शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
6
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
7
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
8
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
9
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
10
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
11
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
12
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
13
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
14
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
15
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
16
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
17
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
18
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
19
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
20
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय

दवाखान्यात भरती करण्याच्या भीतीने दुर्गम भागात लसीकरणाकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2021 12:19 IST

Nagpur News काेराेनाची लस घेतल्यानंतर ताप येतो. दवाखान्यात भरती राहावे लागते. त्यामुळे तेवढ्या दिवसाची मजुरी बुडते. याशिवाय कोरोनाची चाचणी करून किडनी काढली जाते व मारून टाकले जाते, असे अनेक गैरसमज पसरल्यामुळे गडचिरोलीच्या ग्रामीण भागात लसीकरणाचा वेग अजूनही मंदच आहे.

ठळक मुद्देगडचिरोली अवघे १६ टक्के उद्दिष्टपूर्तीदुर्गम भागात अनेक गैरसमज

 लोकमत न्यूज नेटवर्क गडचिराेली : काेराेनाची लस घेतल्यानंतर ताप येतो. दवाखान्यात भरती राहावे लागते. त्यामुळे तेवढ्या दिवसाची मजुरी बुडते. याशिवाय कोरोनाची चाचणी करून किडनी काढली जाते व मारून टाकले जाते, असे अनेक गैरसमज पसरल्यामुळे गडचिरोलीच्या ग्रामीण भागात लसीकरणाचा वेग अजूनही मंदच आहे. आतापर्यंत जिल्ह्यात केवळ १६ टक्के लसीकरण होऊ शकले. नागरिकांमधील गैरसमज दूर करताना आरोग्य कर्मचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे.

काेराेनासारख्या महामाऱ्या यापूर्वीही आल्या आहेत. त्यावेळी लस नव्हती. जंगलातील वनस्पतींचा काढा पिऊन महामारीवर मात केली आहे. आजही आम्ही काढा पित असल्याने आम्हाला काेराेना हाेऊ शकत नाही. त्यामुळे लस घेण्याची आवश्यकता नाही, असे सांगत वयाेवृद्ध नागरिक स्वत: लस घेण्यास स्पष्ट नकार देत आहेत. त्यांचे अनुकरण इतर कनिष्ठ लोक करत असल्याने त्यांना समजावता समजावता आरोग्य कर्मचाऱ्यांच्या नाकी नऊ येत आहे.

जिल्ह्याच्या कोरची, धानोरा, एटापल्ली, भामरागड या तालुक्याच्या छत्तीसगड सीमेकडील गावांमध्ये गैरसमजाचे प्रमाण जास्त आहेत. आराेग्य विभागातील कर्मचाऱ्यांसाठी वेगळी लस आहे व सामान्य नागरिकांसाठी वेगळी लस दिली जाते. लस घेतल्याने अनेक आजार हाेतात. त्यानंतर त्या व्यक्तीला गडचिराेलीच्या दवाखान्यात भरती केले जाते. यादरम्यान किडन्या काढल्या जातात. मृतदेहसुद्धा नातेवाइकांच्या हाती न देता परस्पर जाळून टाकल्या जाते, असा गैरसमज असल्याने अजूनही लोक लसीकरणासाठी पुढे येत नसल्याचे दिसते. १२ जूनपर्यंत काेरची तालुक्यात केवळ ३ हजार ९८९, भामरागड तालुक्यात ४ हजार ३६८ नागरिकांनी लस घेतली आहे. तालुक्यांचा विस्तार व लाेकसंख्या लक्षात घेता हे प्रमाण अतिशय कमी आहे.

आराेग्य कर्मचारी येताच दरवाजे हाेतात बंद

प्रत्येक नागरिकाने लस घ्यावी, यासाठी प्रशासनामार्फत दुर्गम भागातील नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे. मात्र गैरसमजावरून निर्माण झालेली लसविषयीची भीती नागरिकांच्या मनामध्ये घर करून बसली असल्याने नागरिक लसीकरणास पुढे येत नाही. गावात आराेग्य कर्मचारी आल्याचे माहीत हाेताच नागरिक दरवाजे बंद करून घरात लपून बसतात किंवा शेतावर निघून जातात.

हे आहेत विविध गैरसमज

१) वनस्पतींचा काढा पीत असल्याने लसची गरज नाही.

२) यापूर्वी अनेक महामाऱ्या बघितल्या आहेत.

३) लसीच्या नावाने काेराेना चाचणी केली जाते.

४) काेराेनाच्या नावाने गडचिराेलीच्या दवाखान्यात भरती करून किडनी काढली जाते.

५) सरकार लाेकसंख्या कमी करण्यासाठी लस देऊन मारणार आहे.

६) मेल्यानंतर मृतदेह परस्पर जाळून टाकल्या जाते.

७) शरीर कमजाेर हाेते.

८) लसने अनेक दिवस ताप येते. नंतर मृत्यू हाेतेे.

९) पुढे मुलबाळ हाेत नाही.

कोविडच्या साथीवर विजय मिळवण्याचा सर्वात प्रभावी उपाय लस आहे. हा विज्ञानाचा चमत्कार की नवा रोग आल्यावर वर्षभरात त्यावर लस उपलब्ध झाली आहे. नवा उपाय स्वीकारायला समाज सहसा बराच काळ घेतो. पण या वेळेस आपण वेळ दवडता कामा नये. जो लस घेईल तो स्वतःचे रक्षण करेल व इतरांचेही.

                         डाॅ अभय बंग, ज्येष्ठ समाजसेवक

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस