शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

शहरातील फायबर मुताऱ्या गायब

By admin | Updated: November 19, 2014 22:40 IST

गडचिरोली शहराची लोकसंख्या ४५ हजाराच्या वर आहे. मात्र या शहरात सार्वजनिक मुताऱ्यांची अत्यंत कमतरता आहे. त्यामुळे नगर पालिकेने शहराच्या काही मुख्य भागात फायबर मुताऱ्या लावण्याचा निर्णय घेतला होता.

गडचिरोली : गडचिरोली शहराची लोकसंख्या ४५ हजाराच्या वर आहे. मात्र या शहरात सार्वजनिक मुताऱ्यांची अत्यंत कमतरता आहे. त्यामुळे नगर पालिकेने शहराच्या काही मुख्य भागात फायबर मुताऱ्या लावण्याचा निर्णय घेतला होता. दोन-तीन वर्षांपूर्वी लावण्यात आलेल्या या फायबर मुताऱ्या आता गायब झाल्या आहेत. त्यामुळे सर्वाधिक कुचंबना महिलांची होत आहे. या महत्वाच्या प्रश्नाकडे स्थानिक पालिका प्रशासनाचे कमालीचे दुर्लक्ष झाले आहे. गडचिरोली शहरात ६ प्रभाग व २३ वॉर्ड आहेत. कॉम्प्लेक्स पासून लांजेडा पर्यंत पसरलेल्या या शहराची लोकसंख्या ४५ हजाराच्या वर आहे. या शहरात सार्वजनिक शौचालय व मुताऱ्या काही वॉर्डातच आहे. मात्र शहराच्या गर्दीच्या भागात एकाही ठिकाणी सार्वजनिक मुतारी नाही. त्यामुळे नागरिकांना लघुशंकेसाठी उघड्या जागांवरच जावे लागते. यामध्ये महिलांची मोठी कुचंबना होते. बसस्थानकावर सार्वजनिक शौचालय व मुतारीची व्यवस्था आहे. इंदिरा गांधी चौकामध्ये दोन ठिकाणी पक्क्या स्वरूपाच्या सार्वजनिक मुताऱ्या आहेत. शहरातील गुजरी बाजारात तसेच आठवडी बाजारात पक्क्या मुताऱ्या आहेत. या पलिकडे सार्वजनिक मुताऱ्या अन्यत्र कुठेही नाही. ही बाब लक्षात घेऊन काँग्रेसच्या तत्कालिन नगराध्यक्षांनी शहरात ५ते ७ ठिकाणी फायबर मूत्रिघरांची व्यवस्था केली होती. व त्यांना महत्वाच्या मार्गांवर लावूनही दिले होते. याचा वापर नागरिकांकडून वाढला होता. कालांतराने पालिकेचे दुर्लक्ष झाल्याने फायबर मुताऱ्या कोसळून तुटल्या. पालिका प्रशासनाने या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले. वर्षभराच्या आतच या मुताऱ्या जमिनदोस्त झाल्याने पुन्हा नव्याने त्या उभारण्याचे काम झाले नाही. सध्या देशभर स्वच्छता अभियान राबविले जात आहे. सार्वजनिक स्वच्छतेवर मोठा भर दिल्या जात आहे. या पार्श्वभूमिवर सार्वजनिक ठिकाणी मुताऱ्यांची व्यवस्था असणे, आता अनिवार्य आहे. गडचिरोली नगर पालिकेचे या दृष्टीने कोणतेही नियोजन नाही. शहरात बाहेरगावावरून येणाऱ्या महिलांना लघुशंकेसाठी जाण्याकरिता फार त्रास सहन करावा लागत आहे. शहरात आडोशांच्या जागांचीही कमतरता आहे. गडचिरोली नगर पालिकेने चामोर्शी मार्गावरील बसस्थानक , आयटीआय चौक, विश्राम भवन, कॉम्प्लेक्स परिसर, पोटेगाव मार्ग आदी भागात या मुताऱ्यांची व्यवस्था नव्याने करणे आवश्यक आहे. नुसत्या मुताऱ्या उभारून चालणार नाही, तर त्याच्या स्वच्छतेकडेही लक्ष द्यावे लागणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)