शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
5
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
6
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
7
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
8
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
9
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
10
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
11
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
12
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
13
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
15
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
16
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
17
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
18
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
19
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
20
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!

सव्वाशेवर विवाहांचा हुकला अक्षय तृतीयेचा मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:37 IST

गडचिराेली : विवाह म्हटला की दाेन घराण्यांचे संबंध जुळतात. वर-वधूचा गृहप्रवेश हाेताे. लग्न साेहळ्यादरम्यान सगळ्यांमध्ये उत्साह असताे. मात्र, यंदा ...

गडचिराेली : विवाह म्हटला की दाेन घराण्यांचे संबंध जुळतात. वर-वधूचा गृहप्रवेश हाेताे. लग्न साेहळ्यादरम्यान सगळ्यांमध्ये उत्साह असताे. मात्र, यंदा काेराेना संसर्गामुळे विवाह साेहळे प्रभावित झाले आहेत. विशेष म्हणजे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर नियाेजित केलेले जिल्हाभरातील जवळपास सव्वाशेपेक्षा जास्त विवाह पुढे ढकलण्यात आले आहेत. हे विवाह कार्य दिवाळीदरम्यान ऑक्टाेबर महिन्यात हाेण्याची शक्यता आहे.

साडेतीन मुहूर्तापैकी अक्षय तृतीया हा एक महत्त्वाचा मुहूर्त आहे. या दिवशी चांगल्या कामाची सुरुवात केली जाते. लग्न समारंभ, वास्तुपूजन, धार्मिक पूजा, नामकरण विधी, नवीन दुकानाचे उद्घाटन आदींसह विविध महत्त्वाच्या कामांची सुरुवात या दिवशी केली जाते. गडचिराेली जिल्ह्यासह पूर्व विदर्भात तसेच महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर अधिकाधिक विवाह साेहळे पार पाडले जातात. दरवर्षी अक्षय तृतीयेच्या दिवशी गावात व शहरी भागात काही ठिकाणी सामूहिक विवाह साेहळेही आयाेजित केले जातात. मात्र, यंदा काेराेना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लग्न साेहळ्याला प्रशासनाने वेगळी नियमावली लावली आहे. केवळ २५ लाेकांच्या उपस्थितीत व काेविडचे नियम पाळून दाेन तासाच्या आत लग्नकार्य आटाेपावे लागत आहे. जिल्ह्यात काेविड नियमांचे पालन करून काही गावांत लग्नकार्य आटाेपले.

विविध समाज संघटनेतर्फे वधू-वरांच्या सामूहिक विवाह साेहळ्यांचे आयाेजन दरवर्षी केले जाते. यामागे वर-वधू मंडळींकडील आर्थिक बचतीचा विचार असताे. यावर्षी काेराेनामुळे सर्वच समाजाच्या सामूहिक विवाह साेहळ्यांना पूर्णत: ब्रेक लागला आहे.

बाॅक्स....

तहसीलदारांकडून मिळते परवानगी

- काेविडचे नियम पाळून माेजक्या लाेकांच्या उपस्थितीत लग्नकार्य पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून रीतसर परवानगी मागावी लागत आहे.

- वधू-वर कुटुंबीयांना तहसील कार्यालयात आवश्यक ते दस्तावेज सादर करून लग्नकार्यासाठी अर्ज करून परवानगी घ्यावी लागत आहे. यात काेणत्या गावातील किती नातेवाईक उपस्थित राहतील, याची माहिती द्यावी लागत आहे.

- प्राप्त अर्जावर कार्यवाही करून गडचिराेली तालुक्यात अशा विवाह साेहळ्यांना परवानगी दिली जात असल्याची माहिती तहसीलदार महेंद्र गणवीर यांनी दिली.

बाॅक्स....

काेविड समितीचे नियंत्रण

काेराेना लाॅकडाऊनच्या काळात गावात हाेणारे छाेटे-माेठे कार्यक्रम तसेच विवाह समारंभावर गावस्तरीय काेविड समितीतील सदस्यांचे नियंत्रण आहे. काेविड समितीमध्ये सरपंच, पाेलीस पाटील, तलाठी, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष व ग्रामसेवक आदींचा समावेश आहे. २५ लाेकांच्या उपस्थितीत ठरावीक वेळेत काेविडच्या नियमानुसार लग्नकार्य पार पडले की नाही, हे पाहण्याची जबाबदारी या समितीवर आहे.

बाॅक्स...

काही कुटुंबांना लाॅकडाऊन संपण्याची प्रतीक्षा

मे महिन्याच्या अखेरपर्यंत काेराेनाचा संसर्ग कमी होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे. ही शक्यता लक्षात घेऊन वधू-वर तसेच त्यांच्या कुटुंबीयांनी पुढे ढकलेले विवाह कार्य लाॅकडाऊन संपल्यावर जून ते जुलै महिन्यात आयाेजित करण्याची तयारी दर्शविली आहे. लग्नकार्य जुळून असलेल्या संबंधित कुटुंबांना लाॅकडाऊन संपण्याची प्रतीक्षा आहे.

बाॅक्स...

अनेकजण अडकले विवाह बंधनात

वर्षभरापासून काेराेना संसर्गाची समस्या निर्माण झाली आहे. काेराेनाचा संसर्ग आताच आटाेक्यात येणार नाही, हे लक्षात घेऊन जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांत अनेक गावांत काेविडचे नियम पाळून लग्नकार्य पार पडले आहेत. लग्न जुळल्यावर किती दिवस प्रतीक्षा करायची, असे म्हणत अनेक उपवर-वधू विवाह बंधनात अडकले आहेत. माेजक्या लाेकांच्या उपस्थितीत १०० वर विवाह साेहळे पार पडले आहेत. यातील बहुतांश लोकांनी मंगल कार्यालयाऐवजी घरीच हे सोहळे आटोपले आहेत.

काेट...

काेराेना संसर्गामुळे विवाह कार्यावर मर्यादा आल्याने मंगल कार्यालय व्यवसायावर परिणाम झाला आहे. २५ लाेकांसाठी मंगल कार्यालय बुक करणे वर-वधूच्या कुटुंबीयांना परवडत नाही. घरासमाेरील माेकळ्या जागेत तसेच उपलब्ध साेयीनुसार घरच्या घरी विवाह कार्य पार पाडले जात आहेत. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आमच्या मंगल कार्यालयात हाेणारे चार ते पाच विवाह साेहळेही पुढे ढकलण्यात आले आहे. काेराेना संसर्गाच्या समस्येने व्यवसाय बुडाला आहे.

- सुनील पाेरेड्डीवार, संचालक, मंगल कार्यालय, गडचिराेली.