सरकारविरोधी पक्षाचा खासदार देण्याची परंपरा खंडीत
By Admin | Updated: May 17, 2014 23:39 IST2014-05-17T23:39:13+5:302014-05-17T23:39:13+5:30
गडचिरोली-चिमूर हा नवा मतदार संघ उदयाला आला असला तरी यापूर्वी गडचिरोली जिल्हा लोकसभा निवडणूकीच्या रिंगणात दोन मतदार संघांमध्ये सहभागी होता.

सरकारविरोधी पक्षाचा खासदार देण्याची परंपरा खंडीत
गडचिरोली : गडचिरोली-चिमूर हा नवा मतदार संघ उदयाला आला असला तरी यापूर्वी गडचिरोली जिल्हा लोकसभा निवडणूकीच्या रिंगणात दोन मतदार संघांमध्ये सहभागी होता. या जिल्ह्याने कायम विरोधी बाजूला मोठा कौल देण्याचे काम केले आहे. मात्र २००९ नंतरच्या निवडणुकीत ही परंपरा बदलली. २००९ मध्ये काँग्रेसचे सरकार व काँग्रेसचा खासदार गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघाने पाठविला व २०१४ च्या सोळाव्या लोकसभेत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले व गडचिरोली-चिमूरमधूनही भाजपचाच उमेदवार निवडून आला. त्यामुळे परिवर्तनाची परंपरा मतदारांनी मात्र कायम ठेवली आहे. १९९१ च्या निवडणूकीत मतदार संघाने काँग्रेसचे शांताराम पोटदुखे यांच्या बाजुने कौल दिला. या मतदार संघाचा या लोकसभा निवडणूकीत गडचिरोली जिल्ह्याचा विचार करता चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात समाविष्ट असलेल्या गडचिरोली-सिरोंचा या मतदार संघाने मात्र आपला कल नेहमी बदलवित ठेवला. ९१ च्या निवडणूकीत काँग्रेसचे शांताराम पोटदुखे यांचा सामना भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत झाला. या निवडणूकीत अहेरीचे राजे विश्वेश्वरराव महाराजही रिंगणात होते. पोटदुखे यांना गडचिरोली विधानसभा क्षेत्रात २५९९५, सिरोंचा विधानसभा क्षेत्रात १७९७९, राजे विश्वेश्वरराव महाराज यांना गडचिरोली क्षेत्रात २७४५ तर अहेरी क्षेत्रात १५८९१, भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांना गडचिरोली क्षेत्रात २६२७५, अहेरी क्षेत्रात ७८५८ मते मिळाली. याच निवडणूकीत चंद्रपूर लोकसभा मतदार संघातूनही भाजप विजयी झाला. हंसराज अहिर निवडून आलेत. यावेळी गडचिरोली विधानसभा क्षेत्रात त्यांना ४८२४०, सिरोंचा विधानसभा क्षेत्रात १७६०६ या निवडणूकीत नाग विदर्भ आंदोलन समितीचे राजे विश्वेश्वरराव महाराज पुन्हा रिंगणात होते. त्यांना गडचिरोली क्षेत्रात ६५६८, सिरोंचा क्षेत्रात ३९१७९ मते मिळाली. या निवडणूकीत काँग्रेसचे शांताराम पोटदुखे यांना गडचिरोली क्षेत्रात २४२९० तर सिरोंचा क्षेत्रात २६३४९ मते मिळाली. या निवडणूकीत अपक्ष म्हणून नरेश पुगलियाही रिंगणात होते. त्यांना गडचिरोली क्षेत्रात ९९६७ तर सिरोंचा क्षेत्रात ५२६८ मते मिळाली. काँग्रेसच्या मत विभाजनामुळे भाजपचा मार्ग मोकळा झाला होता. या निवडणूकीत चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातून काँग्रेसच्या तिकीटावर नरेश पुगलिया निवडून आलेत. त्यावेळी पुगलिया यांना गडचिरोली क्षेत्रात ५९४३१, सिरोंचा क्षेत्रात ६६९०२, भाजपचे हंसराज अहिर यांना गडचिरोली क्षेत्रात ५५८११ व सिरोंचा क्षेत्रात ३३९४० मते मिळाली. १९९९ च्या निवडणूकीत चंद्रपूर लोकसभा मतदार संघातून काँग्रेस पुन्हा विजयी झाली. नरेश पुगलिया यांना पुन्हा संधी मिळाली. मात्र गडचिरोली विधानसभा क्षेत्रात भाजपने आघाडी घेतली. २००४ च्या चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातून हंसराज अहिर भाजपच्या तिकीटावर निवडून आले. त्यांना गडचिरोली क्षेत्रातून ६२०९९, पुगलिया यांना ४११७७, बसपाचे राजेंद्र वैद्य यांना १८४७७, सिरोंचा मतदार संघात अहिर यांना ५६७१३, पुगलिया यांना ३७७६८, वैद्य यांना १७१९९ मते मिळाली. एकुणच जुन्या चिमूर व चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचा कौल पाहता भाजप व काँग्रेस यांना आलटूनपालटून आघाडी मिळत राहिली.