शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

गोंधळाने गाजली सिनेटची निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 00:14 IST

गोंडवाना विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणाची पहिलीच निवडणूक प्रशासकीय गोंधळामुळे चांगलीच चर्चेत राहिली. मतदानापासून तर मतमोजणीपर्यंत अनेक बाबतीत नियोजनाचा अभाव दिसून आला.

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणाची पहिलीच निवडणूक प्रशासकीय गोंधळामुळे चांगलीच चर्चेत राहिली. मतदानापासून तर मतमोजणीपर्यंत अनेक बाबतीत नियोजनाचा अभाव दिसून आला. प्रभारी अधिकाऱ्यांच्या भरोशावर अनेक वर्षांपासून विद्यापीठाचा कारभार सुरू आहे. त्यातून प्रशासकीय कामात सुसूत्रतेचा अभाव प्रकर्षाने दिसून आला.२०११ मध्ये स्थापित झालेल्या गोंडवाना विद्यापीठात गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील महाविद्यालयांचा समावेश होतो. आतापर्यंत शासननियुक्त समित्यांच्या भरोशावर कारभार सुरू होता. आता पहिल्यांदाच सिनेट, विद्वत परिषद आणि अभ्यास मंडळांच्या निवडणुकांसाठी दि.१० डिसेंबरला मतदान पार पडले. यावेळी गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड, अहेरी येथील मतदान केंद्रांवर चार मतपत्रिकेऐवजी केंद्राधिकाऱ्याने एकच मतपत्रिका दिली. त्यामुळे मतदार पसंतक्रमाने सर्व उमेदवारांना मतदान करण्याऐवजी एकाच उमेदवाराला मतदान करून निघून गेले. आष्टी केंद्रावर निळ्याऐवजी काळ्या शाईचा उपयोग केला गेला. याशिवाय एका केंद्रावर नियमबाह्यपणे मार्कर पेनचा उपयोग झाल्याचे बुधवार दि.१३ ला मतमोजणीदरम्यान लक्षात आले. यामुळे काही केंद्रांवर फेरमतदान करण्याची मागणी करण्यात आली. यातूनच मतमोजणी प्रक्रिया रात्री एक तास ठप्प झाली होती. पोलिसांनाही पाचारण करावे लागले. दरम्यान कुलगुरू एन.व्ही.कल्याणकर यांनी कोणताही गोंधळ किंवा गैरप्रकार झाला नसल्याचे सांगत आक्षेप नोंदविणाºयांना कुलपतींकडे दाद मागा, असे सांगितले. त्यामुळे याप्रकरणी काही जणांनी कुलपतींसह न्यायालयात याचिका मागण्याची तयारी सुरू केली आहे.मतदानाच्या दिवशी एका मतदाराला किती वेळ लागणार, त्यादृष्टीने कुठे किती मतदान केंद्र ठेवावे लागतील याचा अंदाज विद्यापीठ प्रशासनाला आला नाही. परिणामी सर्वाधिक मतदार असणाऱ्या गडचिरोलीत रात्री ९ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू राहूनही ४० टक्के मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागले. याच नियोजनशून्यतेमुळे मतमोजणीसाठीही तब्बल २० तासांचा अवधी लागून उमेदवारांना रात्रभर ताटकळत राहावे लागले.विशेष म्हणजे एवढ्या सर्व प्रक्रियेनंतर तातडीने निकाल जाहीर करण्याचे सौजन्य दाखविण्याऐवजी मतमोजणीच्या तिसºया दिवशी (शुक्रवारी) निकाल जाहीर करू असे सांगून कुलगुरूंनी कळस केला. शेवटी प्रसार माध्यमांच्या दबावामुळे गुरूवारी सायंकाळी प्रभारी कुलसचिवांनी निकालाची प्रत उपलब्ध करून दिली.कुलसचिवांपासून अनेक महत्वाची पदे रिक्त असल्यामुळे विद्यापीठाच्या कारभारावर परिणाम होत आहे.