
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
19
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
20
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय

पुलाचे बांधकाम पूर्ण झाले मात्र जोडरस्त्याचा पत्ता नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 06:00 IST

महाराष्ट्र व तेलंगणा राज्यांच्या मधून प्राणहिता नदी वाहते. अहेरी, सिरोंचा परिसरातील नागरिकांची संस्कृती तेलंगणातील नागरिकांशी मिळतीजुळती आहे. तसेच अनेकांचे नातेवाईक तेलंगणात असल्याने नेहमीच ये-जा सुरू राहते. पूल नसल्याने प्राणहिता नदीच्या पात्रातून डोंग्याने प्रवास करावा लागत होता. हा प्रवास अतिशय धोकादायक होता.

ठळक मुद्देसमस्या कायम : वांगेपल्ली पुलाचे काम पूर्णत्वास

विवेक बेझलवार ।लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : महाराष्ट्र व तेलंगणा राज्यांना जोडणाऱ्या पुलाचे काम वांगेपल्ली जवळ सुरू आहे. पुलाचे बांधकाम जवळपास पूर्ण होत आले आहे. मात्र अजूनपर्यंत वांगेपल्ली ते पुलापर्यंत पोचमार्गाचे काम मंजूर करण्यात आले नाही.महाराष्ट्र व तेलंगणा राज्यांच्या मधून प्राणहिता नदी वाहते. अहेरी, सिरोंचा परिसरातील नागरिकांची संस्कृती तेलंगणातील नागरिकांशी मिळतीजुळती आहे. तसेच अनेकांचे नातेवाईक तेलंगणात असल्याने नेहमीच ये-जा सुरू राहते. पूल नसल्याने प्राणहिता नदीच्या पात्रातून डोंग्याने प्रवास करावा लागत होता. हा प्रवास अतिशय धोकादायक होता. ही बाब तेलंगणा सरकारच्या लक्षात आल्यानंतर तेलंगणा सरकारने वांगेपल्ली गावाजवळ प्राणहिता नदीवर पूल बांधण्यास सुरूवात केली. यासाठी सुमारे ९० कोटी रुपये तेलंगणा सरकारने मंजूर केले. ३० नोव्हेंबर २०१४ रोजी कामाचे भूमिपूजन करून कामाला सुरूवात झाली. कामाची गती कायम ठेवत तेलंगणा सरकारने पुलाचे काम केले. आता या पुलाचे जवळपास ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे. तेलंगणा सरकारने आपल्या राज्यातून पुलाला जोडणारा मार्ग बांधला आहे. मात्र महाराष्ट्र शासनाने वांगेपल्ली ते पुलापर्यंतचा केवळ दीड किमी अंतराचा मार्ग पाच वर्षांचा कालावधीत उलटूनही बांधला नाही. विशेष म्हणजे, अजूनपर्यंत या मार्गाला मंजुरी सुध्दा मिळाली नाही. स्थानिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना पोच रस्त्याबाबत विचारले असता, शासनाकडे दोनदा प्रस्ताव पाठविला आहे. मात्र शासनाने अजूनपर्यंत मंजुरी दिली नाही. त्यामुळे रस्त्याचे काम रखडले आहे, अशी माहिती दिली.या पुलाचा लाभ दोन्ही राज्यातील नागरिकांना होणार आहे. तेलंगणा सरकारने पुढाकार घेऊन सुमारे ९० कोटी रुपयांचा पूल बांधून दिला. पाच वर्षात पुलाचे काम पूर्ण झाले. मात्र दीड किमीचा रस्ता महाराष्ट्र शासन बांधू शकले नाही. यावरून महाराष्ट्र व तेलंगणा शासन व प्रशासनातील फरक सहज लक्षात येते.रस्त्याअभावी वाहतूक रखडणारपुलाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर या पुलावरून खासगी व सार्वजनिक वाहतुकीला सुरूवात होईल. तेलंगणा सरकारने आपल्या राज्यात मार्ग बांधला आहे. मात्र महाराष्ट्र शासनाने मार्ग बांधला नसल्याने वाहतूक व्यवस्था सुरू होणार नाही. त्यामुळे कोट्यवधी रुपयांच्या पुलाचा उपयोग नागरिकांना करता येणार नाही. विद्यमान लोकप्रतिनिधींनी शासनदरबारी रस्त्याचा मुद्दा लावून धरून रस्त्याचे बांधकाम करावे, अशी मागणी आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा