जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या माेठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे लग्न समारंभात २५ पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास जिल्हाधिकारी यांनी प्रतिबंध घातला आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी गावस्तरावर समित्या गठित करण्यात आल्या आहेत. तसेच ग्रामसेवक, तलाठी यांच्यावरही जबाबदारी साेपविण्यात आली आहे.
असे असतानाही तालुक्यातील मरकेगाव येथील एका लग्न समारंभात दीडशेपेक्षा अधिक व्यक्ती आढळून आल्या. त्यातील अनेकांनी मास्क घातला नव्हता. शारीरिक अंतराचे पालन करण्यात आले नव्हते. या सर्व गाेष्टींची शहानिशा केल्यानंतर स्थानिक कृती समिती, ग्रामसेवक, तलाठी, सरपंच यांनी पाेलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. तक्रारीवरून वर-वधूचे आईवडील व कॅटर्स मालकाविराेधात आपत्ती व्यवस्थापन व जमावबंदी आदेशानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
लग्नातील गर्दीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी ग्रामसेवक व तलाठी यांच्यावर साेपविण्यात आली आहे. मात्र, बहुतांश ग्रामसेवक घरूनच ग्रामपंचायतीचा कारभार हाकत आहेत. त्यामुळे गावात काय घडते हे माहीत राहत नाही. याचा गैरफायदा उचलून नागरिक धूमधडाक्यात लग्न करीत आहेत. त्यामुळेच काेराेना ग्रामीण भागातही वाढत चालला आहे.