शहरं
Join us  
Trending Stories
1
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
2
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
3
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
4
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
5
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
6
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
7
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
8
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
9
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
10
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
11
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
12
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
13
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
14
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
15
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
16
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
17
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
18
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
19
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
20
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांवर दप्तराचे ओझे कायमच

By admin | Updated: July 9, 2017 02:26 IST

अधिक वजनाच्या दप्तरांमुळे विद्यार्थ्यांना शारीरिक व मानसीक व्याधी जडण्याची शक्यता असल्याने

शासनाच्या निर्णयाला शाळा व पालकांची बगल : गडचिरोली, आरमोरी व धानोरा येथे विद्यार्थ्यांचे प्रत्यक्ष वजन लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली/आरमोरी/धानोरा : अधिक वजनाच्या दप्तरांमुळे विद्यार्थ्यांना शारीरिक व मानसीक व्याधी जडण्याची शक्यता असल्याने विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे त्याच्या एकूण वजनाच्या १० टक्केपेक्षा अधिक नसावे, असे निर्देश शासनाने दिले असले तरी शाळा व शिक्षण विभाग याची अंमलबजावणी करीत नसल्याने विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे शासनाने ठरवून दिलेल्या वजनापेक्षा कित्येक पटीने अधिक असल्याचे लोकमतने गडचिरोली, आरमोरी व धानोरा येथे शनिवारी केलेल्या स्टिंग आॅपरेशनदरम्यान दिसून आले आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे अधिक झाल्यास मुलांमध्ये पाठदुखीचा त्रास होणे, सांधे आखडणे, स्नायू आखडणे, मनक्याची झिज होणे, मान दुखणे, फुफ्फुसांची कार्यक्षमता कमी होणे, थकवा येणे, मानसिक ताण येणे, डोकेदुखी यासाखरे आजार होऊ शकतात. याचा विपरित परिणाम मुलांच्या शारीरिक वाढीवर होतो. बालवयात विद्यार्थ्यांच्या शरीरावर होणाऱ्या अनिष्ट परिणांमुळे भविष्यातही त्यांना अनेक शारीरिक व मानसिक व्याधी जडू शकतात. शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेच्या अनुषंगाने दप्तराचे ओझे कमी करण्याबाबत शासनाने निर्णय घेतला आहे. त्यानुसार दप्तराचे वजन विद्यार्थ्याच्या वजनापेक्षा १० टक्केपेक्षा अधिक असू नये. या नियमाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित मुख्याध्यापकांवर सोपविण्यात आली आहे. शिक्षणाधिकारी, गट शिक्षणाधिकारी यांनी सुध्दा अधूनमधून शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन १० टक्के राहिल. याबाबतच्या सूचना द्यायच्या आहेत. मात्र शिक्षण विभाग दप्तरांच्या ओझ्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे शासनाने निर्णय घेतला असला तरी दप्तराचे ओझे अजूनपर्यंत कमी झाले नाही. लोकमत प्रतिनिधींनी आरमोरी, गडचिरोली व धानोरा येथील शाळांना प्रत्यक्ष भेटी देऊन विद्यार्थ्यांचे वजन केले. यावेळी विद्यार्थ्यांचे वजन दिलेल्या प्रमाणापेक्षा अधिक असल्याचे आढळून आले आहे. शिक्षण विभागाने याची दखल घेण्याची गरज आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये मध्यान्ह भोजन दिले जाते. तेथील विद्यार्थी टिपीन व पाण्याची बॉटल फार क्वचित नेतात. त्यामुळे तेथील विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या तुलनेत कमी राहते. या शाळांवर विशेष लक्ष ठेवण्याची मागणी आहे. शाळा प्रशासनाचे दुर्लक्ष दप्तराचे ओझे कमी करण्यात शाळा प्रशासनाचा मोलाचा वाटा राहतो. त्यामुळे शाळेने दप्तराच्या वजनाबाबत दक्ष असणे आवश्यक आहे. इंग्रजी माध्यमांच्या शाळेतील विद्यार्थी जेवनाचा डब्बा घेऊन जातात. डब्ब्यासोबतच पाण्याची बॉटलही ठेवली जाते. बॉटलमधील पाण्याचे वजन अर्धा ते एक किलो होते. त्यामुळे शाळेने शक्यतोवर शुध्द पाण्याची व्यवस्था शाळेतच करावी, पाठ्यापुस्तकांव्यतिरिक्त जाड पुठ्यांच्या फूलस्केप वह्या, प्रयोग वह्या, अधिक पानांच्या वह्या, अनावश्यक लेखन साहित्य, चित्रकला साहित्य, डिक्शनरी, रायटींग पॅड, खासगी प्रकाशनाचे पुरक साहित्य, शिकवणीचे दप्तर, स्वाध्याय पुस्तिका, खेळाचे साहित्य, सौंदर्य प्रसाधने आणण्यावर प्रतिबंध घातल्यास दप्तराचे ओझे कमी होण्यास मदत होईल. शाळेत ई-लर्निंगचा वापर वाढावावा, जेणेकरून विद्यार्थ्यांना पुस्तके आणण्याची गरज पडणार नाही. मुख्याध्यापकांनी अधूनमधून विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन करावे.