शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

बौद्ध समाजबांधवांनी एकसंघ राहावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 11:11 PM

बौद्ध समाजातील लोकांनी गटातटात विभागून न राहता एक संघ राहिले पाहिजे. समाज संघटित असेल तर सामाजिक कामे मोठ्या प्रमाणात केली जातात. त्यामुळे बौद्ध समाजबांधवांनी संघटित राहावे, असे आवाहन राज्याचे आदिवासी विकास वने राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी रविवारी सकाळी येथे आयोजित कार्यक्रमात केले.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांचे आवाहन : अहेरीत धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : बौद्ध समाजातील लोकांनी गटातटात विभागून न राहता एक संघ राहिले पाहिजे. समाज संघटित असेल तर सामाजिक कामे मोठ्या प्रमाणात केली जातात. त्यामुळे बौद्ध समाजबांधवांनी संघटित राहावे, असे आवाहन राज्याचे आदिवासी विकास वने राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी रविवारी सकाळी येथे आयोजित कार्यक्रमात केले.येथील इंदिरा नगर परिसरातील नियोजित धम्म दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जगदीश बद्रे होते. प्रमुख अतिथी म्हणून गौतम मेश्राम, प्रा.नीरज खोब्रागडे, प्रा.विजय खोंडे, प्रा.डॉ.जगदीश राठोड आदी उपस्थित होते. पुढे बोलताना पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम म्हणाले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या शिका संघटित व्हावा व संघर्ष करा, या मूलमंत्रानुसार बौद्ध समाजबांधवांनी आचरण ठेवायला हवे, आपल्या मुलांना चांगले शिक्षण दिले पाहिजे, शुद्ध आचरण ठेवून आनंदीमय जीवन जगा, असे पालकमंत्री यांनी सांगितले. केंद्र व राज्य सरकार अनुसूचित जाती व जमातीच्या कल्याणासाठी अनेक योजनेचा लाभ घेऊन विकास करावा. अहेरीच्या इंदिरानगर येथील नियोजित जागेवर बुद्ध विहाराचे बांधकाम व इतर कामासाठी दोन कोटी रूपयांचा निधी देऊ, असे आश्वासन पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.याप्रसंगी गौतम मेश्राम, जगदीश बद्रे यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक समाज मंडळाचे सहसचिव सुरेश अलोणे, संचालन आनंद अलोणे यांनी केले तर आभार किशोर शंभरकर यांनी मानले.