शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 20:57 IST

एप्रिल ते जूनदरम्यान राज्यातील विविध स्तरांवरील चर्चांनंतर शांतता राखण्याबाबत सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. या पार्श्वभूमीवर मे महिन्यात माओवाद्यांनी सहा महिन्यांची युद्धबंदी घोषित केली होती.

गडचिरोली :  भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (माओवादी) तेलंगणा राज्य समितीने  युद्धबंदीला आणखी सहा महिन्यांसाठी वाढविण्याची घोषणा ५ नोव्हेंबरला केली आहे. मागील सहा महिन्यांपासून राज्यात प्रशासन, राजकीय पक्ष, तसेच सामाजिक संस्थांच्या सहकार्याने शांततेचे वातावरण निर्माण झाले असल्याने हा निर्णय घेतल्याचे माओवाद्यांच्या तेलंगणा समितीचा प्रतिनिधी जगन याने तेलुगुतून जारी केलेल्या पत्रकात नमूद केले आहे.

एप्रिल ते जूनदरम्यान राज्यातील विविध स्तरांवरील चर्चांनंतर शांतता राखण्याबाबत सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. या पार्श्वभूमीवर मे महिन्यात माओवाद्यांनी सहा महिन्यांची युद्धबंदी घोषित केली होती. त्या कालावधीत प्रशासनाकडूनही योग्य सहकार्य मिळाल्याचे जगन याने सांगितले.  मागील सहा महिन्यांत शांततेचे वातावरण राखण्यात सरकारने हातभार लावला. मात्र काही ठिकाणी शांतता भंग करण्याचे प्रयत्न होत असल्याची चिंता  त्याने व्यक्त केली आहे. राज्य समितीने शांततेच्या या वातावरणाला पुढेही चालना देण्यासाठी आणखी सहा महिन्यांची मुदतवाढ स्वतःहून जाहीर केली आहे. तसेच राज्य सरकारने शांततेचा भंग करणारी कोणतीही पावले उचलू नयेत, अशीही विनंती देखील केली आहे. केंद्राच्या धोरणावर टीका करा, पण....

समितीने सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, विद्यार्थी, शिक्षक आणि व्यावसायिकांना शांतता प्रक्रियेला पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. तसेच केंद्र सरकारच्या धोरणांवर आवश्यक ती रचनात्मक टीका करावी, असेही त्याने पत्रकात नमूद केले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Telangana Ceasefire Extended: Maoists Claim Government Responded to Peace Proposal.

Web Summary : Maoists in Telangana extended their ceasefire by six months, citing a positive response to their peace proposal. They urged the government to maintain peace and appealed for support from various groups, while also encouraging criticism of central government policies.
टॅग्स :naxaliteनक्षलवादीGadchiroliगडचिरोली