शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
2
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
3
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
4
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
5
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
6
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
7
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
8
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
9
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
10
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
11
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
12
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
13
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
14
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
15
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
16
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
17
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
18
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
19
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
20
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस

९० वर्षे उलटूनही जिल्हा मार्गाची दुरूस्ती रखडली

By admin | Updated: December 8, 2015 01:53 IST

भारताला स्वातंत्र्य मिळून ६८ वर्षे पूर्ण झाली आहेत. स्वातंत्र्यपूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या छत्तीसगड सीमेवरील धानोरा-

अल्लाउद्दीन लालानी ल्ल धानोराभारताला स्वातंत्र्य मिळून ६८ वर्षे पूर्ण झाली आहेत. स्वातंत्र्यपूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या छत्तीसगड सीमेवरील धानोरा-चव्हेला-मुंगनेर-पेंढरी या मार्गाच्या निर्मितीसाठी कोट्यवधी रूपये खर्च करण्यात आले. मात्र नक्षल दहशतीमुळे तब्बल ९० वर्षे उलटूनही या मार्गाचे खडीकरण व डांबरीकरणाचे काम तसेच या मार्गावरील मोठया पुलाचेही काम रखडले आहे. सदर मार्गाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी राज्य शासनाने आजवर कोणतेही ठोस पावले उचलली नाही. परिणामी या भागातील नागरिकांची पायपीट कायम आहे.धानोरा-चव्हेला-मुंगनेर-पेंढरी या जिल्हा मार्गाच्या देखभाल व दुरूस्तीची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या धानोरा बांधकाम उपविभागाकडे आहे तर या मार्गावरील पूल निर्मिती व दुरूस्तीच्या कामाची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. या मार्गावर पुलाचे बांधकाम करण्यात आले. मात्र निधी अभावी मागील तीन वर्षांत या मार्गाचे खडीकरण व डांबरीकरणाचे काम झाले नाही. या मार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. परिणामी गेल्या पाच वर्षांपासून या मार्गावरील महामंडळाची बससेवा बंद आहे. दुचाकी वाहने चालविणेही कठीण आहे. दोन बांधकाम विभागाच्या वादात या मार्गाच्या दुरूस्तीचे काम रखडले आहे. या मार्गावरील बोदीन ते चिमरीकलपर्यंतचा चार किमीचा रस्ता पूर्णत: मुरूमाचा आहे. या रस्त्यावर पावसाळ्यात मोठमोठे खड्डे निर्माण होतात. धानोरा-चव्हेला-पेंढरी मार्गावरील पेकीनमुडझा पयडी गावानजीक बांधलेला रपटा पावसाळ्यात वाहून गेला आहे. या मार्गावर पेंढरी परिसरातील ५० ते ६० खेडेगाव असून या परिसरातील आदिवासी नागरिकांना विविध कामांसाठी पेंढरी-कारवाफा-चातगाव मार्गे धानोरा तालुका मुख्यालयी ये-जा करावे लागते. या मार्गाने ७० किमीचा प्रवास करावा लागतो. त्यामुळे नागरिकांचा बराच वेळ व पैशाचा अपव्येय होतो. सदर समस्या लक्षात घेऊन मुंगनेर-बोदीन परिसरातील नागरिकांनी सन १९९९ मध्ये श्रमदान करून या रस्त्याची दुरूस्ती केली होती. त्यानंतर निधीअभावी या रस्त्याची पक्की दुरूस्ती एकदाही करण्यात आली नाही. शासनाच्या नकाशावर १९२४ पासून हा मार्ग अस्तित्वात आहे. मात्र गेल्या ९० वर्षांपासून या मार्गाच्या दुरवस्थेचा वनवास कायम आहे.लोकप्रतिनिधींचे आश्वासन फोलच४आजवर अनेक सत्ताधारी पुढाऱ्यांनी तसेच मंत्र्यांनी धानोरा-चव्हेला-मुंगनेर-पेंढरी या मार्गाची कायमस्वरूपी दुरूस्ती करून रहदारीसाठी सदर मार्ग तयार करण्याचे आश्वासन दिले. चव्हेलानजीक पूल निर्मितीसाठी २० लाख रूपयांची गरज असताना केवळ १० लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला. यात वॉल उभारून बांधकाम करण्यात आले.