शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

गुरांना वाचविण्याच्या प्रयत्नात तो स्वत:च झाला बिबट्याची शिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2021 11:37 IST

जंगलात नेहमीप्रमाणे गुरे चारण्यासाठी गेलेल्या गुराख्याला बिबट्याने हल्ला करून ठार केले. ही घटना गुरुवारी दुपारी २:३० च्या सुमारास सिरोंचा तालुक्यातील तुमनूरजवळच्या जंगलात घडली.

ठळक मुद्देअनेक वर्षानंतर सिरोंचा तालुक्यात बिबट्याचा हल्ला

गडचिरोली : गावाजवळच्या जंगलात नेहमीप्रमाणे गुरे चारण्यासाठी गेलेल्या गुराख्याला बिबट्याने हल्ला करून ठार केले. ही घटना गुरुवारी दुपारी २:३० च्या सुमारास सिरोंचा तालुक्यातील तुमनूरजवळच्या जंगलात घडली. विशेष म्हणजे सिरोंचा तालुक्यात गेल्या अनेक वर्षात वाघ किंवा बिबट्याचे अस्तित्व आणि हल्ल्याची घटना घडली नव्हती.

मलय्या बालय्या दुर्गम (वय ५०, रा. पेंटीपाक) असे मृत गुराख्याचे नाव आहे. मलय्या याच्यासह मृतेश पोचमा रामनेनी (वय ४८) हा देखील गुरे घेऊन गेला होता. दोघे एकामेकांपासून काही अंतरावर होते. याचवेळी झुडपातून आलेला एक बिबट्या कळपातील वासरावर झडप घेत असताना मलय्याला दिसला. तो वासराला वाचविण्यासाठी काठी घेऊन पुढे सरसावला, तितक्यात बिबट्याने वासराऐवजी मलय्यावर झडप घेतली व त्याला १०० मीटर अंतरावर फरफटत नेले. यामुळे जखमी झालेल्या मलय्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर बिबट्याने पुन्हा वासरावर हल्ला केला पण इतर गुरांमुळे बिबट्या वासराला मारू शकला नाही. 

सिरोंचा तालुक्यात जवळपास ५० वर्षांपूर्वी पेंटीपाका याच गावातील सुदुला मोंडी पोचम या व्यक्तीचा पट्टेदार वाघाशी मुकाबला झाला होता. त्यावेळी ३० वर्षीय सुदुलाने वाघाला हरवून पळवून लावले होते. तेव्हापासून सुदुलाला सर्वत्र 'शेरखान' या टोपणनावाने ओळखले जाते. आज या घटनेमुळे ८० वर्षाच्या शेरखानसह अनेकांनी त्या आठवणींना उजाळा दिला.

टॅग्स :Accidentअपघातleopardबिबट्याDeathमृत्यू