शहरं
Join us  
Trending Stories
1
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
2
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
3
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
4
Sharmila Thackeray : "बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
5
"उबाठानं काँग्रेससमोर लोटांगण घातलंय, ते लीन झालेत आणि आता विलीनीकरणही होईल"
6
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
7
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
8
'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन
9
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
10
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
11
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
12
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
13
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
14
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
15
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
16
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?
17
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
18
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
19
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
20
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले

पट्टेदार वाघाच्या दहशतीने पुन्हा हादरला आरमोरी तालुका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 12:41 AM

तालुक्यात यावर्षी पुन्हा पट्टेदार वाघाने आपले अस्तित्व दाखवत दहशत निर्माण केली आहे. मंगळवारी आरमोरीजवळील रामपूर चक जवळील जंगलात पट्टेदार वाघाने गायीच्या कळपावर हल्ला करून एका गायीला ठार केले. शिकारीनंतर गायीवर ताव मारण्यासाठी दुसरीकडे घेऊन जातानाचे क्षण वनविभागाने लावलेल्या कॅमेरात ट्रॅप झाले आहेत.

ठळक मुद्देगुरांच्या कळपावरील हल्ल्यात गाय ठार : वन विभागाने लावलेल्या कॅमेरात ट्रॅप झाली वाघाने केलेली शिकार, बंदोबस्त करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : तालुक्यात यावर्षी पुन्हा पट्टेदार वाघाने आपले अस्तित्व दाखवत दहशत निर्माण केली आहे. मंगळवारी आरमोरीजवळील रामपूर चक जवळील जंगलात पट्टेदार वाघाने गायीच्या कळपावर हल्ला करून एका गायीला ठार केले. शिकारीनंतर गायीवर ताव मारण्यासाठी दुसरीकडे घेऊन जातानाचे क्षण वनविभागाने लावलेल्या कॅमेरात ट्रॅप झाले आहेत. सदर छायाचित्र बघून वाघाच्या दहशतीचा अंदाज येतो.दीड वर्षांपूर्वी आरमोरीपासून जवळच असलेल्या रवी व कोंढाळा या दोन गावातील प्रत्येकी एका व्यक्तीला ठार केले होते. त्यानंतर वाघाच्या जोडीने उन्हाळ्यात याच ठिकाणी जवळपास महिनाभर बस्तान मांडून जवळपासच्या प्राण्यांवर हल्ला केला होता. पावसाळ्यात या परिसरातून वाघ निघून गेल्याने दहशत कमी झाली होती. त्यानंतर पुन्हा आता मागील चार महिन्यांपासून वाघाने दहशत निर्माण केली आहे. १५ दिवसांपूर्वी चुरमुरा येथील एका शेतकऱ्यावर हल्ला करून त्याला जखमी केले होते. तसेच वडधा, देलोडा परिसरातही वाघाने जनावरांना ठार केले आहे. त्यामुळे नागरिक कमालीचे दहशतीत आहेत.मंगळवारी २७ नोव्हेंबर रोजी रामपूर चक येथील जनावरांचा कळप जंगलात चरण्यासाठी गेला असता, वाघाने दुपारी १२ वाजताच्या सुमारास कळपावर हल्ला केला. यात एक गाय ठार झाली. सदर गाय धनराज ठाकरे यांच्या मालकीची होती. गुराख्याने आरडाओरड केल्यानंतर गायीला ठार करून वाघ पळून गेला. याबाबतची माहिती लगेच वन विभागाला देण्यात आली. आरमोरीचे वन परिक्षेत्राधिकारी सुनील सोनटक्के यांच्या मार्गदशनात क्षेत्र सहायक रमेश गोटेफोडे, वनरक्षक सुखदेव दोनाडकर यांनी घटनास्थळी जाऊन तत्काळ जाऊन पंचनामा केला.दरम्यान गायीला ज्या ठिकाणी वाघाने मारले होते त्या ठिकाणी पुन्हा वाघ येईल म्हणून वन विभागाने घटनास्थळी ट्रॅपिंग कॅमेरा लावला. सायंकाळी ५ वाजता सदर वाघ पुन्हा गायीला खाण्यासाठी शिकारीच्या ठिकाणी आल्यामुळे तो कॅमेरात ट्रॅप झाला आहे. या वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी, गुराख्यांनी वनविभागाकडे केली आहे.

टॅग्स :Tigerवाघ