शहरं
Join us  
Trending Stories
1
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
2
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
3
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
4
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
5
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
6
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
7
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
8
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
9
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
10
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
11
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
12
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
13
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
14
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
15
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
16
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
17
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
18
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
19
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
20
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  

भाव पडल्याने मिरची उत्पादक चिंतित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:09 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क सिरोंचा : नागपुरात वाढत असलेल्या रुग्णांमुळे व्यापाऱ्यांनी बाजारपेठेकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून मिरचीचे ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

सिरोंचा : नागपुरात वाढत असलेल्या रुग्णांमुळे व्यापाऱ्यांनी बाजारपेठेकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून मिरचीचे भाव पडण्यास सुरुवात झाली आहे. १५ हजार रुपये प्रति क्विंटल असलेला भाव आता ११ हजार रुपये प्रति क्विंटल झाला आहे. मिरची निघण्यास सुरुवात झाली असतानाच मिरचीचे भाव पडत असल्यामुळे शेतकरी चिंतित आहे.

सिराेंचा तालुक्यातील गाेदावरीच्या काठी माेठ्या प्रमाणात मिरची पिकाची लागवड केली जाते. सिराेंचा तालुका मिरची उत्पादनात गडचिराेली जिल्ह्यात अग्रेसर असलेला तालुका आहे. तेलंगणा राज्यात माेठ्या प्रमाणात मिरची पिकाची लागवड केली जाते. सिराेंचा तालुका तेलंगणा राज्याला लागून आहे. त्यामुळे मिरची लागवडीचे तंत्र येथील शेतकऱ्यांना माहीत आहे. शेकडाे हेक्टरवर मिरची पिकाची लागवड केली जाते. या माध्यमातून हजाराे नागरिकांना राेजगार उपलब्ध हाेतो.

सिराेंचातील मिरचीचा दर्जा अतिशय चांगला असल्याने तेलंगणा व नागपूर येथील बाजारपेठेत या मिरचीला चांगला भाव मिळते. मागील वर्षी लाॅकडाऊनमुळे मिरची विक्रीत अडचणी येत हाेत्या. काही शेतकऱ्यांना त्यांची मिरची पावसाळ्यादरम्यान विकावी लागली. या वर्षी सध्या मिरची ताेडण्याचा हंगाम सुरू झाला आहे. काही शेतकरी मिरची ताेडल्याबराेबर विक्रीस काढतात. तेलंगणा राज्यातील बाजारपेठेच्या तुलनेत नागपुरातील बाजारपेठेत चांगला भाव मिळत असल्याने काही शेतकरी नागपूरच्या बाजारपेठेत मिरची विक्रीसाठी आणतात. १ महिन्यापूर्वी बाजारपेठेत मिरचीचा भाव १५ हजार रुपये क्विंटलपर्यंत पाेहाेचला हाेता. मागील आठ दिवसांपासून नागपुरात काेराेना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे व्यापारी बाजारपेठेत येत नसल्याने भाव पडण्यास सुरुवात झाली आहे. आता ११ हजार रुपये क्विंटल रुपये प्रमाणे मिरची खरेदी केली जात आहे. क्विंटलमागे चार हजार रुपयांचे नुकसान शेतकऱ्यांना सहन करावे लागत आहे.

बाॅक्स

लाॅकडाऊनच्या भीतीने मजुरांचा काढता पाय

सिराेंचा तालुका व तेलंगणा राज्यात चंद्रपूर, गडचिराेली, भंडारा या जिल्ह्यांमधील मजूर मिरची ताेडण्यासाठी जातात. विदर्भात काेराेनाचे रुग्ण वाढत असल्याने लाॅकडाऊन केले जाईल, असा गैरसमज मजुरांमध्ये निर्माण झाला आहे. मागील वर्षी मार्च महिन्यातच शासनाने लाॅकडाऊन केले हाेते. परतीच्या प्रवासात माेठ्या हालअपेष्टा मजुरांना सहन कराव्या लागल्या हाेत्या. या वर्षीही लाॅकडाऊन झाल्यास त्याच हालअपेष्टा सहन कराव्या लागतील, असा गैरसमज निर्माण झाला असल्याने काही मजूर मिरची ताेडणी अर्धवट साेडून गावाकडे परतत असल्याचे दिसून येत आहे. मजूर परतल्याने शेतकरी चिंतित आहेत.