शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
3
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
4
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
5
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
6
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
7
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
8
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
11
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
12
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
13
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
14
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
19
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
20
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या

कृषी परवाना प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 05:01 IST

सुशिक्षित पात्रताधारक उमेदवारांकडून कृषीनिविष्ठांच्या विक्रीसाठी दरवर्षी प्रस्ताव मागविले जातात. तालुका कृषी कार्यालयात हे प्रस्ताव सादर केले जातात. आवश्यक दस्तावेज व पडताळणी केल्यानंतर परिपूर्ण प्रस्ताव तालुका कृषी कार्यालयामार्फत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठविले जातात. गडचिरोली तालुक्यात ही सर्व प्रक्रिया करण्यात आली

ठळक मुद्देविभागाची उदासीनता : अनेक सुशिक्षित बेरोजगारांच्या कृषी कार्यालयात येरझारा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : बि-बियाणे, खते व कीटकनाशके आदी कृषी निविष्ठांच्या विक्रीसाठी परवाना मिळण्यासाठीचे अर्ज व प्रस्ताव जिल्हास्तरावरील कृषी विभागाच्या कार्यालयात सादर करण्यात आल्या आहेत. मात्र दोन पेक्षा अधिक महिन्याचा कालावधी उलटूनही अनेक प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत.गडचिरोली तालुक्यासह जिल्हाभरात शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. धान हे जिल्ह्याचे प्रमुख पीक आहे. इतकेच नव्हे तर गडचिरोली जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा शेती व्यवसाय आहे. शेतीला एवढे मोठे महत्त्व असताना सुद्धा बºयाचशा योजनांची अंमलबजावणी करण्यात कृषी विभागाकडून दिरंगाई केली जाते. परिणामी शेतकऱ्यांना योजनांचा लाभ घेण्यासाठी वारंवार चकरा माराव्या लागतात.सुशिक्षित पात्रताधारक उमेदवारांकडून कृषीनिविष्ठांच्या विक्रीसाठी दरवर्षी प्रस्ताव मागविले जातात. तालुका कृषी कार्यालयात हे प्रस्ताव सादर केले जातात. आवश्यक दस्तावेज व पडताळणी केल्यानंतर परिपूर्ण प्रस्ताव तालुका कृषी कार्यालयामार्फत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठविले जातात. गडचिरोली तालुक्यात ही सर्व प्रक्रिया करण्यात आली. येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाला छाननी करून प्रस्ताव पाठविण्यात आले. मात्र दोन पेक्षा अधिक महिन्याचा कालावधी उलटूनही कृषी निविष्ठा विक्री परवान्याच्या अनेक प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली नाही. परिणामी प्रस्ताव सादर केलेल्या सुशिक्षित बेरोजगार तालुका कृषी अधिकारी कार्यालय व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात लॉकडाऊनच्या काळातही चकरा मारत असल्याचे दिसून येत आहे.तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत कीटकनाशक विक्रीसाठी नव्याने परवाना देण्याकरिता प्रस्ताव मागविण्यात आले. कृषी पदवीका किंवा बीएसस्सी (रसायनशास्त्र) ही शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे. याशिवाय होलसेलरकडून मिळणारे उगम प्रमाणपत्र तसेच ग्रामपंचायतीचे नाहरकत प्रमाणपत्र व चारित्र्याचा दाखला आदी दस्तावेज आवश्यक आहेत. याशिवाय अधिनियम १९५५ अन्वये शिक्षा झाली नसल्याबाबतचे प्रमाणपत्रही कृषी विभागाकडून संबंधित उमेदवाराला मागितले जाते.तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे सादर केलेल्या प्रस्तावाची पडताळणी केल्यानंतर या कार्यालयाचे जबाबदार अधिकारी व कर्मचारी ज्या गावात कृषीनिविष्ठांचे परवाना प्राप्त दुकान सुरू करावयाचे आहे, त्या ठिकाणी जाऊ गोदाम व दुकानाच्या जागेची पाहणी करतात. सर्व योग्यरित्या आढळून आल्यानंतर परिपूर्ण प्रस्ताव शिफारशीसह जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे सादर केले जातात. गडचिरोली तालुक्यातील अनेक सुशिक्षित बेरोजगारांनी ही सर्व प्रक्रिया पूर्ण केली.मात्र कृषी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत बऱ्याच प्रस्तावात त्रूटी काढून मंजुरीची कार्यवाही थंडबस्त्यात ठेवण्यात आली आहे.तालुक्याकडून ५० वर अधिक प्रस्ताव दाखलकृषी निविष्ठांच्या विक्रीसाठी परवाना मिळण्याबाबतचे ५० पेक्षा अधिक प्रस्ताव गडचिरोली येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयाला प्राप्त झाले. या सर्व प्रस्तावाची पडताळणी करून तसेच गोदाम व दुकानाच्या जागेची पाहणी करून शिफारशीसह हे प्रस्ताव जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आले आहे, अशी माहिती तालुका कार्यालयातील अधिकाऱ्यांनी दिली. कृषीनिविष्ठा परवान्याचे नूतनीकरण तालुका कार्यालयामार्फत केले जाते. मात्र नवीन प्रस्ताव जिल्हा कार्यालयामार्फत मंजूर केले जाते. जीएसटी, पॅनकार्ड, आधारकार्ड व इतर दस्तावेजांची पडताळणी करून अनेकांच्या परवान्यांचे नूतनीकरण केले, अशीही माहिती येथील अधिकाऱ्यांनी दिली.वरिष्ठ अधिकाºयांच्या नियंत्रणाची आवश्यकताजिल्हास्तरावरील कृषी विभागाच्या कार्यालयामार्फत शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविल्या जातात. मात्र प्रशासकीय उदासीनता व दिरंगाईमुळे अनेकांना योजनेचा लाभ मिळत नाही. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे या कार्यालयातील अधिकाऱ्यांवर नियंत्रण असणे आवश्यक आहे. कृषीनिविष्ठा प्रस्तावाबाबत गुणनियंत्रक अधिकाऱ्यांची भूमिका महत्त्वाची असते. मात्र दिरंगाई होत असल्याचा आरोप संबंधित उमेदवारांनी केला आहे.

 

टॅग्स :Socialसामाजिक