शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

अग्निशामक खरेदी ठराव रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 12:35 AM

देसाईगंज नगरपालिकेने देवी फायर सर्व्हिसेस या कंपनीकडून ५९ लाख ८५ हजार रूपये किंमतीचे अग्निशामक सुरक्षा वाहन खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. सदर खरेदी किंमत बाजारभावापेक्षा अधिक असून खरेदी किंमत व बाजारभाव यात खूप मोठी तफावत आहे.

ठळक मुद्देनगरसेवकांची मागणी : दोन वाहने असतानाही तिसरे खरेदी करीत असल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : देसाईगंज नगरपालिकेने देवी फायर सर्व्हिसेस या कंपनीकडून ५९ लाख ८५ हजार रूपये किंमतीचे अग्निशामक सुरक्षा वाहन खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. सदर खरेदी किंमत बाजारभावापेक्षा अधिक असून खरेदी किंमत व बाजारभाव यात खूप मोठी तफावत आहे. शिवाय नगर पालिकेकडे आधीच दोन अग्निशामक असताना तिसऱ्या वाहनाची गरज काय, असा प्रश्न काही नगरसेवकांनी उपस्थित करून अग्निशामक सुरक्षा वाहन खरेदीचा ठराव रद्द करावा, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.देसाईगंज नगर पालिकेची सर्वसाधारण सभा १४ नोव्हेंबर २०१७ ला घेण्यात आली. या सभेत विषय क्रमांक ६३/२ नुसार अग्निशामक सुरक्षा वाहन खरेदी करण्याचा ठराव घेण्यात आला. परंतु ठरावानुसार अग्निशामक यंत्र ज्या कंपनीकडून खरेदी केले जाणार आहे, त्या कंपनीच्या वाहनाची खरेदी किंमत बाजारभावापेक्षा अधिक आहे. देसाईगंज शहरात अग्निशामक वाहन खरेदी करण्यापेक्षा पालिका क्षेत्रातील अनेक समस्या आहेत. तसेच आवश्यक सोयीसुविधाही अनेक वॉर्डांमध्ये नाही. वाहनावर खर्च होणारा निधी विकास कामांसाठी लावल्यास शहराचा विकास होण्यास मदत झाली असती, असे नगरसेवकांनी म्हटले आहे. अतिआवश्यक सेवा सोडून अग्निशामक सुरक्षा वाहनाची गरज नसतानाही वाहन खरेदी करण्यात आले. तसेच ५९ लाख ८५ हजार रूपये वाहन खरेदीच्या रकमेत वस्तूंचे विवरणही देण्यात आले नाही. विशेष म्हणजे ४९ लाख ९० हजार रूपये किंमतीपासून अनेक कंपनींचे अग्निशामक वाहन बाजारात उपलब्ध आहेत.वाहन खरेदीत ९ ते १० लाख रूपयापर्यंतचा अधिक निधी खर्च केला जात असून शासनाच्या पैशाचा दुरूपयोग पालिकेकडून केला जात आहे. यात नगर परिषदेलाही आर्थिक भूर्दंड पडणार आहे. त्यामुळे नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत पारित करण्यात आलेला अग्निशामक यंत्र खरेदी करण्याचा ठराव रद्द करावा, अशी मागणी गटनेता हाजी मो. आरिफ खानानी, नगरसेवक गणेश फाफट, नगरसेवक हरीश मोटवानी, नगरसेविका भाविका तलमले, उत्तरा तुमराम यांनी जिल्हाधिकाºयांकडे निवेद्वारे केली आहे. यासंदर्भात मुख्याधिकारी व नगराध्यक्षांनाही निवेदन सादर करण्यात आले आहे.शहरात स्वर्गरथ व रुग्णवाहिकेची आवश्यकतादेसाईगंज नगर पालिका क्षेत्रातील मयत व्यक्तींवर अंत्यसंस्कार करण्याकरिता वैनगंगा नदीकाठावर न्यावे लागतात. मुख्यालयापासून सदर अंतर तीन किमीचे आहे. त्यामुळे पालिकेला स्वत:च्या मालकीचे एक स्वर्गरथ आवश्यक आहे. शिवाय नगरपालिकेत रुग्णवाहिकाही उपलब्ध नाही. पालिका क्षेत्रातील आजारी लोकांना खासगी वाहनाने रुग्णालयात दाखल करावे लागते. त्यामुळे नगर पालिकेला रुग्णवाहिका व स्वर्गरथाची आवश्यकता आहे. अत्यंत निकडीच्या वस्तू खरेदी न करता पालिकेत उपलब्ध असलेल्या वस्तूंची खरेदी केली जात आहे, असा आरोपही नगरसेवकांनी प्रशासनावर केला आहे.