शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
प्रकाश महाजन शिंदेसेनेत प्रवेश करणार, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
3
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
4
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, भरबाजारात मारहाण करून घेतला जीव
5
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
6
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
7
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
8
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
9
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
10
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
11
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
12
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
13
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
14
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

पावसानंतरही दुष्काळ कायम

By admin | Updated: September 11, 2014 23:32 IST

मागील आठ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतकरी वर्ग काही प्रमाणात सुखावला असला तरी, महिनाभर पाऊस न पडल्याने धानपिकाचे झालेले नुकसान भरून निघणे शक्य नसल्याने

गडचिरोली : मागील आठ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतकरी वर्ग काही प्रमाणात सुखावला असला तरी, महिनाभर पाऊस न पडल्याने धानपिकाचे झालेले नुकसान भरून निघणे शक्य नसल्याने पावसानंतरही जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती कायम आहे, असे भारतीय किसान संघाने म्हटले आहे.गडचिरोली जिल्ह्यात हलका मध्यम व जड या तीन प्रतिच्या धानाची लागवड करण्यात येते. हलका धान ११० ते १२० दिवसांत निघतो, मध्यम कालावधीचा धान १३० ते १४० दिवसांत निघतो तर जड धान १४५ ते १६० दिवसांत कापणीसाठी तयार होतो. जिल्ह्यात हलक्या व मध्यम प्रतिच्या धानाच्या सर्वाधिक लागवड करण्यात येते. सदर धान लवकर निघत असल्याने याची रोवणीसुद्धा लवकर होणे आवश्यक आहे. मात्र यावर्षी पावसाने दगा दिल्याने या हलक्या व मध्यम धानाच्या रोवण्याचा कालावधी निघुन गेल्यानंतर रोवणी झाली आहे. हीच बाब काही प्रमाणात जड धानालाही लागू होते. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात जरी पाऊस पडला असला तरी, धानपिकाचे उत्पादन निम्म्यापेक्षाही कमी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.कृषी विभागाच्या प्रयत्नानंतर जिल्ह्यात श्री पद्धतीने धानपिकाच्या लागवडीखालील क्षेत्र वाढत चालले आहे. श्री पद्धतीने धानाच्या रोपट्यांची लागवड १२ दिवसांच्या आतच करावी लागते. मात्र पऱ्हे टाकून २ महिन्यांचा कालावधी लोटला आहे. नुकत्याच झालेल्या पावसानंतर धानाची रोवणी काही शेतकरी करीत आहेत. जिल्ह्यात जवळपास ५० हजार हेक्टरवर आवत्या पद्धतीने धानपिकाची लागवड करण्यात येते. आवत्यालाही एक महिन्याच्या आत बासी होणे आवश्यक आहे. मात्र पाऊसच नसल्याने बासी होऊ शकली नाही. त्यामुळे खत देणे किंवा धानपिकातील गवत काढण्याचे काम झाले नाही. त्यामुळेही धानपिकाच्या उत्पादनात कमालीची घट होणार आहे. रस्त्याने फेरफटका मारून दुष्काळाच्या परिस्थितीचा अहवाल शासनाकडे पाठविणाऱ्या कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सर्व ‘आॅल ईज वेल’ असल्याचे दिसून येईल. मात्र प्रत्यक्ष परिस्थिती याहून भिन्न आहे. उशिरा धानाची रोवणी झाली असल्याने धानपीक उशिरा निघणार आहे. तोपर्यंत तलाव, बोड्यांचे पाणी संपून कोरड्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. उशिरा रोवणी झालेल्या पिकावर अनेक रोगांचा प्रादुर्भाव होतो. किडीचे व्यवस्थापन करण्यासाठी शेतकऱ्यांना आगावू खर्च करावा लागणार आहे. या सर्व बाबींचा अंदाज घेतल्यास दुष्काळाचे सावट कायम असल्याने दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी भारतीय किसान संघाचे जिल्हामंत्री राजेश वाणी, अ‍ॅड. विलास भृगुवार, प्रेमानंद सोनटक्के, यादव भैसारे, उदय बोरावार यांनी केली आहे. (नगर प्रतिनिधी)