शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मध्य रेल्वेची ठाणे ते सीएसएमटी दरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद
2
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
3
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
4
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
5
'हिंदुस्तान झिदाबाद...' तिरंग्यासाठी लंडनमध्ये पाकिस्तानींशी भिडल्या भारतीय तरुणी, पाहा VIDEO
6
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
7
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...
8
LIC ची मोठी घोषणा! बंद पडलेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सुवर्णसंधी; विलंब शुल्कातही मोठी सूट
9
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
10
रोनाल्डोचा साखरपुडा आणि सौदीचे ‘रहस्य’! स्थानिकांना वेगळा नियम आणि स्टारला वेगळा न्याय, का?
11
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?
12
चिपळुणात वाशिष्ठी नदीने ओलांडली इशारा पातळी; पूरसदृश स्थितीमुळे कामाशिवाय घराबाहेर न पडण्याची सूचना
13
"२६ जुलैचा जलप्रलय, तुम्ही मला...", वीणा जामकरने सांगितली ज्योती चांदेकरांची भावुक आठवण
14
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
15
Pune Traffic: पुण्यात सकाळपासून मुसळधार! शहरात प्रचंड वाहतूककोंडी, प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
16
"झोया अख्तर बड्या बापाची मुलगी...", 'गलीबॉय'साठी ऑडिशन द्यायला सांगितल्याने भडकल्या उषा नाडकर्णी
17
AI क्राईम प्रिडिक्शन सिस्टम: गुन्हेगारांना पकडण्यासाठी आता 'हा' देश घेणार आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत
18
किरकोळ तेजीसह शेअर बाजार उघडला, 'या' स्टॉक्सनं तेजीसह केली कामकाजाला सुरुवात
19
FD-RD सर्व विसरा! हा आहे LIC चा जबरदस्त प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल 'The End'
20
आयटी कंपनीने ८०% कर्मचाऱ्यांना एकाचवेळी कामावरुन काढलं; कारण वाचून हैराण व्हाल

बँक शाखा व्यवस्थापकाने सातबारा फाडून फेकला

By admin | Updated: May 11, 2017 01:44 IST

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखेतून पीक कर्ज घ्यावयाचे असल्याने बँक आॅफ इंडिया शाखा वैरागडच्या

वैरागड येथील प्रकार : अंगावर कर्ज नसल्याचा दाखला घेण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला अशी वागणूक लोकमत न्यूज नेटवर्क वैरागड : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखेतून पीक कर्ज घ्यावयाचे असल्याने बँक आॅफ इंडिया शाखा वैरागडच्या व्यवस्थापकाकडे कर्ज नसल्याचा दाखला घेण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा सातबारा व्यवस्थापकाने अर्जासह फाडून फेकल्याचा प्रकार वैरागड येथील बँक आॅफ इंडिया शाखेत मंगळवारी घडला. संबंधित बँक व्यवस्थापकावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी संबंधित शेतकऱ्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. आरमोरी तालुक्यातील येंगाडा येथील शेतकरी सुरेश नारायणसिंह बैस व गोपाळा सितकुरा सिडाम हे दोन शेतकरी कुरंडी माल येथील सेवा सहकारी संस्थेचे सभासद आहेत. खरीप हंगाम २०१७-१८ या वर्षाकरिता पीक कर्जाची आवश्यकता असल्याने या दोघांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा वैरागड येथे अर्ज केले. त्यानुसार येथील शाखा व्यवस्थापकाने ग्रामीण बँक आरमोरी व बँक आॅफ इंडिया वैरागड यांचेकडून कर्ज नसल्याचा दाखला अर्जासोबत जोडण्यास सांगितला. ग्रामीण बँक आरमोरी येथून कर्ज नसल्याचा दाखला या दोन्ही शेतकऱ्यांनी अर्जासोबत जोडला. त्यानंतर वैरागड येथील बँक आॅफ इंडियाच्या शाखेत कर्ज नसल्याचा दाखला मिळविण्याचा अर्जाचा छापील नमूना आणि शेतीचे प्रमाणपत्र (सातबारा) घेऊन हे दोन्ही शेतकरी ५ मे रोजी बँकेत गेले. त्यानुसार बँकेत कार्यरत लिपिकाने त्यांना कर्ज नसल्याचा दाखला भरून दिला. त्यावर शिक्का मारून शाखा व्यवस्थापकांकडून स्वाक्षरी घेण्यास सांगितले. त्यानंतर हे दोन्ही शेतकरी बँकेच्या शाखा व्यवस्थापकाकडे गेले. व्यवस्थापकाने सदर शेतकऱ्याला उद्या या, असे सांगितले. सदर प्रकार तीन दिवस चालला. कर्ज नसल्याचा दाखला घेण्यासाठी या दोन्ही शेतकऱ्यांनी सतत तीन दिवस बँकेत चकरा मारल्या. चौथ्या दिवशी ९ मे २०१७ रोजी मंगळवारला शेतकरी पुन्हा बँकेत गेले. शाखा व्यवस्थापकाकडे जाऊन कर्ज नसल्याच्या दाखल्यावर स्वाक्षरी मागीतली. मात्र शाखा व्यवस्थापकाने अर्ज फेकून दिला. सदर शेतकऱ्यांनी पुन्हा त्यांना विनंती केली. त्यानंतर शाखा व्यवस्थापकाने चक्क अर्जाचा नमूना फाडून शेतकऱ्यांच्या अंगावर फेकून दिला. एवढ्यावरच शाखा व्यवस्थापक थांबले नाही, तर माझी तक्रार वरिष्ठांकडे तसेच पोलिसात करा, अशी दमदाटीही शेतकऱ्यांना केली. त्यानंतर शेतकरी आल्यापावली रिकाम्या हाताने गावाकडे परतले. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना पीक कर्ज शक्य तेवढ्या लवकर मिळावे, असे शासनाचे धोरण आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांचे सक्तीचे आदेश आहेत. मात्र कर्ज नसल्याचा दाखला मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना बँकेत चकरा मारायला लावणे आणि त्यांच्याकडे केलेला अर्ज फाडून तो शेतकऱ्यांच्या अंगावर फेकणे हा प्रकार वैरागड येथे घडला. त्यामुळे बँक व्यवस्थापकावर कारवाई करावी, अशी लेखी तक्रार संबंधित दोन्ही शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी गडचिरोली व आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आ.कृष्णा गजबे यांच्याकडे केली आहे. वैरागड येथील बँक आॅफ इंडिया शाखेचे आॅडिट सुरू होते. तसेच बँकेअंतर्गत काही कामही सुरू होते. त्यामुळे आपण संबंधित दोन्ही शेतकऱ्यांना मंगळवारी बँक व्यवहार बंद झाल्यानंतर दुपारी ४ वाजता यायला सांगितले. यावर ‘तुम्ही कोणाच्या कामासाठी बसले आहेत’ असे म्हणत सदर शेतकरी मला बोलू लागले. दरम्यान रागाच्याभरात हा प्रकार घडला. - अरूण कुमार, शाखा व्यवस्थापक, बँक आॅफ इंडिया, वैरागड