शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

"गडचिरोलीतील जवानांची सुरक्षा, चांगले आरोग्य, राहणीमानासाठी प्राधान्याने कार्य करू"

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2022 13:45 IST

गडचिरोलीत आज पोलीस विभागातर्फे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची उपस्थिती होती.

गडचिरोलीराज्य सरकारच्या योजना दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम पोलीस करत आहेत. त्यांची सुरक्षा, चांगले आरोग्य, चांगले राहणीमानासाठी आम्ही प्राधान्याने कार्य करू. अर्थमंत्री या नात्याने आवश्यक सुविधांची निर्मिती करण्यासाठी तातडीने प्रयत्न करणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. यासोबतच, नक्षल्यांच्या हल्ल्यात बळी पडणारे पोलीस खबऱ्यांचे कुटुंब उघड्यावर पडू नये म्हणून कुटुंबातील एकाला नोकरी देणार, असल्याचे पवार म्हणाले.

गडचिरोलीत आज पोलीस विभागातर्फे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. उपमुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यातील सी-६० जवानांचे कौतुक केले व केलेल्या कामगिरीसाठी त्यांचा सन्मान केला. कार्यक्रमानंतर आयोजित पत्रपरिषदेत अजित पवार बोलत होते. 

गडचिरोली जिल्ह्यातील प्रतिकुल परिस्थितीत पोलीस जवान काम करताहेत. राज्य सरकारच्या योजना दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत पोहचविण्याचे काम पोलीस करत आहेत. पूर्वी गडचिरोलीत बदली होणे ही शिक्षा वाटत होती, पण आता परिस्थिती बदलली असून अनेक अधिकारी स्वत: बदली येथे मागतात. त्यांच्या आरोग्य, शिक्षणातील अडचणी जाणून घेण्यासाठी आलो, असल्याची भावना पवार यांनी व्यक्त केली. यासह अर्थमंत्री या नात्याने आवश्यक सुविधांची निर्मिती करण्यासाठी तातडीने प्रयत्न करणार असल्याचे पवार म्हणाले.

गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाकरता विविध योजनांची आखणी सुरू आहे. मोहफुलावरील प्रक्रिया उद्योगासाठी स्थानिक लोकांना प्रोत्साहन देणार, सरकारी भागभांडवलही देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यासह जिल्ह्यात रेल्वेलाईन आणि विमान धावपट्टीचा प्रस्ताव पाठविण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचेही त्यांनी सांगितले. 

रोजीरोजीचा प्रश्न महत्वाचा की भोंग्यांचा?

यावेळी राज्यात भोंग्यावरून सुरू असलेला वाद व राज्यातील तापलेलं वातावरण या प्रश्नावर उत्तर देताना पवार म्हणाले, ''रोजीरोजीचा प्रश्न महत्वाचा की भोंग्यांचा? याचा विचार करावा. मनसे-भाजपची यांची युती आहे की नाही,  माहित नाही. पण अशा युती-आघाडी होत असतात, त्या टिकतातच असे नाही'

टॅग्स :PoliticsराजकारणAjit Pawarअजित पवारPoliceपोलिसGadchiroliगडचिरोलीDilip Walse Patilदिलीप वळसे पाटील