शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

"गडचिरोलीतील जवानांची सुरक्षा, चांगले आरोग्य, राहणीमानासाठी प्राधान्याने कार्य करू"

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2022 13:45 IST

गडचिरोलीत आज पोलीस विभागातर्फे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची उपस्थिती होती.

गडचिरोलीराज्य सरकारच्या योजना दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम पोलीस करत आहेत. त्यांची सुरक्षा, चांगले आरोग्य, चांगले राहणीमानासाठी आम्ही प्राधान्याने कार्य करू. अर्थमंत्री या नात्याने आवश्यक सुविधांची निर्मिती करण्यासाठी तातडीने प्रयत्न करणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. यासोबतच, नक्षल्यांच्या हल्ल्यात बळी पडणारे पोलीस खबऱ्यांचे कुटुंब उघड्यावर पडू नये म्हणून कुटुंबातील एकाला नोकरी देणार, असल्याचे पवार म्हणाले.

गडचिरोलीत आज पोलीस विभागातर्फे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. उपमुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यातील सी-६० जवानांचे कौतुक केले व केलेल्या कामगिरीसाठी त्यांचा सन्मान केला. कार्यक्रमानंतर आयोजित पत्रपरिषदेत अजित पवार बोलत होते. 

गडचिरोली जिल्ह्यातील प्रतिकुल परिस्थितीत पोलीस जवान काम करताहेत. राज्य सरकारच्या योजना दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत पोहचविण्याचे काम पोलीस करत आहेत. पूर्वी गडचिरोलीत बदली होणे ही शिक्षा वाटत होती, पण आता परिस्थिती बदलली असून अनेक अधिकारी स्वत: बदली येथे मागतात. त्यांच्या आरोग्य, शिक्षणातील अडचणी जाणून घेण्यासाठी आलो, असल्याची भावना पवार यांनी व्यक्त केली. यासह अर्थमंत्री या नात्याने आवश्यक सुविधांची निर्मिती करण्यासाठी तातडीने प्रयत्न करणार असल्याचे पवार म्हणाले.

गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाकरता विविध योजनांची आखणी सुरू आहे. मोहफुलावरील प्रक्रिया उद्योगासाठी स्थानिक लोकांना प्रोत्साहन देणार, सरकारी भागभांडवलही देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यासह जिल्ह्यात रेल्वेलाईन आणि विमान धावपट्टीचा प्रस्ताव पाठविण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचेही त्यांनी सांगितले. 

रोजीरोजीचा प्रश्न महत्वाचा की भोंग्यांचा?

यावेळी राज्यात भोंग्यावरून सुरू असलेला वाद व राज्यातील तापलेलं वातावरण या प्रश्नावर उत्तर देताना पवार म्हणाले, ''रोजीरोजीचा प्रश्न महत्वाचा की भोंग्यांचा? याचा विचार करावा. मनसे-भाजपची यांची युती आहे की नाही,  माहित नाही. पण अशा युती-आघाडी होत असतात, त्या टिकतातच असे नाही'

टॅग्स :PoliticsराजकारणAjit Pawarअजित पवारPoliceपोलिसGadchiroliगडचिरोलीDilip Walse Patilदिलीप वळसे पाटील