शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
4
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
5
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
6
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
7
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
8
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
9
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
10
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
11
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
13
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
14
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
15
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
16
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
17
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
18
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
19
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
20
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना

Vidhan Sabha Election 2019; गडचिरोलीतील नागरिकांचे म्हणणे, दारु पिणारा आणि पाजणारा उमेदवार नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2019 5:20 PM

विधानसभा निवडणुकीतील दारूचा वापर टाळण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातल्या १२० ग्रामपंचायतींमधील २८७ गावांनी ग्रामसभेत ठराव घेतला आहे. त्यात दारू पिणारा आणि पाजणारा उमेदवार देऊ नये, अशी मागणीवजा अपेक्षा राजकीय पक्षांकडे केली आहे.

ठळक मुद्देदारूमुक्त निवडणुकीसाठी १२० ग्रामपंचायतींचा ठराव

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : विधानसभा निवडणुकीतील दारूचा वापर टाळण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातल्या १२० ग्रामपंचायतींमधील २८७ गावांनी ग्रामसभेत ठराव घेतला आहे. त्यात दारू पिणारा आणि पाजणारा उमेदवार देऊ नये, अशी मागणीवजा अपेक्षा राजकीय पक्षांकडे केली आहे.गडचिरोलीत गेल्या तीन वर्षांपासून राबविल्या जात असलेल्या मुक्तिपथ अभियानाच्या पुढाकारातून जिल्ह्याच्या ग्रामीण भागात करण्यात आलेल्या जनजागृतीमुळे नागरिकांना दारूचे दुष्परिणाम दिसू लागले आहेत. त्यामुळे आतापर्यंत ६०० गावांनी दारूबंदीचा ठराव घेऊन गावात दारूला थारा न देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापैकी १२० ग्रामपंचायतींनी विधानसभा निवडणूकसुद्धा दारूमुक्त वातावरणात पार पडावी यासाठी ग्रामसभेचा ठराव घेतला असल्याची माहिती ज्येष्ठ समाजसेवक डॉ.अभय बंग यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.गावकऱ्यांनी केलेल्या ठरावांमध्ये मुख्यत: तीन मुद्दे मांडले आहेत. त्यात राजकीय पक्षांनी उमेदवार देताना तो दारू पिणारा नसावा, उमेदवारांनी मतांसाठी दारू वाटू नये आणि मतदारांनी दारूच्या नशेत मतदान करू नये या मुद्यांचा समावेश आहे. हे ठराव सर्व प्रमुख राजकीय पक्षांच्या जिल्हा आणि प्रदेश अध्यक्षांकडे पाठविले असल्याचे डॉ.बंग यांनी सांगितले. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या वेळी गडचिरोली-चिमूर मतदार संघातील पाचही उमेदवारांनी मतदारांना दारूचे वाटप करणार नाही अशी लेखी हमीच दिली होती. त्याचा बराच परिणामही दिसून आला. यावेळीही जे उमेदवार राहतील त्यांच्याकडून ही हमी घेण्याचा प्रयत्न मुक्तिपथकडून केला जाणार आहे.

जनभावनेचा आदर करावा- डॉ.बंगग्रामसभांनी अशा पद्धतीचे ठराव घेऊन निवडणुकीत दारूपासून दूर राहण्याचा निर्णय घेणे हा लोकशाहीचा विजय आहे. केवळ गडचिरोली जिल्हाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील मतदारांनी याचा आदर्श घेतला पाहीजे. तसेच सर्व राजकीय पक्षांनी आणि उमेदवारांनी जनभावनेचा आदर करत योग्य उमेदवार निवडणुकीत उतरवावे, असे आवाहन मुक्तिपथ अभियानाचे मार्गदर्शक आणि ‘सर्च’चे संचालक डॉ.अभय बंग यांनी केले.

टॅग्स :Assembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019