शहरं
Join us  
Trending Stories
1
Ambernath Accident: अंबरनाथमध्ये निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिंदेसेनेच्या उमेदवाराच्या कारला अपघात, ४ ठार!
2
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
3
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
4
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
5
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
6
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
7
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
8
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
9
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
10
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
11
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
12
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
13
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
14
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
15
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
16
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
17
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
18
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
19
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
20
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
Daily Top 2Weekly Top 5

चामोर्शी शहरातील अंतर्गत रस्ते बकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 00:50 IST

चामोर्शी शहरातील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी जमा झाले असल्याने चिखल निर्माण झाले आहे. त्यामुळे चामोर्शीवासीय कमालीचे त्रस्त आहेत.

ठळक मुद्देडांबरी रस्त्यांवर पसरला चिखल : अनेक वर्षांपासून दुरुस्ती न झाल्याचा परिणाम, नवीन मुख्याधिकाऱ्यांपुढे आव्हान

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : चामोर्शी शहरातील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी जमा झाले असल्याने चिखल निर्माण झाले आहे. त्यामुळे चामोर्शीवासीय कमालीचे त्रस्त आहेत.चामोर्शी शहरातील शिवाजी ते बायपासकडे जाणाऱ्या मार्र्कंडादेव रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून रस्त्याची चाळणी झाली आहे. या मार्गावरून मार्र्कंडादेव येथे जाण्यासाठी भाविकांची वर्दळ राहते. सदर मार्ग डांबरी असला तरी डांबर शोधणे कठीण झाले आहे. ठिकठिकाणी गिट्टी व रेती बाहेर पडली आहे. कच्च्या मार्गाप्रमाणे सदर मार्ग दिसत आहे. बाजारपेठेकडे जाणाऱ्या मार्गावरही खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. खड्डे चुकवून वाहन पुढे नेताना वाहनधारकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. तहसील कार्यालयाकडे जाणाºया बायपास रस्त्यावर बीएसएनएल कार्यालयाजवळ रस्त्यावरील डांबर उखडला आहे. त्यामुळे या ठिकाणी पावसाचे पाणी साचून राहत असल्याने डबके निर्माण झाले आहे.तहसील कार्यालयाकडे जाण्यासाठी कमी अंतराचा मार्ग म्हणून नागरिक या मार्गावरून ये-जा करीत असतात. आष्टी कॉर्नर ते कृषी उत्पन्न बाजार समितीपर्यंत शहरातील एकमेव मुख्य मार्ग असून या रस्त्यावर बसस्टँड, लक्ष्मी गेट, पशु वैद्यकीय दवाखान्याजवळ खड्डे पडले आहेत. पंचायत समिती कार्यालयाशेजारी दुकानगाळ्यांसमोर नाली नसल्याने पावसाचे पाणी दुकानगाळ्यांसमोर साचून राहते. या साचलेल्या पाण्यातूनच नागरिकांना वाट काढावी लागत आहे.गतिरोधकांमुळे अपघात वाढलेचामोर्शी शहरातील अंतर्गत रस्त्यांवर प्रत्येकी जवळपास १०० फूट अंतरावर ठिकठिकाणी गतिरोधक बांधण्यात आले आहेत. मात्र गतिरोधकाच्या नियमानुसार गतिरोधक बांधले नाही. गतिरोधक बांधतांना विशिष्ट उतार देणे आवश्यक असताना एकदम चढभाग ठेवण्यात आला आहे. त्यामुळे वाहनाचे इंजिन गतिरोधकाला लागते. त्यामुळे वाहन क्षतिग्रस्त होत आहेत. त्याचबरोबर एकाचवेळी वाहन वर चढल्याने एकदम मोठा धक्का वाहनचालकाला बसतो. वाहनचालकाचे लक्ष नसल्यास व एकाचवेळी वाहन गतिरोधकाला धडकते. त्यामुळे वाहनचालक वाहनासह कोसळत आहेत. चुकीच्या पद्धतीने गतिरोधक बनविल्याने अपघात घडण्याचे प्रमाण वाढले आहे.गुरुवारी चामोर्शी येथे आठवडी बाजार भरतो. या बाजाराला ग्रामीण भागातून हजारो नागरिक येतात. आठवडी बाजार शहराच्या मध्यभागी आहे. त्यामुळे अंतर्गत रस्ते गर्दीने फुलून जातात. वाहनांचीही गर्दी वाढते. यामुळेही अपघात वाढले आहेत.मागील अनेक वर्षांपासून अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली असताना नगर पंचायतीने दुरूस्ती केली नाही. त्यामुळे या रस्त्यांचे हाल झाले आहेत. याचा त्रास नागरिकांना होत आहे.

टॅग्स :Rainपाऊस