शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

अन्यायाविरोधात एकजूट व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 12:31 AM

राज्य शासनाने सातवा वेतन आयोग जानेवारी २०१६ पासून देण्याचे अभिवचन दिले होते. तब्बल एक वर्ष लोटूनही तो लागू केला नाही. यासोबतच शासनाने ३० टक्के नोकर कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यासर्व निर्णयाविरूद्ध लढा देण्यासाठी राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्र यावे, ....

ठळक मुद्देउमेशचंद्र चिलबुले यांचे प्रतिपादन : अहेरी व एटापल्लीत कर्मचाऱ्यांची सभा

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी/एटापल्ली : राज्य शासनाने सातवा वेतन आयोग जानेवारी २०१६ पासून देण्याचे अभिवचन दिले होते. तब्बल एक वर्ष लोटूनही तो लागू केला नाही. यासोबतच शासनाने ३० टक्के नोकर कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यासर्व निर्णयाविरूद्ध लढा देण्यासाठी राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्र यावे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे राज्याध्यक्ष उमेशचंद्र चिलबुले यांनी केले.मुंबई येथे २२ फेब्रुवारीला राज्यातील सर्व कर्मचारी संघटनेच्यावतीने मंत्रालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात सहभागी होण्यासाठी शुक्रवार १९ जानेवारीला अहेरी व एटापल्ली येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. कार्यक्रमाला एटापल्लीचे संवर्ग विकास अधिकारी ए.आर. वाघमारे, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रतन शेंडे, ग्रामसेवक युनियनचे जिल्हाध्यक्ष कविश्वर बनपूरकर, सहसचिव दामोधर पटले, कोषाध्यक्ष खुशाल नेवारे, विभागीय उपाध्यक्ष प्रदीप भांडेकर, जिल्हा उपाध्यक्ष रमन गंजीवार, पांडुरंग पेशने उपस्थित होते.पुढे बोलताना चिलबुले म्हणाले, राज्य सरकार कर्मचाऱ्यांच्या विरोधात निर्णय घेत आहे, शासनाच्या तिजोरीवरील भार कमी करून कायदेशीर असलेला सातवा वेतन लागू करू, असे सांगून वेळ मारून नेण्याचे काम करीत आहे. तर दुसरीकडे नोकर कपात करून कंत्राटी कर्मचारी पद भरती सुरु केली आहे. हा सुशिक्षित युवकांवर अन्याय आहे. त्यामुळे यासर्व अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी एकत्रित यावे, असेही उमेशचंद्र चिलबुले म्हणाले. कार्यक्रमाला अहेरी व एटापल्ली तालुक्यातील बहुसंख्य कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते.