शहरं
Join us  
Trending Stories
1
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
2
पावसाळ्यात होणार मुंबईकरांची कोंडी; रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे BMCचे उद्दिष्ट फोल!
3
राज्यासाठी शिंदे मुख्यमंत्री, आमच्यासाठी फडणवीसच सर्वस्व; गणेश नाईकांचे ठाण्यात सूचक वक्तव्य
4
पाकिस्तान, पाकिस्तानसारखा खेळला! विजयासाठी आयर्लंडसमोर टाकाव्या लागल्या धापा
5
सीईटीची साईट क्रॅश, प्रचंड मनस्ताप; नागपूरचे साैम्या दीक्षित व पार्थ असाटी यांना १०० टक्के
6
पाकिस्तानची विझण्यापूर्वीची फडफड! गोलंदाजांना सूर गवसला, पण क्षेत्ररक्षणात गचाळपणा दिसला 
7
काँग्रेसला इतक्या जागा कशा मिळाल्या? चौकशी व्हावी, राहुल गांधींवर रामदास आठवलेंचा पलटवार
8
लोकसभेत बालेकिल्ले राखले, आता विधानसभेच्या तयारीला लागा; CM शिंदेंचे शिवसैनिकांना निर्देश
9
वायकरांच्या मुलीकडेही मोबाईल, तक्रार आमची, मध्येच तहसीलदार कुठून आले; उमेदवार शाह यांचा गौप्यस्फोट
10
निखळ सौंदर्य.. निरागस हास्य.. पिवळ्या फ्लोरल फ्रॉकमध्ये आलिया भटचा 'क्यूट' लूक (Photos)
11
गौतम गंभीरच्या मागण्या BCCI कडून मान्य, लवकरच टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून होणार घोषणा 
12
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
13
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
14
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
15
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
16
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
17
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
18
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
19
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
20
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा

हत्तींच्या स्थलांतराचा निर्णय केंद्र की राज्य सरकारचा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2022 7:07 PM

Gadchiroli News कमलापूर आणि पातानीलच्या हत्ती कॅम्पमधील काही हत्तींसह ताडोबातील मिळून एकूण १३ हत्ती गुजरातच्या जामनगर येथील राधेकृष्ण टेंपल एलिफंट वेल्फेअर ट्रस्टकडे सोपविण्याचे पत्र मिळाल्यानंतर गडचिरोली जिल्ह्यात पुन्हा एकदा जनभावना उफाळून आली आहे.

ठळक मुद्देगडचिरोलीकरांच्या भावनेला राजकीय साद

गडचिरोली : जिल्ह्यातील कमलापूर आणि पातानीलच्या हत्ती कॅम्पमधील काही हत्तींसह ताडोबातील मिळून एकूण १३ हत्ती गुजरातच्या जामनगर येथील राधेकृष्ण टेंपल एलिफंट वेल्फेअर ट्रस्टकडे सोपविण्याचे पत्र मिळाल्यानंतर गडचिरोली जिल्ह्यात पुन्हा एकदा जनभावना उफाळून आली आहे. हा निर्णय केंद्र सरकारचा की राज्य सरकारचा? असा प्रश्न नागरिकांमध्ये विचारला जात आहे. दरम्यान हत्तींना हलविण्यास होत असलेला विरोध पाहून राजकीय पक्ष आणि पुढाऱ्यांकडूनही विरोधाचा सूर आळवला जात आहे.

सदर हत्तींच्या हस्तांतरणासाठी केंद्र शासनाने ना हरकत दिली असल्याचा उल्लेख राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (नियोजन व व्यवस्थापन- वन्यजी) युवराज एस. यांनी पाठविलेल्या पत्रात केला आहे. त्यावरून हत्ती हलविण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या यंत्रणेकडूनच घेतल्याचा समज केला जात आहे; परंतु गडचिरोलीचे खासदार अशोक नेते यांनी दिल्लीत केंद्र सरकारच्या संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी हा निर्णय राज्य सरकारनेच घ्यायचा असतो, आम्ही केवळ सूचना करतो, असे स्पष्ट केले. यामुळे हत्ती हलविण्यासाठी नेमके कोण जबाबदार, हे अजूनही स्पष्ट झालेले नाही.

पर्यटनाला चालना देण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील हत्ती कुठेही न हलविता येथेच त्यांचे योग्य पालनपोषण व्हावे, अशी जनभावना आहे. राज्य सरकारच्या वतीने गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी हत्तींना हलविण्याचा निर्णय रद्द करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी चर्चा करणार असल्याचे तीन दिवसांपूर्वी सांगितले. मात्र, मुंबईतून अद्याप कोणतीही सूचना किंवा आदेश वनाधिकाऱ्यांना मिळाला नाही. अशातच गुरुवारी (दि.१९) ताडोबातील हत्ती हलविण्यात आले आहेत.

टॅग्स :wildlifeवन्यजीव