शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
2
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
3
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
4
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
5
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
6
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
7
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
8
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
9
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
10
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
11
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
12
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
13
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
14
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
15
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
16
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
17
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
18
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
19
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
20
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात आलापल्ली सर्वात मोठी तर वेंगनूर सर्वात लहान ग्रामपंचायत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 05:00 IST

आरमोरी तालुक्यात वैरागड, वडधा या मोठ्या ग्रामपंचायती आहेत, तर सायगाव ही सर्वात लहान ग्रामपंचायत आहे. या भागात काँग्रेस आणि भाजपच्या काऱ्यकर्त्यांमध्ये थेट लढत होण्याची शक्यता आहे. देसाईगंज तालुक्यात कुरूड ही सर्वात मोठी तर कसारी तुकूम ही सर्वात लहान ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायतींवर भाजप-काँग्रेसची सत्ता आहे. यावेळीही परंपरागत लढत होणार की अविरोध निवडणूक होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ठळक मुद्देकुठे पक्षीय लढत तर कुठे स्थानिक गटाचे वर्चस्व

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : येत्या १५ आणि २० जानेवारीला अशा दोन टप्प्यात होत असलेल्या ३६१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला आहे. यात ८६४२ मतदार असलेली अहेरी तालुक्यातील आलापल्ली ही जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत ठरली आहे. मुलचेरा तालुक्यातील वेंगनूर ही अवघे २४२ मतदार असलेली ग्रामपंचायत जिल्ह्यात सर्वात छोटी ग्रामपंचायत आहे. या दोन्ही ग्रामपंचायतीत दुसऱ्या टप्प्यात, अर्थात २० जानेवारीला निवडणूक होणार आहे.सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून आलापल्ली ग्रामपंचायतवर आपले वर्चस्व राहावे यासाठी सर्वच पक्ष आपापल्या परीने प्रयत्न करत असतात. गेल्यावेळी या ग्रामपंचायतवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि आदिवासी विद्यार्थी संघाचे वर्चस्व होते. यावेळीही त्याच पद्धतीने लढत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा या ग्रामपंचायतवर वर्चस्व मिळवण्यासाठी दोन्ही पक्षांच्या गटांनी कंबर कसल्याचे दिसून येते.आरमोरी तालुक्यात वैरागड, वडधा या मोठ्या ग्रामपंचायती आहेत, तर सायगाव ही सर्वात लहान ग्रामपंचायत आहे. या भागात काँग्रेस आणि भाजपच्या काऱ्यकर्त्यांमध्ये थेट लढत होण्याची शक्यता आहे. देसाईगंज तालुक्यात कुरूड ही सर्वात मोठी तर कसारी तुकूम ही सर्वात लहान ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायतींवर भाजप-काँग्रेसची सत्ता आहे. यावेळीही परंपरागत लढत होणार की अविरोध निवडणूक होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.धानोरा तालुक्यात मुरूमगाव ही सर्वात मोठी तर रेखाटोला ही सर्वात लहान ग्रामपंचायत आहे. या भागात काँग्रेस आणि भाजपच्या काऱ्यकर्त्यांमध्येच रस्सीखेच आहे. कोरची तालुक्यात बिहीटेकला या सर्वात मोठ्या ग्रामपंचायतवर काँग्रेसचे वर्चस्व होते. सर्वात लहान असलेल्या आस्वालहुडकी ग्रामपंचायतवरही काँग्रेसच्या काऱ्यकर्त्यांचेच प्राबल्य आहे. यावेळी ते कायम राहते का याकडे नागरिकांचे लक्ष राहणार आहे.चामोर्शी तालुक्यात कुनघाडा रै ही सर्वात मोठी तर मुधोली रीठ ही सर्वात लहान ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायतींवर काँग्रेसचा प्रभाव होता. यावेळी भाजप मुसंडी मारणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत