शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
4
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
5
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
6
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
7
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
8
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
9
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
10
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
11
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
12
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
13
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
14
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
15
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
16
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
17
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
18
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
19
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
20
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला

रिक्तपदांमुळे विकासात रोडा

By admin | Updated: August 31, 2014 23:48 IST

जिल्ह्यात एकूण मंजूर असलेल्या २३ हजार ६२३ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पदापैकी २१ हजार २१० पदे भरण्यात आली असून सुमारे २ हजार ४१३ पदे रिक्त आहेत. यामध्ये वर्ग अ च्या कर्मचाऱ्यांचे

गडचिरोली : जिल्ह्यात एकूण मंजूर असलेल्या २३ हजार ६२३ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पदापैकी २१ हजार २१० पदे भरण्यात आली असून सुमारे २ हजार ४१३ पदे रिक्त आहेत. यामध्ये वर्ग अ च्या कर्मचाऱ्यांचे सुमारे १७६ पदे रिक्त आहेत. अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याने शासकीय योजनांची अंमलबजावणी करण्यात फार मोठी अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे सदर पदे तत्काळ भरण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. गडचिरोली जिल्हा नक्षलग्रस्त व आदिवासी बहुल असल्याने केंद्र व राज्य शासनाकडून कोट्यावधी रूपयाचा निधी प्राप्त होतो. जवळपास १ हजार ३०० गावांमध्ये पेसा कायदा लागू आहे. या कायद्यान्वये या भागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे रिक्त ठेवण्यावर बंदी असली तरीही याही गावांमधील अनेक पदे रिक्त आहेत. संपूर्ण जिल्ह्याचे प्रशासन ज्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्फतीने चालविले जाते त्या कार्यालयातील सुमारे ११७ पदे रिक्त आहेत. अधीक्षक भूमीअभिलेख कार्यालयातील २५८ पदांपैकी १६४ पदे भरण्यात आली असून ९४ पदे रिक्त आहेत. जिल्हा परिषदेंतर्गत ८ हजार ७१४ पदे मंजूर आहेत. त्यापैकी सुमारे ४९४ पदे रिक्त आहेत. महत्वाचे म्हणजे गट अ च्या १६१ पदांपैकी केवळ ८७ पदे भरण्यात आली असून ७४ पदे रिक्त आहेत. रिक्तपदांचे हे प्रमाण ४५.९६ टक्के एवढे आहे. गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादाची समस्या आहे. यासाठी इतर जिल्ह्यांच्या तुलनेत पोलिसांची संख्या जास्त आहे. पोलिसांचा नक्षल्यांशी सामना असल्याने येथील पोलिसाची नोकरी अत्यंत धोकादायक मानल्या जाते. मात्र सदर विभागसुद्धा रिक्त पदांपासून सुटलेला नाही. याही विभागातील सुमारे १६३ पदे रिक्त आहेत. जिल्हा समादेशक, होमगार्ड कार्यालयातील ६ पदे रिक्त आहेत. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील ५९३ पदांपैकी ४०८ पदे भरण्यात आली आहेत. तर सुमारे १८६ पदे रिक्त आहेत. सामान्य रूग्णालयाच्या अंतर्गत येत असलेल्या दवाखान्यांमध्ये सुमारे ७७७ पदे मंजूर आहेत. त्यापैकी २०९ पदे रिक्त आहेत. रिक्तपदांचे प्रमाण २६.९० टक्के एवढे आहे. जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयातील ७१ पदे रिक्त आहेत. रिक्त पदांपासून एकही कार्यालय सुटलेले नाही. जिल्ह्यात बहुतांश अधिकारी काम करण्यास तयार होत नाही. त्यामुळे बदली होताच ते निघून जातात. त्यांच्या जागेवर दुसरा अधिकारी व कर्मचारी येण्यास तयार होत नाही. त्यामुळे रिक्त पदांची संख्या वाढतच चालली आहे. बहुतांश अधिकाऱ्यांना सजा म्हणून गडचिरोली जिल्ह्यात पाठविले जाते. सदर अधिकारी काही दिवस काढायचे आहेत. याच मानसिकतेने काम करतात. त्यामुळे येथील समस्या मार्गी लागत नाही. व केंद्र शासनाकडून तसेच राज्य शासनाकडून प्राप्त झालेला निधी खर्च होत नाही. ग्रामीण भागाच्या विकासाची धुरा सांभाळणाऱ्या ग्रामसेवक, तलाठी व शिक्षक पदे यापासून सुटलेली नाही. एका ग्रामसेवकाकडे २ ते ३ ग्रामपंचायतीचा प्रभार सोपविण्यात आला आहे. तर काही शाळांमध्ये केवळ एकच शिक्षक कार्यरत आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी कोट्यवधी रूपयाचा निधी उपलब्ध करून दिला जात असला तरी प्रशासकीय यंत्रणेमध्ये अधिकारी व कर्मचारीच नसल्याने सदर निधी दरवर्षीच वापर जात आहे. (प्रतिनिधी)