शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
2
Court: राजकारण्यांवरील खटल्यांचा निपटारा करा! महाराष्ट्र, गोव्यातील ४७८ प्रकरणांवर हायकोर्टाचे आदेश
3
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
4
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
5
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
6
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
7
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
8
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
9
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
10
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
11
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
12
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
13
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
14
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
15
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
16
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
17
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
18
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
19
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
20
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
Daily Top 2Weekly Top 5

प्राध्यापक भरतीत संवर्गनिहाय आरक्षण लागू करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:31 IST

गडचिराेली : राज्यातील अकृषी विद्यापीठे व संलग्न महाविद्यालयातील शिक्षकीय पदभरतीमध्ये केंद्र शासनाने ८ मार्च २०१९ रोजी लागू केलेला संवर्गनिहाय ...

गडचिराेली : राज्यातील अकृषी विद्यापीठे व संलग्न महाविद्यालयातील शिक्षकीय पदभरतीमध्ये केंद्र शासनाने ८ मार्च २०१९ रोजी लागू केलेला संवर्गनिहाय आरक्षण कायदा २०१९ ची अंमलबजावणी महाराष्ट्रात लवकरच करण्यात येणार असून यासंदर्भात सात ते आठ दिवसात शासन निर्णय निर्गमित होणार असल्याची ग्वाही राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या शिष्टमंडळाला दिली.

गाेंडवाना विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभासाठी ना. सावंत गुरुवारी गडचिराेली येथे आले हाेते. यावेळी ओबीसी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. त्यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रामध्ये कृषी विद्यापीठे व संलग्न महाविद्यालयातील शिक्षकीय (प्राध्यापक) पदभरतीमध्ये २५ ऑगस्ट २०१५ च्या शासन निर्णयाद्वारे विषयनिहाय आरक्षण लागू आहे. त्यानुसार शिक्षक पदभरती होत आहे. विषयनिहाय आरक्षणामुळे मागास प्रवर्गातील ओबीसी, एनटी, व्हीजे, एसबीसी, ईडब्ल्यूएस पात्रताधारकांना आरक्षण धोरणानुसार प्रतिनिधित्व मिळत नसल्यामुळे त्यांच्यावर प्रचंड अन्याय होत आहे. याप्रकरणी २४ ऑगस्ट २०१५ चा शासन निर्णय रद्द करून केंद्र सरकारने लागू केलेला संवर्गनिहाय शिक्षक भरती कायदा २०१९ महाराष्ट्रात लागू करावा आणि विद्यापीठ व महाविद्यालय एकक मानून संवर्गनिहाय आरक्षण निश्‍चिती करून पदभरती नव्याने सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदन देताना ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा. शेषराव येलेकर, सिनेट सदस्य ॲड. गाेविंद भेंडारकर उपस्थित हाेते.

===Photopath===

070221\07gad_1_07022021_30.jpg

===Caption===

ना.उदय सामंत यांच्याशी चर्चा करताना प्रा. शेषराव येलेकर, ॲड.गाेविंद भेंडारकर.