शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: मोठी बातमी! जम्मू, अमृतसरसह देशातील ९ एअरपोर्ट १० मे पर्यंत बंद; अनेक उड्डाणं रद्द
2
Operation Sindoor: 'आता त्यांना कुंकवाचा पराक्रम कळला असेल', अविमुक्तेश्वरानंत सरस्वतींचे विधान
3
Operation Sindoor Live Updates: PM मोदींनी घेतली राष्ट्रपतींची भेट; 'ऑपरेशन सिंदूर'ची दिली माहिती
4
Operation Sindoor : "जे काही घडलं ते बरोबर, पहलगाममध्ये धर्म विचारणाऱ्या ४ दहशतवाद्यांचाही केला पाहिजे खात्मा"
5
विजापूरमध्ये भीषण चकमक; कर्रेगुट्टा टेकड्यांमध्ये लपलेल्या 15+ नक्षलवाद्यांचा खात्मा
6
Operation Sindoor: कित्येक निष्पापांचा जीव घेतला! आता स्वतःच्या कुटुंबाचा खात्मा झाल्यावर दहशतवादी मसूद अजहर म्हणतो...
7
Operation Sindoor : कठीणातल्या कठीण प्रदेशात हेलिकॉप्टर उडविण्याचा हातखंडा; हवाई दलाच्या व्योमिका सिंह, ज्यांनी ऑपरेशन सिंदूरची दिली माहिती
8
Operation Sindoor नंतर शेअर बाजाराबाबत मोठी अपडेट, BSE-NSE नं घेतला महत्त्वाचा निर्णय
9
“विना अपघात सेवा बजावणाऱ्या ST चालकांचा रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार”: प्रताप सरनाईक
10
पाकविरोधात आणखी मोठी कारवाई? गृहमंत्र्यांच्या J&Kच्या मुख्यमंत्री-नायब राज्यपालांना सूचना...
11
Kangana Ranaut : "मोदींनी त्यांना दाखवून दिलं"; 'ऑपरेशन सिंदूर' नंतर कंगना राणौतची सैन्याच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना
12
Operation Sindoor: भारताचा जैश-ए-मोहम्मदच्या मसूद अजहरवर घाव! 'मरकज सुभानल्लाह' उडवले, व्हिडीओ बघा
13
खबरदार! आणखी काही कराल तर...; पत्रकार परिषद संपवताना विंग कमांडर व्योमिका सिंह यांचा पाकिस्तानला थेट इशारा 
14
"ही ताकद नव्हे तर भ्याडपणा!"; भारताच्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानी अभिनेत्रीचा तीळपापड, म्हणाली-
15
चीननं भारतावर लावला १६६ टक्क्यांपर्यंत टॅरिफ; पाक तणावादरम्यान ड्रॅगनची घोषणा, 'या' क्षेत्रांवर परिणाम?
16
"रात्री चार ड्रोन आले अन्..."; पाकिस्ताने तरुणाने सांगितला कसा उडवला गेला हाफिज सईदचा अड्डा
17
“निष्पाप भारतीयांवर भ्याड हल्ला केलेल्या पाकिस्तानला चोख उत्तर”: विजय वडेट्टीवार
18
Eknath Shinde : "लाडक्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं काम करणाऱ्यांना धडा शिकवला"; शिंदेंनी केलं मोदींचं अभिनंदन
19
युद्धापूर्वीच पाकिस्तानचे आत्मसमर्पण, संरक्षण मंत्री म्हणाले- 'आम्ही कारवाई करणार नाही'
20
Operation Sindoor: अखेर न्याय झालाच! भारताने पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला; कोणी दिलं 'ऑपरेशन सिंदूर' हे नाव?

सव्वाशेवर विवाहांचा हुकला अक्षय तृतीयेचा मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:37 IST

गडचिराेली : विवाह म्हटला की दाेन घराण्यांचे संबंध जुळतात. वर-वधूचा गृहप्रवेश हाेताे. लग्न साेहळ्यादरम्यान सगळ्यांमध्ये उत्साह असताे. मात्र, यंदा ...

गडचिराेली : विवाह म्हटला की दाेन घराण्यांचे संबंध जुळतात. वर-वधूचा गृहप्रवेश हाेताे. लग्न साेहळ्यादरम्यान सगळ्यांमध्ये उत्साह असताे. मात्र, यंदा काेराेना संसर्गामुळे विवाह साेहळे प्रभावित झाले आहेत. विशेष म्हणजे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर नियाेजित केलेले जिल्हाभरातील जवळपास सव्वाशेपेक्षा जास्त विवाह पुढे ढकलण्यात आले आहेत. हे विवाह कार्य दिवाळीदरम्यान ऑक्टाेबर महिन्यात हाेण्याची शक्यता आहे.

साडेतीन मुहूर्तापैकी अक्षय तृतीया हा एक महत्त्वाचा मुहूर्त आहे. या दिवशी चांगल्या कामाची सुरुवात केली जाते. लग्न समारंभ, वास्तुपूजन, धार्मिक पूजा, नामकरण विधी, नवीन दुकानाचे उद्घाटन आदींसह विविध महत्त्वाच्या कामांची सुरुवात या दिवशी केली जाते. गडचिराेली जिल्ह्यासह पूर्व विदर्भात तसेच महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर अधिकाधिक विवाह साेहळे पार पाडले जातात. दरवर्षी अक्षय तृतीयेच्या दिवशी गावात व शहरी भागात काही ठिकाणी सामूहिक विवाह साेहळेही आयाेजित केले जातात. मात्र, यंदा काेराेना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लग्न साेहळ्याला प्रशासनाने वेगळी नियमावली लावली आहे. केवळ २५ लाेकांच्या उपस्थितीत व काेविडचे नियम पाळून दाेन तासाच्या आत लग्नकार्य आटाेपावे लागत आहे. जिल्ह्यात काेविड नियमांचे पालन करून काही गावांत लग्नकार्य आटाेपले.

विविध समाज संघटनेतर्फे वधू-वरांच्या सामूहिक विवाह साेहळ्यांचे आयाेजन दरवर्षी केले जाते. यामागे वर-वधू मंडळींकडील आर्थिक बचतीचा विचार असताे. यावर्षी काेराेनामुळे सर्वच समाजाच्या सामूहिक विवाह साेहळ्यांना पूर्णत: ब्रेक लागला आहे.

बाॅक्स....

तहसीलदारांकडून मिळते परवानगी

- काेविडचे नियम पाळून माेजक्या लाेकांच्या उपस्थितीत लग्नकार्य पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून रीतसर परवानगी मागावी लागत आहे.

- वधू-वर कुटुंबीयांना तहसील कार्यालयात आवश्यक ते दस्तावेज सादर करून लग्नकार्यासाठी अर्ज करून परवानगी घ्यावी लागत आहे. यात काेणत्या गावातील किती नातेवाईक उपस्थित राहतील, याची माहिती द्यावी लागत आहे.

- प्राप्त अर्जावर कार्यवाही करून गडचिराेली तालुक्यात अशा विवाह साेहळ्यांना परवानगी दिली जात असल्याची माहिती तहसीलदार महेंद्र गणवीर यांनी दिली.

बाॅक्स....

काेविड समितीचे नियंत्रण

काेराेना लाॅकडाऊनच्या काळात गावात हाेणारे छाेटे-माेठे कार्यक्रम तसेच विवाह समारंभावर गावस्तरीय काेविड समितीतील सदस्यांचे नियंत्रण आहे. काेविड समितीमध्ये सरपंच, पाेलीस पाटील, तलाठी, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष व ग्रामसेवक आदींचा समावेश आहे. २५ लाेकांच्या उपस्थितीत ठरावीक वेळेत काेविडच्या नियमानुसार लग्नकार्य पार पडले की नाही, हे पाहण्याची जबाबदारी या समितीवर आहे.

बाॅक्स...

काही कुटुंबांना लाॅकडाऊन संपण्याची प्रतीक्षा

मे महिन्याच्या अखेरपर्यंत काेराेनाचा संसर्ग कमी होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे. ही शक्यता लक्षात घेऊन वधू-वर तसेच त्यांच्या कुटुंबीयांनी पुढे ढकलेले विवाह कार्य लाॅकडाऊन संपल्यावर जून ते जुलै महिन्यात आयाेजित करण्याची तयारी दर्शविली आहे. लग्नकार्य जुळून असलेल्या संबंधित कुटुंबांना लाॅकडाऊन संपण्याची प्रतीक्षा आहे.

बाॅक्स...

अनेकजण अडकले विवाह बंधनात

वर्षभरापासून काेराेना संसर्गाची समस्या निर्माण झाली आहे. काेराेनाचा संसर्ग आताच आटाेक्यात येणार नाही, हे लक्षात घेऊन जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांत अनेक गावांत काेविडचे नियम पाळून लग्नकार्य पार पडले आहेत. लग्न जुळल्यावर किती दिवस प्रतीक्षा करायची, असे म्हणत अनेक उपवर-वधू विवाह बंधनात अडकले आहेत. माेजक्या लाेकांच्या उपस्थितीत १०० वर विवाह साेहळे पार पडले आहेत. यातील बहुतांश लोकांनी मंगल कार्यालयाऐवजी घरीच हे सोहळे आटोपले आहेत.

काेट...

काेराेना संसर्गामुळे विवाह कार्यावर मर्यादा आल्याने मंगल कार्यालय व्यवसायावर परिणाम झाला आहे. २५ लाेकांसाठी मंगल कार्यालय बुक करणे वर-वधूच्या कुटुंबीयांना परवडत नाही. घरासमाेरील माेकळ्या जागेत तसेच उपलब्ध साेयीनुसार घरच्या घरी विवाह कार्य पार पाडले जात आहेत. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आमच्या मंगल कार्यालयात हाेणारे चार ते पाच विवाह साेहळेही पुढे ढकलण्यात आले आहे. काेराेना संसर्गाच्या समस्येने व्यवसाय बुडाला आहे.

- सुनील पाेरेड्डीवार, संचालक, मंगल कार्यालय, गडचिराेली.