शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

१०५ वर्षांची परंपरा, बोनालू उत्सवाची सांगता; ३ राज्यातील हजारो भाविकांनी घेतले मल्लिकार्जुनाचे दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2022 15:23 IST

भाविकांच्या गर्दीने मल्लिकार्जुन स्वामी मंदिराचा परिसर फुलून गेला

कौसर खान

सिरोंचा (गडचिरोली) : तालुका मुख्यालयापासून ८ किलोमीटर अंतरावर असलेल्या आरडा गावातील मल्लिकार्जुन स्वामी मंदिर परिसरात दोन दिवसीय बोनालू (जत्रा) उत्सवाची मोठ्या उत्साहात सांगता झाली. यावेळी सिरोंचा तालुक्यातील आणि तेलंगणा राज्यातील जवळपास ३५ हजार भाविकांच्या गर्दीने मल्लिकार्जुन स्वामी मंदिराचा परिसर फुलून गेला होता.

आरडा गावात असलेल्या मल्लिकार्जुन स्वामी मंदिरात दरवर्षी डिसेंबर महिन्यात जत्रा भरते. या वर्षीसुद्धा जत्रेचे आयोजन करण्यात आले होते. मल्लिकार्जुन स्वामी यांचे भक्तगण सिरोंचा तालुक्यासह तेलंगाणा व आहेत. त्या भाविकांनी या उत्सवादरम्यान आवर्जून हजेरी लावली होती. भक्तगण मल्लिकार्जून स्वामींचे दर्शन घेऊन पूजाअर्चा करीत होते. आपली मनोकामना पूर्ण व्हावी यासाठी स्वामींना साकडे घालीत होते.

मल्लिकार्जुन स्वामी जत्रा ही तालुक्यातील सर्वांत मोठी जत्रा आहे. ही जत्रा भाविक व नागरिकांसाठी आकर्षणाचे केंद्र असते. भाविकांच्या मनोरंजनासाठी तेलंगाणा येथील कलाकारांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन बोनालूच्या आदल्या दिवशी करण्यात आले. या कार्यक्रमासाठी मंदिर कमिटीचे रंगू बापू ज्यांच्यासह श्रीनिवास अनापर्ती, मनोज रंगू यांच्यासह गावातील नागरिकांनी सहकार्य केले. जत्रेदरम्यान अनुचित घटना घडू नये यासाठी . सिरोंचाचे पोलिस निरीक्षक विश्वास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

कोरोनाकाळानंतरची पहिलीच जत्रा

दोन वर्षांच्या कोरोनाकाळात जत्रेला परवानगी नव्हती. त्यामुळे भाविकांची संख्याही मर्यादित राहात होती. या वर्षीची जत्रा निर्बंध हटल्यानंतर पहिलीच होती. त्यामुळे बोनालूसाठी यंदा भाविकांच्या संख्येमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून आले. तेलंगाणा व छत्तीसगड राज्यातील भाविकांच्याही संख्येत वाढ झाली आहे. १२ डिसेंबर रोजी शेकडो भाविकांनी खिरीचे मडके डोक्यावर ठेवून मंदिरासभोवताल प्रदक्षिणा घातली. यामुळे यात्रा फुलून गेली होती.

काय आहे बोनालू?

बोनालू म्हणजे एका कलशात प्रसादरूपी खिर शिजविली जाते. शिजलेली खिर झेंडूच्या फुलांनी सजविलेल्या मडक्यात ठेवली जाते. नंतर ते मडके डोक्यावर घेऊन महिला भाविक मंदिराच्या सभोवताल तीन प्रदक्षिणा घालतात. त्यानंतर स्वामींना प्रसाद अर्पण करून उपस्थित भाविकांनाही प्रसाद वाटला जातो.

बैलबंडीने गाठले जत्रेचे गाव

अलीकडच्या काळात सर्वत्र चारचाकी वाहनांचा सुळसुळाट झालेला असला तरीही आरडा येथील बोनालू जत्रेसाठी तालुक्यातील मेडाराम, कारसपल्ली, रंगय्यापली येथील भाविक जुन्या परंपरेनुसार बैलबंडीनेच आले होते. यामुळे यात्रेच्या रस्त्यावर बैलबंड्यांची रांग लागली होती.

टॅग्स :SocialसामाजिकGadchiroliगडचिरोली