शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
2
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
3
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
4
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
5
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
6
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
7
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
8
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
9
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
10
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
11
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
12
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
13
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
15
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
16
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
17
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
18
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

नागालँडच्या जामींच्या मृत्यूने भामरागड हळहळले

By admin | Updated: April 18, 2017 01:01 IST

भामरागड तालुक्यात मागील एक वर्षापासून दुर्गम व अतिदुर्गम भागापर्यंत जाऊन आरोग्य सेवा पुरविणारे डॉ. आर. एल. जामी यांच्या ....

वैद्यकीय अधिकाऱ्यांवरही आरोप : सोशल मीडियावर मृत्यूबाबत आरोप प्रत्यारोपाच्या फैरीभामरागड/गडचिरोली : भामरागड तालुक्यात मागील एक वर्षापासून दुर्गम व अतिदुर्गम भागापर्यंत जाऊन आरोग्य सेवा पुरविणारे डॉ. आर. एल. जामी यांच्या अकस्मात मृत्यूने भामरागड व परिसरातील गावांवर शोककळा पसरली आहे. २० मार्च २०१६ पासून भामरागड परिसरात वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. जामी हे कार्यरत होते. अवघ्या काही कालावधीतच त्यांनी या भागात स्वत:च्या कार्यशैलीने छाप पाडली होती. सर्वसामान्यांना आपलेसे वाटणाऱ्या या डॉक्टरचा मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या मृत्यूची बातमी रविवारी येताच भामरागड ग्रामीण रूग्णालयासमोर ३०० च्यावर नागरिक उपस्थित होते. त्यांचा प्रचंड रोष आरोग्य शिबिर आयोजित करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर होता. लाहेरी पोलीस ठाण्यात या घटनेसंदर्भात जिल्हा कुष्ठरोग अधिकारी डॉ. अमित साळवे यांनी तक्रार नोंदविली. या तक्रारीत साळवे यांनी १६ एप्रिल रोजी मॅग्मो संघटनेच्या वतीने आरोग्य तपासणीचे शिबिर बिनागुंडा व कुवाकोडी या ठिकाणी घेण्यासाठी गडचिरोली व भामरागडच्या डॉक्टरांचे पथक गेले होते. यातील काही डॉक्टर कुवाकोडी येथे गेले. तर काही डॉक्टर बिनागुंडा येथे थांबले व काही लोक धबधब्यावर आंघोळ करीत होते. त्यातच डॉ. रूंगचो जामी यांचाही समावेश होता. पाण्यात गुदमरून त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती डॉ. साळवे यांनी लाहेरी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत दिली. त्यानुसार पोलिसांनी या प्रकरणी मर्ग दाखल केला आहे. उल्लेखनिय बाब म्हणजे सदर डॉक्टरांच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर आरोग्य शिबिरासाठी गेलेल्या डॉक्टरांच्या वर्तनाबाबत प्रचंड चर्चा सुरू आहे. या शिबिराची कुणालाही माहिती नव्हती. डॉ. जामी यांच्या मृत्यूनंतर ही बाब समोर आली व सहलीसाठी गेलेल्या या डॉक्टरांनी आरोग्य शिबिराचा फार्स निर्माण केला. आरोग्य शिबिराच्या आयोजनाबाबत पूर्व नियोजीत कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. सुटीच्या दिवशी हे शिबिर घेण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या संघटनेचे नाव समोर करून हे प्रकरण अंगावर शेकू न देण्याची भूमिका सहभागी डॉक्टर घेत असल्याचा आरोप होऊ लागला आहे. खरोखरच आरोग्य शिबिरासाठी हे डॉक्टर आले होते काय, एवढ्या दुर्गम व संवेदनशील भागात जाण्यासाठी पोलिसांची परवानगी घेतली होती काय, आदी अनेक प्रश्न डॉ. जामी यांच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावरून भामरागड भागातील नागरिकांसह जिल्ह्यातील नागरिकांनी उपस्थित केले आहे. याचे समाधानकारक उत्तर शिबिरात सहभागी झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून लोकमतने जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, कुणीही ठोसपणे काहीही सांगू शकले नाही. घटना दुर्दैवी झाली, एवढेच त्यांनी सांगितले. डॉक्टर जामी यांना चांगल्या प्रकारचे पोहणे येत होते. असे असताना त्यांचा मृत्यू कसा होऊ शकतो. ते रोज भामरागडला नदीवर आंघोळ करायचे. अशा माणसाला पाण्याची भिती कशी वाटेल, आदी अनेक प्रश्न या मृत्यूने निर्माण केले आहेत. या आरोग्य शिबिरासाठी जाणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची कसून चौकशी करावी, अशी मागणी भामरागडवासीयांनी केली आहे. यातील काही वैद्यकीय अधिकाऱ्यांना धड चालता येत नव्हते, अशी माहिती काही प्रत्यक्षदर्शींनी लोकमतशी बोलताना दिली. नार्थ इस्ट भागातून येऊन नागालँडचे डॉ. जामी येथे सेवा देतात व त्यांचा अकाली मृत्यू होतो. यामुळे पुरोगामी महाराष्ट्राची मानही झुकली आहे, अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे.