शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

शहरातील फायबर मुताऱ्या गायब

By admin | Updated: November 19, 2014 22:40 IST

गडचिरोली शहराची लोकसंख्या ४५ हजाराच्या वर आहे. मात्र या शहरात सार्वजनिक मुताऱ्यांची अत्यंत कमतरता आहे. त्यामुळे नगर पालिकेने शहराच्या काही मुख्य भागात फायबर मुताऱ्या लावण्याचा निर्णय घेतला होता.

गडचिरोली : गडचिरोली शहराची लोकसंख्या ४५ हजाराच्या वर आहे. मात्र या शहरात सार्वजनिक मुताऱ्यांची अत्यंत कमतरता आहे. त्यामुळे नगर पालिकेने शहराच्या काही मुख्य भागात फायबर मुताऱ्या लावण्याचा निर्णय घेतला होता. दोन-तीन वर्षांपूर्वी लावण्यात आलेल्या या फायबर मुताऱ्या आता गायब झाल्या आहेत. त्यामुळे सर्वाधिक कुचंबना महिलांची होत आहे. या महत्वाच्या प्रश्नाकडे स्थानिक पालिका प्रशासनाचे कमालीचे दुर्लक्ष झाले आहे. गडचिरोली शहरात ६ प्रभाग व २३ वॉर्ड आहेत. कॉम्प्लेक्स पासून लांजेडा पर्यंत पसरलेल्या या शहराची लोकसंख्या ४५ हजाराच्या वर आहे. या शहरात सार्वजनिक शौचालय व मुताऱ्या काही वॉर्डातच आहे. मात्र शहराच्या गर्दीच्या भागात एकाही ठिकाणी सार्वजनिक मुतारी नाही. त्यामुळे नागरिकांना लघुशंकेसाठी उघड्या जागांवरच जावे लागते. यामध्ये महिलांची मोठी कुचंबना होते. बसस्थानकावर सार्वजनिक शौचालय व मुतारीची व्यवस्था आहे. इंदिरा गांधी चौकामध्ये दोन ठिकाणी पक्क्या स्वरूपाच्या सार्वजनिक मुताऱ्या आहेत. शहरातील गुजरी बाजारात तसेच आठवडी बाजारात पक्क्या मुताऱ्या आहेत. या पलिकडे सार्वजनिक मुताऱ्या अन्यत्र कुठेही नाही. ही बाब लक्षात घेऊन काँग्रेसच्या तत्कालिन नगराध्यक्षांनी शहरात ५ते ७ ठिकाणी फायबर मूत्रिघरांची व्यवस्था केली होती. व त्यांना महत्वाच्या मार्गांवर लावूनही दिले होते. याचा वापर नागरिकांकडून वाढला होता. कालांतराने पालिकेचे दुर्लक्ष झाल्याने फायबर मुताऱ्या कोसळून तुटल्या. पालिका प्रशासनाने या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले. वर्षभराच्या आतच या मुताऱ्या जमिनदोस्त झाल्याने पुन्हा नव्याने त्या उभारण्याचे काम झाले नाही. सध्या देशभर स्वच्छता अभियान राबविले जात आहे. सार्वजनिक स्वच्छतेवर मोठा भर दिल्या जात आहे. या पार्श्वभूमिवर सार्वजनिक ठिकाणी मुताऱ्यांची व्यवस्था असणे, आता अनिवार्य आहे. गडचिरोली नगर पालिकेचे या दृष्टीने कोणतेही नियोजन नाही. शहरात बाहेरगावावरून येणाऱ्या महिलांना लघुशंकेसाठी जाण्याकरिता फार त्रास सहन करावा लागत आहे. शहरात आडोशांच्या जागांचीही कमतरता आहे. गडचिरोली नगर पालिकेने चामोर्शी मार्गावरील बसस्थानक , आयटीआय चौक, विश्राम भवन, कॉम्प्लेक्स परिसर, पोटेगाव मार्ग आदी भागात या मुताऱ्यांची व्यवस्था नव्याने करणे आवश्यक आहे. नुसत्या मुताऱ्या उभारून चालणार नाही, तर त्याच्या स्वच्छतेकडेही लक्ष द्यावे लागणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)