शहरं
Join us  
Trending Stories
1
पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमय; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर
2
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
3
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
4
"फॅक्ट्री, घर, दागिने गहाण... लाखोंचं कर्ज पण कुटुंबाने केला नाही सपोर्ट"; सचिनने मांडली व्यथा
5
"मी तुझ्या पतीची दुसरी बायको..."; फोनवरून इतकंच ऐकताच महिलेने आईच्या मांडीवर सोडला जीव
6
श्री गणेशा! नव्या इनिंगची नवी सुरुवात अन् पृथ्वी-आकृती यांच्यातील नात्यातील नवा बंध
7
डोक्यावर पदर घेत पार्थ पवारांसोबत लालबागच्या राजाचं दर्शन घेणारी 'ही' बॉलिवूड अभिनेत्री कोण?
8
Bal Karve: 'गुंड्याभाऊ' काळाच्या पडद्याआड! ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं ९५ व्या वर्षी निधन
9
 "…तर तुमचं राजकीय करिअर बरबाद होईल", मनोज जरांगे पाटलांचा मुख्यमंत्र्यांना इशारा
10
आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटकलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह
11
बचाव मोहिमेंतर्गत ताडोबातील गंभीर अवस्थेतील छोटा मटका वाघ जेरबंद; 'ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर'ला हलवलं
12
"ताई, तू हे काय केलंय..." निक्की प्रकरणाला नवं वळण; आणखी एक व्हिडिओ व्हायरल, गुंता आणखी वाढला
13
आता ATM आणि UPI द्वारे काढता येणार PF चे पैसे; EPFO 3.0 मध्ये आणखी काय बदलणार?
14
दुर्गा पूजेदरम्यान धुबरीत 'शूट अ‍ॅट साइट ऑर्डर' लागू, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितलं कारण
15
हृदयद्रावक! लेकीचा पहिला वाढदिवस, घर सजवलं, केक कापला आणि पाच मिनिटांत इमारत कोसळली, माय लेकीचा मृत्यू, वडील बेपत्ता
16
"गोविंदा फक्त माझा आहे, आम्हाला कोणीच...", घटस्फोटांच्या चर्चांना सुनीता अहुजाने लावलं पूर्णविराम
17
शाळेची फी भरण्यास उशीर, सहावीच्या विद्यार्थ्याला एका खोलीत नेलं आणि...; शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल
18
ट्रम्प टॅरिफचा बाजाराला जोरदार झटका! सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला; काही मिनिटांत ४.१४ लाख कोटींचे नुकसान
19
Ganesh Chaturthi 2025: 'चिक मोत्याची माळ' हे अतिशय लोकप्रिय गाणे; त्याची निर्मिती कशी झाली माहितीय?
20
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी

रेल्वे मार्गाने आलापल्ली कागजनगरशी जोडा

By admin | Updated: April 18, 2015 01:36 IST

गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाला चालना देण्यासाठी आलापल्ली-अहेरी-कागजनगर रेल्वे मार्गाची निर्मिती करावी, अशी मागणी ....

अहेरी : गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाला चालना देण्यासाठी आलापल्ली-अहेरी-कागजनगर रेल्वे मार्गाची निर्मिती करावी, अशी मागणी अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीचे अध्यक्ष रघुनाथ तलांडे यांनी रेल्वे मंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. महाराष्ट्र व तेलंगणा राज्याच्या सीमेवर असलेल्या कागजनगर हे शहर आलापल्लीपासून ५५ किमी अंतरावर आहे. मात्र या दोन शहरांच्या मध्ये असलेल्या प्राणहिता नदीवर पूल नाही, त्यामुळे वाहतुकीस अडथळा होतो. तरीही या दोन शहरांमध्ये व्यापार व व्यवसाय केला जातो. पूर्वीपासूनच या दोन शहरांमध्ये रोटी-बेटी व सांस्कृतिक संबंधांची देवाणघेवाण होत राहिली आहे. केंद्र शासनाने पुढाकार घेत सदर मार्गाची निर्मिती केल्यास हैदराबाद ते नागपूर या दोन शहरांमधील अंतर कमी होण्यास मदत होईल.देवलमरी येथील सिमेंट उद्योगाला चालना देण्याच्या दृष्टीने या रेल्वे मार्गाचे विशेष महत्त्व राहणार आहे. रेल्वे मार्ग झाल्यास रोजगाराची समस्याही काही प्रमाणात सुटेल. दोन ठिकानांना रेल्वे मार्गाने जोडल्यास येथील विकासास चालना मिळू शकते. शिवाय अनेकांना रोजगारही प्राप्त होऊ शकतो. अहेरी तालुका दुर्गम असल्याने येथे रेल्वे पोहोचणे गरजेचे आहे. त्यामुळे केंद्र व दोन्ही राज्य शासनाने या मार्गाच्या निर्मितीसाठी पाऊल उचलावे, अशी मागणी अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीच्या वतीने केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, मुख्यमंत्री, महसूल मंत्री, खा. अशोक नेते यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. सदर निवेदन अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्फतीने पाठविण्यात आले. हे निवेदन नायब तहसीलदार राजेंद्र अरमरकर यांनी स्वीकारले. यावेळी डॉ. ढेंगळे, विलास रापर्तीवार, अतुल उईके, इमाम शेख, राजेश वायलालवार उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)