शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

१०५ वर्षांची परंपरा, बोनालू उत्सवाची सांगता; ३ राज्यातील हजारो भाविकांनी घेतले मल्लिकार्जुनाचे दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2022 15:23 IST

भाविकांच्या गर्दीने मल्लिकार्जुन स्वामी मंदिराचा परिसर फुलून गेला

कौसर खान

सिरोंचा (गडचिरोली) : तालुका मुख्यालयापासून ८ किलोमीटर अंतरावर असलेल्या आरडा गावातील मल्लिकार्जुन स्वामी मंदिर परिसरात दोन दिवसीय बोनालू (जत्रा) उत्सवाची मोठ्या उत्साहात सांगता झाली. यावेळी सिरोंचा तालुक्यातील आणि तेलंगणा राज्यातील जवळपास ३५ हजार भाविकांच्या गर्दीने मल्लिकार्जुन स्वामी मंदिराचा परिसर फुलून गेला होता.

आरडा गावात असलेल्या मल्लिकार्जुन स्वामी मंदिरात दरवर्षी डिसेंबर महिन्यात जत्रा भरते. या वर्षीसुद्धा जत्रेचे आयोजन करण्यात आले होते. मल्लिकार्जुन स्वामी यांचे भक्तगण सिरोंचा तालुक्यासह तेलंगाणा व आहेत. त्या भाविकांनी या उत्सवादरम्यान आवर्जून हजेरी लावली होती. भक्तगण मल्लिकार्जून स्वामींचे दर्शन घेऊन पूजाअर्चा करीत होते. आपली मनोकामना पूर्ण व्हावी यासाठी स्वामींना साकडे घालीत होते.

मल्लिकार्जुन स्वामी जत्रा ही तालुक्यातील सर्वांत मोठी जत्रा आहे. ही जत्रा भाविक व नागरिकांसाठी आकर्षणाचे केंद्र असते. भाविकांच्या मनोरंजनासाठी तेलंगाणा येथील कलाकारांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन बोनालूच्या आदल्या दिवशी करण्यात आले. या कार्यक्रमासाठी मंदिर कमिटीचे रंगू बापू ज्यांच्यासह श्रीनिवास अनापर्ती, मनोज रंगू यांच्यासह गावातील नागरिकांनी सहकार्य केले. जत्रेदरम्यान अनुचित घटना घडू नये यासाठी . सिरोंचाचे पोलिस निरीक्षक विश्वास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

कोरोनाकाळानंतरची पहिलीच जत्रा

दोन वर्षांच्या कोरोनाकाळात जत्रेला परवानगी नव्हती. त्यामुळे भाविकांची संख्याही मर्यादित राहात होती. या वर्षीची जत्रा निर्बंध हटल्यानंतर पहिलीच होती. त्यामुळे बोनालूसाठी यंदा भाविकांच्या संख्येमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून आले. तेलंगाणा व छत्तीसगड राज्यातील भाविकांच्याही संख्येत वाढ झाली आहे. १२ डिसेंबर रोजी शेकडो भाविकांनी खिरीचे मडके डोक्यावर ठेवून मंदिरासभोवताल प्रदक्षिणा घातली. यामुळे यात्रा फुलून गेली होती.

काय आहे बोनालू?

बोनालू म्हणजे एका कलशात प्रसादरूपी खिर शिजविली जाते. शिजलेली खिर झेंडूच्या फुलांनी सजविलेल्या मडक्यात ठेवली जाते. नंतर ते मडके डोक्यावर घेऊन महिला भाविक मंदिराच्या सभोवताल तीन प्रदक्षिणा घालतात. त्यानंतर स्वामींना प्रसाद अर्पण करून उपस्थित भाविकांनाही प्रसाद वाटला जातो.

बैलबंडीने गाठले जत्रेचे गाव

अलीकडच्या काळात सर्वत्र चारचाकी वाहनांचा सुळसुळाट झालेला असला तरीही आरडा येथील बोनालू जत्रेसाठी तालुक्यातील मेडाराम, कारसपल्ली, रंगय्यापली येथील भाविक जुन्या परंपरेनुसार बैलबंडीनेच आले होते. यामुळे यात्रेच्या रस्त्यावर बैलबंड्यांची रांग लागली होती.

टॅग्स :SocialसामाजिकGadchiroliगडचिरोली