शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
2
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
3
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
4
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
5
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
6
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
7
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
8
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
9
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
10
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
11
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
12
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
13
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
14
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
15
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
16
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
17
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
18
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
19
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
20
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून

विकासासाठी कटिबद्ध होऊ या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 12:25 AM

आकांक्षित जिल्हा कार्यक्रमाच्या निमित्ताने विकासाचे उद्दिष्ट समोर आहे. आता नियोजन होत आहे. यातून प्रत्यक्षात सुरुवात करीत गडचिरोलीच्या विकासासाठी कटिबद्ध होऊ या, असे आवाहन आमदार डॉ. देवराव होळी यांनी ‘गडचिरोली संवाद’ या चार दिवसीय विचारमंथन व प्रशिक्षण कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी केले.

ठळक मुद्देआमदारांचे आवाहन : चार दिवसीय विचारमंथन व प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आकांक्षित जिल्हा कार्यक्रमाच्या निमित्ताने विकासाचे उद्दिष्ट समोर आहे. आता नियोजन होत आहे. यातून प्रत्यक्षात सुरुवात करीत गडचिरोलीच्या विकासासाठी कटिबद्ध होऊ या, असे आवाहन आमदार डॉ. देवराव होळी यांनी ‘गडचिरोली संवाद’ या चार दिवसीय विचारमंथन व प्रशिक्षण कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी केले.यावेळी आमदार कृष्णा गजबे, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड, सहायक जिल्हाधिकारी सचिन ओंबासे, अपर जिल्हाधिकारी अशोकचौधरी, प्रकल्प अधिकारी पठारे, जिल्हा नियोजन अधिकारी तेजबहादूर तिडके प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.याप्रसंगी आ.कृष्णा गजबे म्हणाले की, गडचिरोली संवाद या चर्चासत्रात विविध विभागाच्या अधिकारी, कर्मचारी यांच्यात सकारात्मक विचार मंथन होवून विकासाचा प्रारुप आराखडा तयार होण्यास मदत होणार आहे. त्यासोबत प्रशासनानी जिल्ह्यातील १२ तालुक्यातील पदाधिकारी व अधिकारी यांची स्वतंत्र बैठक बोलावून तेथील भौगोलिक, पारंपरिक परिस्थितीचा विचारविनीमय करुन एक आराखडा तयार केल्यास आपणास विकासाच्या योजना राबविण्यास निश्चित मदत होणार आहे. आजच्या स्थितीत शासकीय योजनांची १०० टक्के अंमलबजावणी करण्यास प्रशासन व लोकप्रतिनिधीचे समन्वय असून सर्व या विकास प्रक्रियेसाठी कटिबध्द असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.भारत सरकारच्या वन धन योजनेअंतर्गत ही एक संकल्पना समजून गौन वनउपज वनात राहणाऱ्या वनवासीना अधिक लाभाचे ठरेल अशी योजना आखावी. आणि कोणत्याही योजना कागदावरच न राहता त्या प्रत्यक्षात अंमलबजावणीत याव्यात अशी सूचना सामाजिक कार्यकर्ते देवाजी तोफा यांनी केली. सर्व विभागांनी डेटा सादर करताना १०० टक्के सत्यतापूर्वक सादर केला पाहिजे. त्यामुळे आपणास पुढील योजनांची आखणी करताना चुका संभवणार नाही. दिलेल्या निर्देशांकाच्या व्यतिरिक्त गौण उपजावरील उद्योगावर भर दिल्यास ग्रामीण भागातील नागरिकांचे आर्थिक सक्षमीकरण होत असल्यामुळे वनावर आधारीत सर्व बांबीचासुध्दा यामध्ये समावेश करावा असे सामाजिक सेवा संस्थाच्या प्रतिनिधीकडून मत व्यक्त झाले आहे. याबाबीचासुध्दा आपणास विचार करावयाचा आहे. आतापर्यंत झालेल्या विचार मंथनातून निघालेल्या निष्कर्षाचा विचार केल्यास आपली जबाबदारी अधिकच वाढली आहे. तेव्हा सर्वांनी आपले कर्तव्य चोख बजावल्यास जिल्हा समृध्द करण्यास काही अडचणी येणार नाही, असे जिल्हाधिकारी म्हणाले.तत्पूर्वी शनिवारी झालेल्या संवाद सत्रातील विचार मंथनावर विचार विनिमय करण्यात आले. आणि गटनिहाय प्रश्न उत्तरांची नोंद टिपण्यात आली. या समोरोपीय कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते मोहन हिराभाई हिरालाल, देवाजी तोफा, सृष्टी या संस्थेचे केशव गुरनूले, अहेरीचे अपर जिल्हाधिकारी दामोधर नान्हे, सर्व तहसिलदार, गटविकास अधिकारी, डॉ.प्रकाश पवार, कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन जिल्हा नियोजन अधिकारी तेजबहादूर तिडके यांनी केले तर, आभार अपर जिल्हाधिकारी अशोक चौधरी यांनी केले.

टॅग्स :Devrao Holiदेवराव होळीcollectorजिल्हाधिकारी