शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

दवाखान्यात भरती करण्याच्या भीतीने दुर्गम भागात लसीकरणाकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2021 12:19 IST

Nagpur News काेराेनाची लस घेतल्यानंतर ताप येतो. दवाखान्यात भरती राहावे लागते. त्यामुळे तेवढ्या दिवसाची मजुरी बुडते. याशिवाय कोरोनाची चाचणी करून किडनी काढली जाते व मारून टाकले जाते, असे अनेक गैरसमज पसरल्यामुळे गडचिरोलीच्या ग्रामीण भागात लसीकरणाचा वेग अजूनही मंदच आहे.

ठळक मुद्देगडचिरोली अवघे १६ टक्के उद्दिष्टपूर्तीदुर्गम भागात अनेक गैरसमज

 लोकमत न्यूज नेटवर्क गडचिराेली : काेराेनाची लस घेतल्यानंतर ताप येतो. दवाखान्यात भरती राहावे लागते. त्यामुळे तेवढ्या दिवसाची मजुरी बुडते. याशिवाय कोरोनाची चाचणी करून किडनी काढली जाते व मारून टाकले जाते, असे अनेक गैरसमज पसरल्यामुळे गडचिरोलीच्या ग्रामीण भागात लसीकरणाचा वेग अजूनही मंदच आहे. आतापर्यंत जिल्ह्यात केवळ १६ टक्के लसीकरण होऊ शकले. नागरिकांमधील गैरसमज दूर करताना आरोग्य कर्मचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे.

काेराेनासारख्या महामाऱ्या यापूर्वीही आल्या आहेत. त्यावेळी लस नव्हती. जंगलातील वनस्पतींचा काढा पिऊन महामारीवर मात केली आहे. आजही आम्ही काढा पित असल्याने आम्हाला काेराेना हाेऊ शकत नाही. त्यामुळे लस घेण्याची आवश्यकता नाही, असे सांगत वयाेवृद्ध नागरिक स्वत: लस घेण्यास स्पष्ट नकार देत आहेत. त्यांचे अनुकरण इतर कनिष्ठ लोक करत असल्याने त्यांना समजावता समजावता आरोग्य कर्मचाऱ्यांच्या नाकी नऊ येत आहे.

जिल्ह्याच्या कोरची, धानोरा, एटापल्ली, भामरागड या तालुक्याच्या छत्तीसगड सीमेकडील गावांमध्ये गैरसमजाचे प्रमाण जास्त आहेत. आराेग्य विभागातील कर्मचाऱ्यांसाठी वेगळी लस आहे व सामान्य नागरिकांसाठी वेगळी लस दिली जाते. लस घेतल्याने अनेक आजार हाेतात. त्यानंतर त्या व्यक्तीला गडचिराेलीच्या दवाखान्यात भरती केले जाते. यादरम्यान किडन्या काढल्या जातात. मृतदेहसुद्धा नातेवाइकांच्या हाती न देता परस्पर जाळून टाकल्या जाते, असा गैरसमज असल्याने अजूनही लोक लसीकरणासाठी पुढे येत नसल्याचे दिसते. १२ जूनपर्यंत काेरची तालुक्यात केवळ ३ हजार ९८९, भामरागड तालुक्यात ४ हजार ३६८ नागरिकांनी लस घेतली आहे. तालुक्यांचा विस्तार व लाेकसंख्या लक्षात घेता हे प्रमाण अतिशय कमी आहे.

आराेग्य कर्मचारी येताच दरवाजे हाेतात बंद

प्रत्येक नागरिकाने लस घ्यावी, यासाठी प्रशासनामार्फत दुर्गम भागातील नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे. मात्र गैरसमजावरून निर्माण झालेली लसविषयीची भीती नागरिकांच्या मनामध्ये घर करून बसली असल्याने नागरिक लसीकरणास पुढे येत नाही. गावात आराेग्य कर्मचारी आल्याचे माहीत हाेताच नागरिक दरवाजे बंद करून घरात लपून बसतात किंवा शेतावर निघून जातात.

हे आहेत विविध गैरसमज

१) वनस्पतींचा काढा पीत असल्याने लसची गरज नाही.

२) यापूर्वी अनेक महामाऱ्या बघितल्या आहेत.

३) लसीच्या नावाने काेराेना चाचणी केली जाते.

४) काेराेनाच्या नावाने गडचिराेलीच्या दवाखान्यात भरती करून किडनी काढली जाते.

५) सरकार लाेकसंख्या कमी करण्यासाठी लस देऊन मारणार आहे.

६) मेल्यानंतर मृतदेह परस्पर जाळून टाकल्या जाते.

७) शरीर कमजाेर हाेते.

८) लसने अनेक दिवस ताप येते. नंतर मृत्यू हाेतेे.

९) पुढे मुलबाळ हाेत नाही.

कोविडच्या साथीवर विजय मिळवण्याचा सर्वात प्रभावी उपाय लस आहे. हा विज्ञानाचा चमत्कार की नवा रोग आल्यावर वर्षभरात त्यावर लस उपलब्ध झाली आहे. नवा उपाय स्वीकारायला समाज सहसा बराच काळ घेतो. पण या वेळेस आपण वेळ दवडता कामा नये. जो लस घेईल तो स्वतःचे रक्षण करेल व इतरांचेही.

                         डाॅ अभय बंग, ज्येष्ठ समाजसेवक

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस