शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
2
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
3
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
4
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
5
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
6
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
7
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
8
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
9
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
10
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
11
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
12
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
13
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
14
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
15
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
16
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
17
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
18
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
19
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
20
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं

शहरातील फायबर मुताऱ्या गायब

By admin | Published: November 19, 2014 10:40 PM

गडचिरोली शहराची लोकसंख्या ४५ हजाराच्या वर आहे. मात्र या शहरात सार्वजनिक मुताऱ्यांची अत्यंत कमतरता आहे. त्यामुळे नगर पालिकेने शहराच्या काही मुख्य भागात फायबर मुताऱ्या लावण्याचा निर्णय घेतला होता.

गडचिरोली : गडचिरोली शहराची लोकसंख्या ४५ हजाराच्या वर आहे. मात्र या शहरात सार्वजनिक मुताऱ्यांची अत्यंत कमतरता आहे. त्यामुळे नगर पालिकेने शहराच्या काही मुख्य भागात फायबर मुताऱ्या लावण्याचा निर्णय घेतला होता. दोन-तीन वर्षांपूर्वी लावण्यात आलेल्या या फायबर मुताऱ्या आता गायब झाल्या आहेत. त्यामुळे सर्वाधिक कुचंबना महिलांची होत आहे. या महत्वाच्या प्रश्नाकडे स्थानिक पालिका प्रशासनाचे कमालीचे दुर्लक्ष झाले आहे. गडचिरोली शहरात ६ प्रभाग व २३ वॉर्ड आहेत. कॉम्प्लेक्स पासून लांजेडा पर्यंत पसरलेल्या या शहराची लोकसंख्या ४५ हजाराच्या वर आहे. या शहरात सार्वजनिक शौचालय व मुताऱ्या काही वॉर्डातच आहे. मात्र शहराच्या गर्दीच्या भागात एकाही ठिकाणी सार्वजनिक मुतारी नाही. त्यामुळे नागरिकांना लघुशंकेसाठी उघड्या जागांवरच जावे लागते. यामध्ये महिलांची मोठी कुचंबना होते. बसस्थानकावर सार्वजनिक शौचालय व मुतारीची व्यवस्था आहे. इंदिरा गांधी चौकामध्ये दोन ठिकाणी पक्क्या स्वरूपाच्या सार्वजनिक मुताऱ्या आहेत. शहरातील गुजरी बाजारात तसेच आठवडी बाजारात पक्क्या मुताऱ्या आहेत. या पलिकडे सार्वजनिक मुताऱ्या अन्यत्र कुठेही नाही. ही बाब लक्षात घेऊन काँग्रेसच्या तत्कालिन नगराध्यक्षांनी शहरात ५ते ७ ठिकाणी फायबर मूत्रिघरांची व्यवस्था केली होती. व त्यांना महत्वाच्या मार्गांवर लावूनही दिले होते. याचा वापर नागरिकांकडून वाढला होता. कालांतराने पालिकेचे दुर्लक्ष झाल्याने फायबर मुताऱ्या कोसळून तुटल्या. पालिका प्रशासनाने या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले. वर्षभराच्या आतच या मुताऱ्या जमिनदोस्त झाल्याने पुन्हा नव्याने त्या उभारण्याचे काम झाले नाही. सध्या देशभर स्वच्छता अभियान राबविले जात आहे. सार्वजनिक स्वच्छतेवर मोठा भर दिल्या जात आहे. या पार्श्वभूमिवर सार्वजनिक ठिकाणी मुताऱ्यांची व्यवस्था असणे, आता अनिवार्य आहे. गडचिरोली नगर पालिकेचे या दृष्टीने कोणतेही नियोजन नाही. शहरात बाहेरगावावरून येणाऱ्या महिलांना लघुशंकेसाठी जाण्याकरिता फार त्रास सहन करावा लागत आहे. शहरात आडोशांच्या जागांचीही कमतरता आहे. गडचिरोली नगर पालिकेने चामोर्शी मार्गावरील बसस्थानक , आयटीआय चौक, विश्राम भवन, कॉम्प्लेक्स परिसर, पोटेगाव मार्ग आदी भागात या मुताऱ्यांची व्यवस्था नव्याने करणे आवश्यक आहे. नुसत्या मुताऱ्या उभारून चालणार नाही, तर त्याच्या स्वच्छतेकडेही लक्ष द्यावे लागणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)