शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

१०५ वर्षांची परंपरा, बोनालू उत्सवाची सांगता; ३ राज्यातील हजारो भाविकांनी घेतले मल्लिकार्जुनाचे दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2022 15:23 IST

भाविकांच्या गर्दीने मल्लिकार्जुन स्वामी मंदिराचा परिसर फुलून गेला

कौसर खान

सिरोंचा (गडचिरोली) : तालुका मुख्यालयापासून ८ किलोमीटर अंतरावर असलेल्या आरडा गावातील मल्लिकार्जुन स्वामी मंदिर परिसरात दोन दिवसीय बोनालू (जत्रा) उत्सवाची मोठ्या उत्साहात सांगता झाली. यावेळी सिरोंचा तालुक्यातील आणि तेलंगणा राज्यातील जवळपास ३५ हजार भाविकांच्या गर्दीने मल्लिकार्जुन स्वामी मंदिराचा परिसर फुलून गेला होता.

आरडा गावात असलेल्या मल्लिकार्जुन स्वामी मंदिरात दरवर्षी डिसेंबर महिन्यात जत्रा भरते. या वर्षीसुद्धा जत्रेचे आयोजन करण्यात आले होते. मल्लिकार्जुन स्वामी यांचे भक्तगण सिरोंचा तालुक्यासह तेलंगाणा व आहेत. त्या भाविकांनी या उत्सवादरम्यान आवर्जून हजेरी लावली होती. भक्तगण मल्लिकार्जून स्वामींचे दर्शन घेऊन पूजाअर्चा करीत होते. आपली मनोकामना पूर्ण व्हावी यासाठी स्वामींना साकडे घालीत होते.

मल्लिकार्जुन स्वामी जत्रा ही तालुक्यातील सर्वांत मोठी जत्रा आहे. ही जत्रा भाविक व नागरिकांसाठी आकर्षणाचे केंद्र असते. भाविकांच्या मनोरंजनासाठी तेलंगाणा येथील कलाकारांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन बोनालूच्या आदल्या दिवशी करण्यात आले. या कार्यक्रमासाठी मंदिर कमिटीचे रंगू बापू ज्यांच्यासह श्रीनिवास अनापर्ती, मनोज रंगू यांच्यासह गावातील नागरिकांनी सहकार्य केले. जत्रेदरम्यान अनुचित घटना घडू नये यासाठी . सिरोंचाचे पोलिस निरीक्षक विश्वास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

कोरोनाकाळानंतरची पहिलीच जत्रा

दोन वर्षांच्या कोरोनाकाळात जत्रेला परवानगी नव्हती. त्यामुळे भाविकांची संख्याही मर्यादित राहात होती. या वर्षीची जत्रा निर्बंध हटल्यानंतर पहिलीच होती. त्यामुळे बोनालूसाठी यंदा भाविकांच्या संख्येमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून आले. तेलंगाणा व छत्तीसगड राज्यातील भाविकांच्याही संख्येत वाढ झाली आहे. १२ डिसेंबर रोजी शेकडो भाविकांनी खिरीचे मडके डोक्यावर ठेवून मंदिरासभोवताल प्रदक्षिणा घातली. यामुळे यात्रा फुलून गेली होती.

काय आहे बोनालू?

बोनालू म्हणजे एका कलशात प्रसादरूपी खिर शिजविली जाते. शिजलेली खिर झेंडूच्या फुलांनी सजविलेल्या मडक्यात ठेवली जाते. नंतर ते मडके डोक्यावर घेऊन महिला भाविक मंदिराच्या सभोवताल तीन प्रदक्षिणा घालतात. त्यानंतर स्वामींना प्रसाद अर्पण करून उपस्थित भाविकांनाही प्रसाद वाटला जातो.

बैलबंडीने गाठले जत्रेचे गाव

अलीकडच्या काळात सर्वत्र चारचाकी वाहनांचा सुळसुळाट झालेला असला तरीही आरडा येथील बोनालू जत्रेसाठी तालुक्यातील मेडाराम, कारसपल्ली, रंगय्यापली येथील भाविक जुन्या परंपरेनुसार बैलबंडीनेच आले होते. यामुळे यात्रेच्या रस्त्यावर बैलबंड्यांची रांग लागली होती.

टॅग्स :SocialसामाजिकGadchiroliगडचिरोली