शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांचा घटस्फोट, ७ वर्षांनी लग्न तुटले!
2
Wimbledon 2025 Final : अल्काराझची हॅटट्रिक हुकली! नंबर वन यानिक सिनरनं विम्बल्डन जेतेपद जिंकत रचला इतिहास
3
इंग्लंड: लंडनच्या साऊथएन्ड विमानतळावर मोठा अपघात! उड्डाणानंतर काही वेळातच विमानाला आग
4
मैत्रिणीला सोडायला गेलेली स्नेहा परत आलीच नाही; थेट यमुना नदीत सापडला मृतदेह; नेमकं काय घडलं?
5
अमरावती: पोलिसांनी उधळली तरुणाईची मद्य पार्टी ! अल्पवयीन मुला-मुलींसह १००-१५० जण ताब्यात
6
टीम इंडियासाठी सोपा वाटणारा पेपर झाला अवघड; ५८ धावांत ४ विकेट्स! KL राहुल एकटा पडला!
7
क्रॉसिंग गेटवर रेल्वेचे ‘झिरो अ‍ॅक्सिडेन्ट’चे लक्ष्य; मध्य रेल्वे नागपूर विभागात सुरक्षा मोहीम
8
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
9
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
10
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
11
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
12
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
13
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
14
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
15
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
16
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
17
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
18
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
19
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
20
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं

रेल्वे मार्गाने आलापल्ली कागजनगरशी जोडा

By admin | Updated: April 18, 2015 01:36 IST

गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाला चालना देण्यासाठी आलापल्ली-अहेरी-कागजनगर रेल्वे मार्गाची निर्मिती करावी, अशी मागणी ....

अहेरी : गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाला चालना देण्यासाठी आलापल्ली-अहेरी-कागजनगर रेल्वे मार्गाची निर्मिती करावी, अशी मागणी अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीचे अध्यक्ष रघुनाथ तलांडे यांनी रेल्वे मंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. महाराष्ट्र व तेलंगणा राज्याच्या सीमेवर असलेल्या कागजनगर हे शहर आलापल्लीपासून ५५ किमी अंतरावर आहे. मात्र या दोन शहरांच्या मध्ये असलेल्या प्राणहिता नदीवर पूल नाही, त्यामुळे वाहतुकीस अडथळा होतो. तरीही या दोन शहरांमध्ये व्यापार व व्यवसाय केला जातो. पूर्वीपासूनच या दोन शहरांमध्ये रोटी-बेटी व सांस्कृतिक संबंधांची देवाणघेवाण होत राहिली आहे. केंद्र शासनाने पुढाकार घेत सदर मार्गाची निर्मिती केल्यास हैदराबाद ते नागपूर या दोन शहरांमधील अंतर कमी होण्यास मदत होईल.देवलमरी येथील सिमेंट उद्योगाला चालना देण्याच्या दृष्टीने या रेल्वे मार्गाचे विशेष महत्त्व राहणार आहे. रेल्वे मार्ग झाल्यास रोजगाराची समस्याही काही प्रमाणात सुटेल. दोन ठिकानांना रेल्वे मार्गाने जोडल्यास येथील विकासास चालना मिळू शकते. शिवाय अनेकांना रोजगारही प्राप्त होऊ शकतो. अहेरी तालुका दुर्गम असल्याने येथे रेल्वे पोहोचणे गरजेचे आहे. त्यामुळे केंद्र व दोन्ही राज्य शासनाने या मार्गाच्या निर्मितीसाठी पाऊल उचलावे, अशी मागणी अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीच्या वतीने केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, मुख्यमंत्री, महसूल मंत्री, खा. अशोक नेते यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. सदर निवेदन अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्फतीने पाठविण्यात आले. हे निवेदन नायब तहसीलदार राजेंद्र अरमरकर यांनी स्वीकारले. यावेळी डॉ. ढेंगळे, विलास रापर्तीवार, अतुल उईके, इमाम शेख, राजेश वायलालवार उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)